शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

यंदा उत्पन्न घटल्याने वाढली चिंता

By admin | Updated: October 18, 2014 23:02 IST

तालुक्यात यावर्षी पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या उशीरा झाल्या़ कमी-अधिक पावसाने नंतर पिके जोमाने आली़ तथापि अचानक पावसाने पिके जोमान असताना एक महिना दडी मारल्याने आणि सोयाबीवर शेंगांवर

मारेगाव : तालुक्यात यावर्षी पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या उशीरा झाल्या़ कमी-अधिक पावसाने नंतर पिके जोमाने आली़ तथापि अचानक पावसाने पिके जोमान असताना एक महिना दडी मारल्याने आणि सोयाबीवर शेंगांवर व कपाशी फुलावर असताना पाऊस आल्याने शेंगा तयार झाल्या़, मात्र त्यात दाणाच नाही. कपाशीवर आलेल्या रोगामुळे सोयाबीन व कपाशी उत्पादनात मोठी घट अल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़खरीप हंगामात सुरूवातीला कमी-अधिक पावसाचा शेती पिकांना फटका बसला़ परंतु नंतरच्या पावसाने पिकांची स्थिती चांगलीच सुधारली़ त्यामुळे शेतकरी सुखावला होता. नंतर पिके हळूहळू वाढत गेली आणि पाऊस गायब झाला़ ऐन सोयाबीन पीक फुलावर असताना त्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने आता चांगल्याप्रकारे सोयाबिनचे पीक हाती लागेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती़ परंतु नंतर पुन्हा महिनाभर पाऊस गायब झाला. तरीही सोयाबिनला शेंगा लागल्या़ मात्र शेंगा पाहिजे तशा भरल्याच नाहीत़ त्यातच सोयाबिनवर पाने खाणाऱ्या लष्करी अळीने आक्रमण केल्याने सोयाबिनचे पिक परिपक्व होण्यापूर्वीच करपून गेले़ त्यामुळे शेतकऱ्यांनी पदरी पडेल तेवढे पीक घरी न्यावे, म्हणून सध्या सोयाबिनची काढणी सुरू केली आहे़ यावर्षी सोयाबीन पिकाचा उतारा अर्ध्यावर आला आहे़ परिणामी सोयाबीन पिकासाठी लावलेला खर्चही निघेनासा झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत़ सोयाबिनचे दरही यावर्षी कमी असल्याने सोयाबीन विकून आलेला पैसा दिवाळीवर खर्च होणार असल्याने समोर कुटुंब कसे चालवावे, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. सोयाबिनने दगा दिल्यानंतर आता शेतकऱ्यांची सर्व भीस्त कपाशीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी सीतादही करून कापूस वेचणीला सुरूवात केली आहे. बाजारात काही कापूस विक्रीसाठी येतही आहे. मात्र कपाशी पीक जोमात असताना आणि बोंडे लागण्याच्या काळातच एक महिना पावसाने दडी मारली होती. नंतर विविध रोगांचे आक्रमण झाल्याने आता थोडी फार बोंडेच फुटत आहे़ त्यामुळे पुढील एक-दोन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी होण्याची शक्यता आहे. कपाशीचा उताराही या वर्षी अत्यल्प येण्याची शक््यता असल्याने शेतकऱ्यांना फार मोठे नुकसान सोसावे लागणार आहे़ त्यामुळे हे वर्ष पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी कर्जबाजारीपणाचे ठरण्याची शक्यता आहे़ (शहर प्रतिनिधी)