शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

७१७ पदांच्या भरतीत आदिवासींना फक्त तीन जागा; आरक्षणावर फिरविला वरवंटा

By अविनाश साबापुरे | Updated: November 18, 2023 14:02 IST

उत्पादन शुल्क विभागाच्या जाहिरातीवरून संतापाची लाट

यवतमाळ : राज्य उत्पादन शुल्क विभागाअंतर्गत राज्यस्तरीय जवान पदभरतीसाठी ७१७ जागांची जाहिरात निघाली आहे. परंतु, यात साडेसात टक्के आरक्षण असलेल्या आदिवासींकरिता केवळ ३ पदे आरक्षित ठेवण्यात आली आहेत. एकीकडे आरक्षणासाठी राज्यात आंदोलनांचे वादळ उठलेले असताना राज्य सरकारने आदिवासी आरक्षणावर वरवंटा फिरविल्याचा संताप बेरोजगार युवकांमधून उमटत आहे.

या विभागात वाहनचालक, लघुलेखक, लघुटंकलेखक, चपराशी अशी पदे भरली जाणार आहेत. त्यात आदिवासींना केवळ जवान या एकाच संवर्गातील ५६८ जागांपैकी केवळ ३ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. इतर संवर्गाच्या पदांमध्ये तर एकही जागा त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेली नाही. यापूर्वी छोट्या संवर्गातील बिंदूनामावलीमध्ये आदिवासींचा बिंदू चोरून छोट्या संवर्गातील बिंदूनामावलीत आदिवासींना आठव्या क्रमांकावर फेकण्यात आले. आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पदभरतीत राज्यघटनेनुसार आदिवासींना मिळालेले ७.५० टक्के आरक्षण डावलण्यात आले आहे.

या पदभरतीमध्ये एससी, एनटी-सी, इडब्ल्यूएस अशा प्रवर्गांना त्यांच्या आरक्षणाच्या टक्केवारीनुसार आरक्षित पदे उपलब्ध होत आहेत. परंतु, आदिवासींची पदे कोणत्या आधारावर कमी करण्यात आली, याबाबत आदिवासी संघटनांनी सवाल उपस्थित केला आहे. सरकारने तत्काळ ही जाहिरात रद्द करावी. छोट्या संवर्गातील बिंदूनामावली दुरुस्त करावी. अन्यथा हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांना नागपुरात फिरकूही देणार नाही, अशी भूमिका आदिवासी संघटनांनी घेतली आहे.

कोणत्या प्रवर्गाला किती जागा?

उत्पादन शुल्क विभागात जवान या संवर्गाची एकूण ५६८ पदे भरली जात आहे. त्यात १३ टक्के आरक्षण असलेल्या एससी प्रवर्गाला ८१ पदे आरक्षित आहेत. तर फक्त ३.५ टक्के आरक्षण असणाऱ्या एनटी-सी प्रवर्गाला २५ पदे आरक्षित आहेत. इडब्ल्यूएस प्रवर्गाकरिता १० टक्के आरक्षणानुसार ५७ पदे आरक्षित आहेत. मात्र ७.५० टक्के आरक्षण असलेल्या एसटी प्रवर्गाला केवळ ३ पदे राखीव ठेवण्यात आली. 

महाराष्ट्र सरकार वारंवार आदिवासींविरोधी भूमिका घेत आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या जाहिरातीमधून ही बाब पुन्हा उघड झाली आहे. राज्यसरकारने तत्काळ ही जाहिरात रद्द करून, छोट्या संवर्गातील बिंदूनामावली २९ मे २०१७ प्रमाणे पूर्ववत करावी. अन्यथा येत्या हिवाळी अधिवेशनात आदिवासी समाज मंत्र्यांना विदर्भात फिरू देणार नाही.

- प्रा. मधुकर उईके, केंद्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन

संविधानानुसार आदिवासींना शिक्षण, नोकऱ्यांमध्ये ७.५ टक्के आरक्षण आहे. परंतु महायुती सरकारमध्ये आदिवासींच्या घटनात्मक आरक्षणाला छेद देण्याचे काम सुरू असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या जाहिरातीवरून दिसते. शासनाने सदर जाहिरात तात्काळ रद्द करून आदिवासींच्या आरक्षणानुसार नव्याने जाहिरात प्रसिद्ध करावी.

- एम. एम. आत्राम, अध्यक्ष, महाराष्ट्र ट्रायबल ऑफिसर फोरम

टॅग्स :jobनोकरीGovernmentसरकार