शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

पुसद परिसरात रुग्णसंख्येत वाढ

By admin | Updated: October 18, 2014 02:05 IST

विषाणुजन्य आजरामुळे शहरासह ग्रामीण भागातही तापाचे तसेच सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले आहे.

पुसद : विषाणुजन्य आजरामुळे शहरासह ग्रामीण भागातही तापाचे तसेच सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढले आहे. ताप किंवा सर्दी खोकला असे आजार अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांकडे दाखविने गरजेचे आहे. कारण ताप हा हिवताप किंवा टाईफाईड, डेग्यु, चिकणगुणिया काविळ असाही असु शकतो. या तापावर वेळीच नियंत्रण न मिळविल्यास हा ताप जीवघेणाही ठरू शकतो. पुसद शहरासह तालुक्यात सध्या विषाणुजन्य आजाराने तोंड वर काढले आहे. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यासह विविध आजाराचे रुग्ण घरोघरी आढळून येत आहेत. त्यामुळे शहरासह विविध ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणि खासगी रुग्णालयातही रुग्णांची मोठी संख्या दिसून येत आहे. सकाळपासूनच रुग्णालयात रांगा लागत आहेत. अनेक जण विविध आजारांंनी ग्रस्त असतानाही असे आजार अंगावर काढतात किंवा स्वत:च्याच मनाने मेडिकलमधून गोळ््या विकत घेऊन त्याचा वापर करतात. ही पद्धती अतिशय चुकीची असून, कोणत्याही प्रकारच्या तापासाठी त्वरित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य विभागाने केले आहे. वातावरणातील बदलामुळेसुद्धा रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रुग्णालयांमध्ये टायफाईड, हिवताप, सर्दी, खोकला अशा रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. अनेक रुग्णांना भर्तीसुद्धा करून घेण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णालयातील बेडसुद्धा अपुरे पडत असल्याचे दिसून येत आहे. पुसद शहरात १०० पेक्षा अधिक लहानमोठे डॉक्टर आहेत. त्यातील अनेक डॉक्टर तर रुग्ण चांगला असेपर्यंत आपल्याकडे ठेवायचा आणि गंभीर झाला की, नांदेड, यवतमाळ व नागपूर सारख्या ठिकाणी रेफर करायचा अशी पद्धती अवलंबितात. अलिकडे खासगी डॉक्टरांची तपासणी फीसुद्धा वाढली आहे. त्यातच ते लिहून देत असलेली महागडी औषधी सर्वसामान्य रुग्णांच्या अवाक्या बाहेर असते. परंतु नाईलाजास्तव कर्ज काढून का होईना रुग्णालयात गेल्याशिवाय रुग्णांनाना दुसरा पर्याय नसतो. परंतु वैद्यकीय क्षेत्रातही आता पैसे कमविण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. अशाही परिस्थितीत काही डॉक्टर मात्र या व्यवसायाला व्यवसाय न मानता तसेच पैशाला महत्व न देता सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा करीत आहेत. परंतु अशा डॉक्टरांची संख्या बोटावर मोजण्या इतपतच आहे. एकीकडे तालुक्यात रुग्णांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत असताना जिल्हा आरोग्य विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. तालुक्यातील वैद्यकीय विभागाचा कारभार अतिशय सुस्त आहे. तेथे रुग्णांसाठी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. वेळेवर उपचारही मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करून तालुक्याच्या ठिकाणी उपचारार्थ जावे लागते. (तालुका प्रतिनिधी)