शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

शेतधुऱ्यावरील सागवान कटाईसाठी अडवणूक

By admin | Updated: February 22, 2017 01:21 IST

प्रचंड मेहनत घेऊन स्वत:च्या शेतातील धुऱ्यावर वाढविलेले सागवान तोडण्यासाठी शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.

प्रश्न गंभीर : वनखात्याविषयी रोष, सेवानिवृत्तांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन यवतमाळ : प्रचंड मेहनत घेऊन स्वत:च्या शेतातील धुऱ्यावर वाढविलेले सागवान तोडण्यासाठी शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. वनविभागाकडून होणारी अडवणूक या शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरत आहे. दुसरीकडे जंगल ठेकेदारांचे मात्र चांगलेच फावत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी हा प्रश्न सेवानिवृत्त अधिकारी भीमराव झळके यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मांडला आहे. शेती पिकासोबतच पूरक उत्पन्न व्हावे यासाठी अनेक शेतकरी शेताच्या धुऱ्यावर सागवानाची लागवड करतात. त्याचे संगोपन करून वाढवितात. झाडे परिपक्व झाल्यानंतर चांगली रक्कम हाती पडेल, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र बहुतांशवेळा त्यांच्या आशेवर वनविभागाच्या अडवणुकीच्या धोरणामुळे पाणी फेरले जाते. शेताच्या धुऱ्यावर तसेच शेतामधील परिपक्व झालेली झाडे (सागवान) तोडण्यासाठी शेतकरी वनविभागाकडे अर्ज दाखल करतात. हे अर्ज निकाली काढण्यासाठी कित्येक दिवसांचा कालावधी लावला जातो. वारंवार येरझारा करूनही अर्जावर विचार होत नाही. गरज असतानाच या कामासाठी त्यांची अडवणूक केली जाते. कंत्राटदाराचे काम मात्र कुठल्याही अडथळ्याशिवाय निकाली काढले जाते. नाईलाजाने का होईना शेतकऱ्यांना आपल्या शेतातील सागवान कमी दराने विकावे लागतात. वनविभागाकडून होत असलेली अडवणूक भीमराव झळके यांनी स्वत: घेतलेल्या अनुभवाच्या आधारेच या निवेदनातून मांडली आहे. त्यांनी २५ मे २०१५ पूर्वी शेतातील सागवान वृक्ष कटाईसाठी वनविभागाकडे अर्ज केला होता. तब्बल दीड वर्षांनंतर त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला. सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसोबतच असा व्यवहार होत असेल तर सामान्य शेतकऱ्यांचे काय हाल असेल, असा प्रश्न त्यांनी या निवेदनातून मांडला आहे. शासनाने या गंभीर प्रश्नावर विचार करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. १ एप्रिलला अर्ज आणि ३१ मेपर्यंत परवानगी अशा दोन महिन्यांच्या कालावधीत परवानगी मिळायला हवी असे त्यांनी या निवेदनातून सुचविले आहे. या काळात शेतामध्ये पीक उभे राहात नाही. त्यामुळे शेती पिकाचे नुकसान टाळले जावू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी या निवेदनावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणीही झळके यांनी केली आहे. (वार्ताहर)