शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

शेतकऱ्यांमध्ये वाढतोय ताणतणाव, उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 21:22 IST

दहा-पंधरा वर्षापूर्वी शेती आणि शेतकऱ्यांची जी अवस्था होती, ती आज राहिलेली नाही. शेतीत आज गुंतवणूक जास्त आणि मोबदला कमी झाल्याने शेती फायदेशीर ठरत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, वाढती महागाई, कौटुंबिक गरजा, लोकसंख्या, व्यावसायिक शिक्षणाचा अभाव आदी बाबींमुळे शेतकरी कुटुंबांमध्ये ताण-तणाव वाढतो आहे. त्यांच्या जीवनात उदासीनता व नैराश्य आहे. त्यातूनच शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा निष्कर्ष टाटा ट्रस्टने गेली तीन वर्ष जिल्ह्यात केलेल्या अभ्यासवजा पाहणीतून काढला आहे.

ठळक मुद्देटाटा ट्रस्टचा अहवाल : संकटातून बाहेर काढण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न हवे

काशीनाथ लाहोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहा-पंधरा वर्षापूर्वी शेती आणि शेतकऱ्यांची जी अवस्था होती, ती आज राहिलेली नाही. शेतीत आज गुंतवणूक जास्त आणि मोबदला कमी झाल्याने शेती फायदेशीर ठरत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, वाढती महागाई, कौटुंबिक गरजा, लोकसंख्या, व्यावसायिक शिक्षणाचा अभाव आदी बाबींमुळे शेतकरी कुटुंबांमध्ये ताण-तणाव वाढतो आहे. त्यांच्या जीवनात उदासीनता व नैराश्य आहे. त्यातूनच शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचा निष्कर्ष टाटा ट्रस्टने गेली तीन वर्ष जिल्ह्यात केलेल्या अभ्यासवजा पाहणीतून काढला आहे.शेतकरी आत्महत्यांमुळे यवतमाळ जिल्हा देशातच नव्हे तर जगात चर्चेत आहेत. या आत्महत्या केंद्र व राज्यातील सरकार आणि प्रशासनासाठीही चिंतेचा विषय ठरल्या आहेत. म्हणूनच शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणारा देशातील एकमेव प्रकल्प टाटा ट्रस्टच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यात सुरू करण्यात आला. प्रायोगिक तत्वावर तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील घाटंजी व यवतमाळ तालुक्यातील ६४ गावांमध्ये हा प्रकल्प राबविला गेला. त्यावर विविध उपाययोजनांसाठी दीड कोटी रुपये खर्च केले गेले. त्याचे चांगले परिणाम दिसायला लागल्याने आता राळेगाव व केळापूर या आणखी दोन तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव टाटा ट्रस्टने शासनाला दिला आहे. या माध्यमातून चार तालुक्यातील ४५० गावांमध्ये टाटा ट्रस्ट पोहोचणार आहे.गेली तीन वर्ष टाटा ट्रस्टच्या चमूने घाटंजी व यवतमाळ तालुक्यात शेतकरी आत्महत्यांवर बरेच काम केले. त्यातूनच अनेक गंभीरबाबी पुढे आल्या. नैराश्य व ताण-तणावाने ग्रस्त शेतकºयांना या बिकट प्रसंगी धीर देण्याची गरज आहे. त्यांच्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुळापासून सखोल व सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याची आवश्कता टाटा ट्रस्टने नोंदविली आहे. शेतकºयांसाठी विदर्भ मनोसामाजिक समूपदेशन व काळजी कार्यक्रम राबविला गेला. बैठक, चर्चा, मेळावे, गावांना नियमित भेटी, सर्वेक्षण, आरोग्य तपासणी, उपचार, लोकचळवळ या माध्यमातून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना केल्या गेल्या. आता त्यांच्या पुनर्वसनावर जोर दिला जाणार आहे.२५ हजार नागरिकांची चाचणीगेल्या तीन वर्षात टाटा ट्रस्टने ६४ गावातील २५ हजार नागरिकांची चाचणी केली. त्यांच्यातील तणावाचे स्त्री-पुरुषांचे प्रमाण समान असल्याचे आढळून आले. १३५० नागरिकांची मनोरुग्ण म्हणून नोंद केली गेली असून उपचार करण्यात येत आहे. यातील ६५० नागरिकांचे नैराश्य दूर करण्यात यश आल्याचे टाटा ट्रस्टने सांगितले. त्यातील २०० जणांना रोजगार उपलब्ध करून दिला गेला. १२० नागरिकांना केम प्रकल्पातून शेळ्या खरेदीसाठी अनुदान दिले गेले. त्याकरिता प्रशिक्षण देण्यात आले.शेतकरी व त्यांच्या कुटुंबांचे नैराश्य दूर करून त्यांना मानसिक आधार देण्यात, रोजगार निर्मिती, पुनर्वसन, उपचार उपलब्ध करून देण्यात यश आले आहे. आता त्यांच्या पुनर्वसनावर भर दिला जाणार आहे. हाच प्रकल्प आणखी दोन तालुक्यांमध्ये राबविण्याचा प्रस्ताव आहे. त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.- डॉ. प्रफुल्ल कापसेप्रकल्प संचालक, टाटा ट्रस्ट