शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

तेलाच्या मागणीत वाढ, पेरणीक्षेत्रात घट; जिल्ह्यात भुईमुगाचा पेरा निम्म्याने घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:00 IST

रबी हंगाम आणि उन्हाळ्यात करडई, सूर्यफुल, भुईमूग, तीळ आणि मोहरी ही प्रमुख पिके घेतली जातात. विविध अडचणी निर्माण झाल्याने करडई आणि सूर्यफुल दोन्ही पिके नाहीशी झाली आहेत. आता मोहरी, तीळ आणि भुईमूग या पिकांना पहिली पसंती आहे. ही पिके घेताना भुईमुगावर सर्वाधिक भर आहे. मात्र, जंगली जनावरांना हे पीक सर्वाधिक आवडीचे आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कितीही सुरक्षा केली तरी रानडुकर या शेतामध्ये प्रवेश करतात.

ठळक मुद्देजिल्ह्यातील तेल पिकांच्या उत्पादनात घट ; रबीचे क्षेत्र वाढले, वन्यप्राण्यांमुळे चित्र बदलले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खरिपाच्या तुलनेत रबी आणि उन्हाळी पिके घेण्यासाठी शेतकरी उत्सुक आहेत. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी या पिकामधून प्रयत्न होतो. मात्र, जंगली जनावरे, वीज भारनियमन आणि चांगला भाव न मिळणे या प्रमुख कारणाने तेलबियांच्या क्षेत्रात जिल्ह्यात घट झाली आहे. रबी हंगाम आणि उन्हाळ्यात करडई, सूर्यफुल, भुईमूग, तीळ आणि मोहरी ही प्रमुख पिके घेतली जातात. विविध अडचणी निर्माण झाल्याने करडई आणि सूर्यफुल दोन्ही पिके नाहीशी झाली आहेत. आता मोहरी, तीळ आणि भुईमूग या पिकांना पहिली पसंती आहे. ही पिके घेताना भुईमुगावर सर्वाधिक भर आहे. मात्र, जंगली जनावरांना हे पीक सर्वाधिक आवडीचे आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कितीही सुरक्षा केली तरी रानडुकर या शेतामध्ये प्रवेश करतात. संपूर्ण शेतच उद्ध्वस्त करतात. लावलेला खर्चही निघत नाही. याला पर्याय म्हणून शेतकरी रबीच्या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. गहू, हरभरा या पिकांच्या माध्यमातून शेतात उत्पादन काढण्यासाठी त्यांचा सर्वाधिक भर आहे. तर, उन्हाळी पिकामध्ये तेलबियांसाठी पाहिजे त्या प्रमाणात लागवड होत नाही. उन्हाळ्यात पाणी पुरेल किंवा नाही याचाही प्रश्न अनेकांकडे असतो. शिवाय, इतरत्र पीक नसल्याने उन्हाळ्यात हिरवळ असणाऱ्या भागात वन्यप्राण्यांचा आणि मोकाट जनावरांचा धुमाकूळ असतो. यातून तेलबियांचे क्षेत्र कमी झाले आहे.

जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकरी पीक घेण्यासाठी तयार आहेत. मात्र, वन्यप्राण्यांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे तेलबिया पेरताना शेतकरी आखडता हात घेतात. तेलबियांचा उत्पादनखर्चही वाढला आहे. मिळणारा भाव कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर रबीच्या पिकाकडे वाढला आहे. यातूनच जिल्ह्यातील तेलबियांचे क्षेत्र घटले आहे.- नवनाथ कोळपकर, कृषी अधीक्षक, यवतमाळ

करडई, सूर्यफुल हद्दपारतेलबिया म्हणून करडईची पूर्वी मोठ्या प्रमाणात लागवड होत होती. हे पीक काढणी करताना अतिशय जोखमीचे आहे. यामध्ये हाताला इजा होते. अलीकडे मजुरांना सुविधा असेल तरच कामावर जाण्याची परंपरा वाढली आहे. यामुळे करडईचे पीक कालबाह्य झाले आहे. तर सूर्यफुल पिकावर पक्ष्यांचे आक्रमण मोठ्या प्रमाणात होते. खाण्यासाठी अन्न म्हणून पक्षी मोठ्या प्रमाणात या शेतशिवारात शिरतात. यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका बसतो. या पिकाला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यामुळे तेलबियांचे वाण म्हणून ओळखले जाणारे ही दोनही पिके जिल्ह्यातून हद्दपार झाली आहेत.

तेलबिया लागवड करताना वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात धोका वाढला आहे. याशिवाय भारनियमनाचाही प्रश्न आहे. यामुळे पाणी उपलब्ध असले तरी ओलीत करता येत नाही. याशिवाय शेतमालास चांगला दरही मिळत नाही. तेलबियांचे पीक घेताना रात्री जागल करावी लागते. जंगली जनावरे रखवाली करणाऱ्यांवर धावून येतात. यामुळे शेतकऱ्यांनी तेलबियांचे पीक कमी केले आहे.- मनीष जाधव, शेतकरी, महागाव

 

टॅग्स :agricultureशेती