शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
3
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
4
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
5
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
6
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
7
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
8
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
9
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
10
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
11
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
12
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
13
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
14
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
15
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
16
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
17
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
18
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
19
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
20
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश

वाघांच्या वाढत्या संख्येने वन्यप्रेमींत आनंद; पण शेतकरी दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

शेतात काम करण्यासाठी मजूर जायला तयार नसतात. वन्यजीवांकडून पिके उद्ध्वस्त केली जातात. त्यातच व्याघ्र हल्ल्यात जनावरांची हानी होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधनच शेती आहे. मात्र या उत्पन्नावरच घाला घातला जात आहे. मग आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

ठळक मुद्देटिपेश्वर अभयारण्य । उणिवा दूर करण्यासह अडचणींचा पाठपुरावा करणे आवश्यक

प्रविण पिन्नमवार ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यातील टिपेश्वर अभ्यारण्यासह परिसरातील जंगलात वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली. यामुळे वन्यप्रेमी आनंद व्यक्त करीत असले तरी शेतकऱ्यांत मात्र दिवसेंदिवस भय वाढत चालले आहे.अभयारण्यासह परिसरातील जंगलात वाघांसाठी योग्य व्यवस्थापन नसल्याने हे वाघ परिसरातील शेतात, कधी गावात शिरून जनावरांवर तर कधी मजुरांवर हल्ले करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली.शेतात काम करण्यासाठी मजूर जायला तयार नसतात. वन्यजीवांकडून पिके उद्ध्वस्त केली जातात. त्यातच व्याघ्र हल्ल्यात जनावरांची हानी होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधनच शेती आहे. मात्र या उत्पन्नावरच घाला घातला जात आहे. मग आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशावेळी वन्यजीव विभागाने शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवून सहकार्याने व्यवस्थापन केल्यास पुढील काळात चित्र काही वेगळे होऊ शकते, असे या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे. वाघांच्या संख्येत वाढ होणे, ही अतिशय सकारात्मक आणि पर्यटन वाढीला चालना देणारी बाब आहे. यामुळे पर्यटन आणि रोजगार वाढू शकतो. राखीव नसणाºया जंगलातही वाघाचे वास्तव्य आहे. मात्र या क्षेत्रात वाघाचे संरक्षण गंभीरपणे होत नसल्याचे दिसून येते. या संरक्षणासाठी वनाधिकाºयांना अतिरिक्त मनुष्यबळ अभयारण्यात व या क्षेत्रात उपलब्ध करून देण्याची गरज आहे.जंगलातील पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची गरज निर्माण झाली आहे. जंगलात पाणी योग्य प्रमाणात उपलब्ध राहिले, तर गवत आणि इतर पाला हिरवा राहील. त्यामुळे गवतावर अवलंबून असलेले प्राणी जंगलातून इतरत्र जाणार नाही. बहुतेकवेळी यावर अवलंबून असलेले प्राणी जंगलाच्या बाहेर पडतात. त्यांना खाणारे वाघदेखील या प्राण्यांमागे जंगलाबाहेर पडतात. त्यामुळे जंगलातील नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचे योग्य प्रकारे संवर्धन होणे गरजेचे असताना या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.आंतरराज्यीय शिकाऱ्यांचा अभयारण्यावर डोळाएकीकडे वाघांची संख्या वाढत असताना आंतरराज्यीय शिकारी टोळ्यांच्या नजराही अभरण्यासह असंरक्षित परिसरात असलेल्या वाघावर वळत असल्याचे सांगितले जाते. या शिकाऱ्यांचाही बंदोबस्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरेपूर मनुष्यबळ उपलब्ध होणे गरजेचे आहे.

टॅग्स :TigerवाघFarmerशेतकरी