शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

वाघांच्या वाढत्या संख्येने वन्यप्रेमींत आनंद; पण शेतकरी दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

शेतात काम करण्यासाठी मजूर जायला तयार नसतात. वन्यजीवांकडून पिके उद्ध्वस्त केली जातात. त्यातच व्याघ्र हल्ल्यात जनावरांची हानी होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधनच शेती आहे. मात्र या उत्पन्नावरच घाला घातला जात आहे. मग आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

ठळक मुद्देटिपेश्वर अभयारण्य । उणिवा दूर करण्यासह अडचणींचा पाठपुरावा करणे आवश्यक

प्रविण पिन्नमवार ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यातील टिपेश्वर अभ्यारण्यासह परिसरातील जंगलात वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली. यामुळे वन्यप्रेमी आनंद व्यक्त करीत असले तरी शेतकऱ्यांत मात्र दिवसेंदिवस भय वाढत चालले आहे.अभयारण्यासह परिसरातील जंगलात वाघांसाठी योग्य व्यवस्थापन नसल्याने हे वाघ परिसरातील शेतात, कधी गावात शिरून जनावरांवर तर कधी मजुरांवर हल्ले करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली.शेतात काम करण्यासाठी मजूर जायला तयार नसतात. वन्यजीवांकडून पिके उद्ध्वस्त केली जातात. त्यातच व्याघ्र हल्ल्यात जनावरांची हानी होत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधनच शेती आहे. मात्र या उत्पन्नावरच घाला घातला जात आहे. मग आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. अशावेळी वन्यजीव विभागाने शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवून सहकार्याने व्यवस्थापन केल्यास पुढील काळात चित्र काही वेगळे होऊ शकते, असे या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांचे मत आहे. वाघांच्या संख्येत वाढ होणे, ही अतिशय सकारात्मक आणि पर्यटन वाढीला चालना देणारी बाब आहे. यामुळे पर्यटन आणि रोजगार वाढू शकतो. राखीव नसणाºया जंगलातही वाघाचे वास्तव्य आहे. मात्र या क्षेत्रात वाघाचे संरक्षण गंभीरपणे होत नसल्याचे दिसून येते. या संरक्षणासाठी वनाधिकाºयांना अतिरिक्त मनुष्यबळ अभयारण्यात व या क्षेत्रात उपलब्ध करून देण्याची गरज आहे.जंगलातील पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची गरज निर्माण झाली आहे. जंगलात पाणी योग्य प्रमाणात उपलब्ध राहिले, तर गवत आणि इतर पाला हिरवा राहील. त्यामुळे गवतावर अवलंबून असलेले प्राणी जंगलातून इतरत्र जाणार नाही. बहुतेकवेळी यावर अवलंबून असलेले प्राणी जंगलाच्या बाहेर पडतात. त्यांना खाणारे वाघदेखील या प्राण्यांमागे जंगलाबाहेर पडतात. त्यामुळे जंगलातील नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांचे योग्य प्रकारे संवर्धन होणे गरजेचे असताना या संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.आंतरराज्यीय शिकाऱ्यांचा अभयारण्यावर डोळाएकीकडे वाघांची संख्या वाढत असताना आंतरराज्यीय शिकारी टोळ्यांच्या नजराही अभरण्यासह असंरक्षित परिसरात असलेल्या वाघावर वळत असल्याचे सांगितले जाते. या शिकाऱ्यांचाही बंदोबस्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरेपूर मनुष्यबळ उपलब्ध होणे गरजेचे आहे.

टॅग्स :TigerवाघFarmerशेतकरी