शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

आपत्ती व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे फुलसावंगीत कोरोना रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:41 IST

ग्रामीण भागातील काही नागरिक अद्याप कोरोनासारख्या महाभयंकर रोगाला गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीकडून कोणतीही ...

ग्रामीण भागातील काही नागरिक अद्याप कोरोनासारख्या महाभयंकर रोगाला गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले जात नाही. परिणामतः रुग्ण वाढत आहेत. शेजारच्या जिल्ह्यात लॉकडाऊन लागले आहे. कोरोना रुग्ण वाढल्यास येथेही लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समितीने नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाईचा बडगा उभारण्याची गरज आहे.

मागील वर्षी कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना गावाच्या बाहेर ठेवण्यासाठी गाव डोक्यावर घेणारे काही बोलबच्चन ग्रामपंचायतीच्या सत्तेत जाताच मूग गिळून गप्प बसले आहेत. आपत्ती व्यवस्थापन समितीसुद्धा बेशिस्त नागरिकांवर कारवाईसाठी धजावत नाही. त्यामुळे जे लोक नियमांचे पालन करतात, त्यांनासुद्धा आपणच का नियम पाळायचे, असा प्रश्न पडला आहे. कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी गावातील सुज्ञ नागरिक, ग्रामपंचायत, महसूल व पोलीस प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. मात्र, समन्वयाच्या अभावामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.

बॉक्स

कर्मचाऱ्यांचे अपडाउन सुरूच

कोरोना काळातही ग्रामसेवक, तलाठी व पोलीस कर्मचारी यांचे पुसद, उमरखेडवरून येथे अपडाउन सुरू आहे. त्यामुळे गावातील बेशिस्त नागरिकांवर कुणाचाच वचक उरला नाही. ग्रामपंचायतीच्या सावध राजकारणामुळे गावाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. फुलसावंगीमध्ये वाढत असलेले कोरोना रुग्ण चिंतेचा विषय आहे. ग्रामपंचायतीने निर्बंध न पाळणाऱ्या नागरिकांवर दोन महिन्यांपासून कोणतीही दंडात्मक कारवाई केली नाही. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढत असल्याचे माजी पंचायत समिती सदस्य विजयराव महाजन यांनी सांगितले.