शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

पांढरकवडा तालुक्यात अशुद्ध पाणीपुरवठा, आरोग्य धोक्यात : ग्रामपंचायतीने शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:41 IST

ग्रामीण भागात विहिरी, नद्या, नाले, हातपंपाद्वारे गावकरी आपली तहान भागवतात. जनतेला शुद्ध पाणी पोहोचविणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी ...

ग्रामीण भागात विहिरी, नद्या, नाले, हातपंपाद्वारे गावकरी आपली तहान भागवतात. जनतेला शुद्ध पाणी पोहोचविणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. परंतु प्रशासनातर्फे त्यांची योग्य ती अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे स्वच्छ पाणीपुरवठा करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणी मिळावे म्हणून अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या. परंतु या योजनांचा राबविल्या जात नसल्याने ग्रामस्थांना अशुद्ध पाणी प्यावे लागते. तालुक्यात अनेक गावांत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. हातपंप, सार्वजनिक विहिरी, बोअरवेलमधून ग्रामस्थांना पाणीपुरवठा होतो. पाणी पिण्यासाठी योग्य आहे किंवा नाही, यासाठी पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणे आवश्यक आहे. तशा प्रशासनाच्या सूचना असतात. परंतु या सूचनेकडे गंभीरतेने पाहिले जात नाही. स्थानिक प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. पाणी अशुद्ध आहे, हे माहीत असूनही बरेचदा पाण्याचे दुसरे स्त्रोत उपलब्ध नसल्याने त्याच पाण्याचा पुरवठा केला जातो. अनेक गावांत फ्लोराईडयुक्त पाणी असून ते पिण्यास अयोग्य आहे. तरीही ग्रामस्थांना तेच पाणी प्यावे लागते. त्यामुळे अनेकांना हाडाचे आजार झाले आहे. तालुक्यातील काही गावांत पिण्याचे पाण्याचे नियोजन अतिशय चांगले असल्याचेही दिसून येते. वॉटर फिल्टर लावून नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यास उपलब्ध करून दिल्याचेही उदाहरण काही गावात दिसून येते. परंतु अशा गावांची संख्या फार जास्त नाही.