शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

आपत्ती व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे फुलसावंगीत कोरोना रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:41 IST

ग्रामीण भागातील काही नागरिक अद्याप कोरोनासारख्या महाभयंकर रोगाला गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीकडून कोणतीही ...

ग्रामीण भागातील काही नागरिक अद्याप कोरोनासारख्या महाभयंकर रोगाला गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले जात नाही. परिणामतः रुग्ण वाढत आहेत. शेजारच्या जिल्ह्यात लॉकडाऊन लागले आहे. कोरोना रुग्ण वाढल्यास येथेही लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समितीने नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाईचा बडगा उभारण्याची गरज आहे.

मागील वर्षी कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना गावाच्या बाहेर ठेवण्यासाठी गाव डोक्यावर घेणारे काही बोलबच्चन ग्रामपंचायतीच्या सत्तेत जाताच मूग गिळून गप्प बसले आहेत. आपत्ती व्यवस्थापन समितीसुद्धा बेशिस्त नागरिकांवर कारवाईसाठी धजावत नाही. त्यामुळे जे लोक नियमांचे पालन करतात, त्यांनासुद्धा आपणच का नियम पाळायचे, असा प्रश्न पडला आहे. कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी गावातील सुज्ञ नागरिक, ग्रामपंचायत, महसूल व पोलीस प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. मात्र, समन्वयाच्या अभावामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.

बॉक्स

कर्मचाऱ्यांचे अपडाउन सुरूच

कोरोना काळातही ग्रामसेवक, तलाठी व पोलीस कर्मचारी यांचे पुसद, उमरखेडवरून येथे अपडाउन सुरू आहे. त्यामुळे गावातील बेशिस्त नागरिकांवर कुणाचाच वचक उरला नाही. ग्रामपंचायतीच्या सावध राजकारणामुळे गावाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. फुलसावंगीमध्ये वाढत असलेले कोरोना रुग्ण चिंतेचा विषय आहे. ग्रामपंचायतीने निर्बंध न पाळणाऱ्या नागरिकांवर दोन महिन्यांपासून कोणतीही दंडात्मक कारवाई केली नाही. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढत असल्याचे माजी पंचायत समिती सदस्य विजयराव महाजन यांनी सांगितले.