शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
3
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
4
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
5
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
6
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
7
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
8
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
9
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
10
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
11
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
12
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
13
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
14
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
15
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
16
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
17
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
18
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
19
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
20
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."

आपत्ती व्यवस्थापनाच्या दुर्लक्षामुळे फुलसावंगीत कोरोना रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:41 IST

ग्रामीण भागातील काही नागरिक अद्याप कोरोनासारख्या महाभयंकर रोगाला गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीकडून कोणतीही ...

ग्रामीण भागातील काही नागरिक अद्याप कोरोनासारख्या महाभयंकर रोगाला गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. गाव पातळीवर आपत्ती व्यवस्थापन समितीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले जात नाही. परिणामतः रुग्ण वाढत आहेत. शेजारच्या जिल्ह्यात लॉकडाऊन लागले आहे. कोरोना रुग्ण वाढल्यास येथेही लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन समितीने नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाईचा बडगा उभारण्याची गरज आहे.

मागील वर्षी कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना गावाच्या बाहेर ठेवण्यासाठी गाव डोक्यावर घेणारे काही बोलबच्चन ग्रामपंचायतीच्या सत्तेत जाताच मूग गिळून गप्प बसले आहेत. आपत्ती व्यवस्थापन समितीसुद्धा बेशिस्त नागरिकांवर कारवाईसाठी धजावत नाही. त्यामुळे जे लोक नियमांचे पालन करतात, त्यांनासुद्धा आपणच का नियम पाळायचे, असा प्रश्न पडला आहे. कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी गावातील सुज्ञ नागरिक, ग्रामपंचायत, महसूल व पोलीस प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. मात्र, समन्वयाच्या अभावामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.

बॉक्स

कर्मचाऱ्यांचे अपडाउन सुरूच

कोरोना काळातही ग्रामसेवक, तलाठी व पोलीस कर्मचारी यांचे पुसद, उमरखेडवरून येथे अपडाउन सुरू आहे. त्यामुळे गावातील बेशिस्त नागरिकांवर कुणाचाच वचक उरला नाही. ग्रामपंचायतीच्या सावध राजकारणामुळे गावाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. फुलसावंगीमध्ये वाढत असलेले कोरोना रुग्ण चिंतेचा विषय आहे. ग्रामपंचायतीने निर्बंध न पाळणाऱ्या नागरिकांवर दोन महिन्यांपासून कोणतीही दंडात्मक कारवाई केली नाही. त्यामुळे कोरोना रुग्ण वाढत असल्याचे माजी पंचायत समिती सदस्य विजयराव महाजन यांनी सांगितले.