शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

शेतकऱ्यांमध्ये वाढतोय ताणतणाव, उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 21:22 IST

दहा-पंधरा वर्षापूर्वी शेती आणि शेतकऱ्यांची जी अवस्था होती, ती आज राहिलेली नाही. शेतीत आज गुंतवणूक जास्त आणि मोबदला कमी झाल्याने शेती फायदेशीर ठरत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, वाढती महागाई, कौटुंबिक गरजा, लोकसंख्या, व्यावसायिक शिक्षणाचा अभाव आदी बाबींमुळे शेतकरी कुटुंबांमध्ये ताण-तणाव वाढतो आहे. त्यांच्या जीवनात उदासीनता व नैराश्य आहे. त्यातूनच शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा निष्कर्ष टाटा ट्रस्टने गेली तीन वर्ष जिल्ह्यात केलेल्या अभ्यासवजा पाहणीतून काढला आहे.

ठळक मुद्देटाटा ट्रस्टचा अहवाल : संकटातून बाहेर काढण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न हवे

काशीनाथ लाहोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहा-पंधरा वर्षापूर्वी शेती आणि शेतकऱ्यांची जी अवस्था होती, ती आज राहिलेली नाही. शेतीत आज गुंतवणूक जास्त आणि मोबदला कमी झाल्याने शेती फायदेशीर ठरत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, वाढती महागाई, कौटुंबिक गरजा, लोकसंख्या, व्यावसायिक शिक्षणाचा अभाव आदी बाबींमुळे शेतकरी कुटुंबांमध्ये ताण-तणाव वाढतो आहे. त्यांच्या जीवनात उदासीनता व नैराश्य आहे. त्यातूनच शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा निष्कर्ष टाटा ट्रस्टने गेली तीन वर्ष जिल्ह्यात केलेल्या अभ्यासवजा पाहणीतून काढला आहे.शेतकरी आत्महत्यांमुळे यवतमाळ जिल्हा देशातच नव्हे तर जगात चर्चेत आहेत. या आत्महत्या केंद्र व राज्यातील सरकार आणि प्रशासनासाठीही चिंतेचा विषय ठरल्या आहेत. म्हणूनच शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणारा देशातील एकमेव प्रकल्प टाटा ट्रस्टच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यात सुरू करण्यात आला. प्रायोगिक तत्वावर तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील घाटंजी व यवतमाळ तालुक्यातील ६४ गावांमध्ये हा प्रकल्प राबविला गेला. त्यावर विविध उपाययोजनांसाठी दीड कोटी रुपये खर्च केले गेले. त्याचे चांगले परिणाम दिसायला लागल्याने आता राळेगाव व केळापूर या आणखी दोन तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव टाटा ट्रस्टने शासनाला दिला आहे. या माध्यमातून चार तालुक्यातील ४५० गावांमध्ये टाटा ट्रस्ट पोहोचणार आहे.गेली तीन वर्ष टाटा ट्रस्टच्या चमूने घाटंजी व यवतमाळ तालुक्यात शेतकरी आत्महत्यांवर बरेच काम केले. त्यातूनच अनेक गंभीरबाबी पुढे आल्या. नैराश्य व ताण-तणावाने ग्रस्त शेतकºयांना या बिकट प्रसंगी धीर देण्याची गरज आहे. त्यांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुळापासून सखोल व सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याची आवश्कता टाटा ट्रस्टने नोंदविली आहे. शेतकºयांसाठी विदर्भ मनोसामाजिक समूपदेशन व काळजी कार्यक्रम राबविला गेला. बैठक, चर्चा, मेळावे, गावांना नियमित भेटी, सर्वेक्षण, आरोग्य तपासणी, उपचार, लोकचळवळ या माध्यमातून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना केल्या गेल्या. आता त्यांच्या पुनर्वसनावर जोर दिला जाणार आहे.२५ हजार नागरिकांची चाचणीगेल्या तीन वर्षात टाटा ट्रस्टने ६४ गावातील २५ हजार नागरिकांची चाचणी केली. त्यांच्यातील तणावाचे स्त्री-पुरुषांचे प्रमाण समान असल्याचे आढळून आले. १३५० नागरिकांची मनोरुग्ण म्हणून नोंद केली गेली असून उपचार करण्यात येत आहे. यातील ६५० नागरिकांचे नैराश्य दूर करण्यात यश आल्याचे टाटा ट्रस्टने सांगितले. त्यातील २०० जणांना रोजगार उपलब्ध करून दिला गेला. १२० नागरिकांना केम प्रकल्पातून शेळ्या खरेदीसाठी अनुदान दिले गेले. त्याकरिता प्रशिक्षण देण्यात आले.शेतकरी व त्यांच्या कुटुंबांचे नैराश्य दूर करून त्यांना मानसिक आधार देण्यात, रोजगार निर्मिती, पुनर्वसन, उपचार उपलब्ध करून देण्यात यश आले आहे. आता त्यांच्या पुनर्वसनावर भर दिला जाणार आहे. हाच प्रकल्प आणखी दोन तालुक्यांमध्ये राबविण्याचा प्रस्ताव आहे. त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.- डॉ. प्रफुल्ल कापसेप्रकल्प संचालक, टाटा ट्रस्ट