शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

शेतकऱ्यांमध्ये वाढतोय ताणतणाव, उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 21:22 IST

दहा-पंधरा वर्षापूर्वी शेती आणि शेतकऱ्यांची जी अवस्था होती, ती आज राहिलेली नाही. शेतीत आज गुंतवणूक जास्त आणि मोबदला कमी झाल्याने शेती फायदेशीर ठरत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, वाढती महागाई, कौटुंबिक गरजा, लोकसंख्या, व्यावसायिक शिक्षणाचा अभाव आदी बाबींमुळे शेतकरी कुटुंबांमध्ये ताण-तणाव वाढतो आहे. त्यांच्या जीवनात उदासीनता व नैराश्य आहे. त्यातूनच शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा निष्कर्ष टाटा ट्रस्टने गेली तीन वर्ष जिल्ह्यात केलेल्या अभ्यासवजा पाहणीतून काढला आहे.

ठळक मुद्देटाटा ट्रस्टचा अहवाल : संकटातून बाहेर काढण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न हवे

काशीनाथ लाहोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहा-पंधरा वर्षापूर्वी शेती आणि शेतकऱ्यांची जी अवस्था होती, ती आज राहिलेली नाही. शेतीत आज गुंतवणूक जास्त आणि मोबदला कमी झाल्याने शेती फायदेशीर ठरत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, वाढती महागाई, कौटुंबिक गरजा, लोकसंख्या, व्यावसायिक शिक्षणाचा अभाव आदी बाबींमुळे शेतकरी कुटुंबांमध्ये ताण-तणाव वाढतो आहे. त्यांच्या जीवनात उदासीनता व नैराश्य आहे. त्यातूनच शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा निष्कर्ष टाटा ट्रस्टने गेली तीन वर्ष जिल्ह्यात केलेल्या अभ्यासवजा पाहणीतून काढला आहे.शेतकरी आत्महत्यांमुळे यवतमाळ जिल्हा देशातच नव्हे तर जगात चर्चेत आहेत. या आत्महत्या केंद्र व राज्यातील सरकार आणि प्रशासनासाठीही चिंतेचा विषय ठरल्या आहेत. म्हणूनच शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणारा देशातील एकमेव प्रकल्प टाटा ट्रस्टच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यात सुरू करण्यात आला. प्रायोगिक तत्वावर तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील घाटंजी व यवतमाळ तालुक्यातील ६४ गावांमध्ये हा प्रकल्प राबविला गेला. त्यावर विविध उपाययोजनांसाठी दीड कोटी रुपये खर्च केले गेले. त्याचे चांगले परिणाम दिसायला लागल्याने आता राळेगाव व केळापूर या आणखी दोन तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव टाटा ट्रस्टने शासनाला दिला आहे. या माध्यमातून चार तालुक्यातील ४५० गावांमध्ये टाटा ट्रस्ट पोहोचणार आहे.गेली तीन वर्ष टाटा ट्रस्टच्या चमूने घाटंजी व यवतमाळ तालुक्यात शेतकरी आत्महत्यांवर बरेच काम केले. त्यातूनच अनेक गंभीरबाबी पुढे आल्या. नैराश्य व ताण-तणावाने ग्रस्त शेतकºयांना या बिकट प्रसंगी धीर देण्याची गरज आहे. त्यांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुळापासून सखोल व सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याची आवश्कता टाटा ट्रस्टने नोंदविली आहे. शेतकºयांसाठी विदर्भ मनोसामाजिक समूपदेशन व काळजी कार्यक्रम राबविला गेला. बैठक, चर्चा, मेळावे, गावांना नियमित भेटी, सर्वेक्षण, आरोग्य तपासणी, उपचार, लोकचळवळ या माध्यमातून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना केल्या गेल्या. आता त्यांच्या पुनर्वसनावर जोर दिला जाणार आहे.२५ हजार नागरिकांची चाचणीगेल्या तीन वर्षात टाटा ट्रस्टने ६४ गावातील २५ हजार नागरिकांची चाचणी केली. त्यांच्यातील तणावाचे स्त्री-पुरुषांचे प्रमाण समान असल्याचे आढळून आले. १३५० नागरिकांची मनोरुग्ण म्हणून नोंद केली गेली असून उपचार करण्यात येत आहे. यातील ६५० नागरिकांचे नैराश्य दूर करण्यात यश आल्याचे टाटा ट्रस्टने सांगितले. त्यातील २०० जणांना रोजगार उपलब्ध करून दिला गेला. १२० नागरिकांना केम प्रकल्पातून शेळ्या खरेदीसाठी अनुदान दिले गेले. त्याकरिता प्रशिक्षण देण्यात आले.शेतकरी व त्यांच्या कुटुंबांचे नैराश्य दूर करून त्यांना मानसिक आधार देण्यात, रोजगार निर्मिती, पुनर्वसन, उपचार उपलब्ध करून देण्यात यश आले आहे. आता त्यांच्या पुनर्वसनावर भर दिला जाणार आहे. हाच प्रकल्प आणखी दोन तालुक्यांमध्ये राबविण्याचा प्रस्ताव आहे. त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.- डॉ. प्रफुल्ल कापसेप्रकल्प संचालक, टाटा ट्रस्ट