शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

यंदा उत्पन्न घटल्याने वाढली चिंता

By admin | Updated: October 18, 2014 23:02 IST

तालुक्यात यावर्षी पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या उशीरा झाल्या़ कमी-अधिक पावसाने नंतर पिके जोमाने आली़ तथापि अचानक पावसाने पिके जोमान असताना एक महिना दडी मारल्याने आणि सोयाबीवर शेंगांवर

मारेगाव : तालुक्यात यावर्षी पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या उशीरा झाल्या़ कमी-अधिक पावसाने नंतर पिके जोमाने आली़ तथापि अचानक पावसाने पिके जोमान असताना एक महिना दडी मारल्याने आणि सोयाबीवर शेंगांवर व कपाशी फुलावर असताना पाऊस आल्याने शेंगा तयार झाल्या़, मात्र त्यात दाणाच नाही. कपाशीवर आलेल्या रोगामुळे सोयाबीन व कपाशी उत्पादनात मोठी घट अल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़खरीप हंगामात सुरूवातीला कमी-अधिक पावसाचा शेती पिकांना फटका बसला़ परंतु नंतरच्या पावसाने पिकांची स्थिती चांगलीच सुधारली़ त्यामुळे शेतकरी सुखावला होता. नंतर पिके हळूहळू वाढत गेली आणि पाऊस गायब झाला़ ऐन सोयाबीन पीक फुलावर असताना त्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने आता चांगल्याप्रकारे सोयाबिनचे पीक हाती लागेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती़ परंतु नंतर पुन्हा महिनाभर पाऊस गायब झाला. तरीही सोयाबिनला शेंगा लागल्या़ मात्र शेंगा पाहिजे तशा भरल्याच नाहीत़ त्यातच सोयाबिनवर पाने खाणाऱ्या लष्करी अळीने आक्रमण केल्याने सोयाबिनचे पिक परिपक्व होण्यापूर्वीच करपून गेले़ त्यामुळे शेतकऱ्यांनी पदरी पडेल तेवढे पीक घरी न्यावे, म्हणून सध्या सोयाबिनची काढणी सुरू केली आहे़ यावर्षी सोयाबीन पिकाचा उतारा अर्ध्यावर आला आहे़ परिणामी सोयाबीन पिकासाठी लावलेला खर्चही निघेनासा झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत़ सोयाबिनचे दरही यावर्षी कमी असल्याने सोयाबीन विकून आलेला पैसा दिवाळीवर खर्च होणार असल्याने समोर कुटुंब कसे चालवावे, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. सोयाबिनने दगा दिल्यानंतर आता शेतकऱ्यांची सर्व भीस्त कपाशीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी सीतादही करून कापूस वेचणीला सुरूवात केली आहे. बाजारात काही कापूस विक्रीसाठी येतही आहे. मात्र कपाशी पीक जोमात असताना आणि बोंडे लागण्याच्या काळातच एक महिना पावसाने दडी मारली होती. नंतर विविध रोगांचे आक्रमण झाल्याने आता थोडी फार बोंडेच फुटत आहे़ त्यामुळे पुढील एक-दोन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी होण्याची शक्यता आहे. कपाशीचा उताराही या वर्षी अत्यल्प येण्याची शक््यता असल्याने शेतकऱ्यांना फार मोठे नुकसान सोसावे लागणार आहे़ त्यामुळे हे वर्ष पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी कर्जबाजारीपणाचे ठरण्याची शक्यता आहे़ (शहर प्रतिनिधी)