शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

नोटाबंदीने शासकीय योजना प्रभावित

By admin | Updated: February 13, 2017 01:11 IST

मोदी सरकारने आकस्मिकपणे नोटाबंदीचा निर्णय घेतल्याने राज्यातील विविध शासकीय योजना प्रभावित झाल्या आहे.

अशोकराव चव्हाण : तळणी येथील प्रचार सभेत केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका आर्णी/तळणी : मोदी सरकारने आकस्मिकपणे नोटाबंदीचा निर्णय घेतल्याने राज्यातील विविध शासकीय योजना प्रभावित झाल्या आहे. भाजपा सरकार फसवे सरकार असून खोटे बोलून जनतेची दिशाभूल करीत असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात आर्णी तालुक्यातील तळणी येथे आयोजित जाहीर सभेत रविवारी केले. अशोकराव चव्हाण म्हणाले, नोटाबंदीच्या निर्णयाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळापासून ग्रामीण भागाचा कायापालट करणारी इंदिरा आवास योजना, राजीव गांधी जीवनदायी योजना, रोजगार हमी योजना प्रभावित झाली आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. केंद्र व राज्य सरकारवर टीका करताना चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांना विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. अतिवृष्टीचा मोबदलाही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. सर्वसामान्यांंना केवळ काँग्रेसनेच न्याय दिला, असे ते म्हणाले. आर्णी तालुक्यातील दाभडी येथे ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेण्यात आला होता. परंतु त्याचा काय फायदा झाला असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच राज्यसभेतील चर्चेच्या वेळीस माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी बोलताना माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी काँग्रेसमध्ये लाभाचे पद भोगून पक्ष सोडून गेलेल्यांना आपली जागा दाखविण्याचे आवाहन केले. तर माजी मंत्री अनिस अहमद म्हणाले, काँग्रेसच्या काळात राबविलेल्या योजनांमुळे सर्वसामान्यांचा विकास झाला. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने गोरगरिबांचा विकास केला असून त्यांंना सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी आमदार भाई जगताप यांनी भाजपा सरकारच्या काळात शेतमालाला योग्य भाव मिळत नसून शेतकऱ्यांना कर्ज फेडणे कठीण झाल्याचे सांगितले. सरकारने जनतेची फसवणूक केली असून विकासासाठी काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन केले. या सभेला साजीद बेग, शाहीद रयाणी, जीवन पाटील, सतीश हिराणी, राजू विरखेडे, सुनील भारती, प्रदीप वानखेडे यांच्यासह आर्णी तालुक्यातील काँग्रेसचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. संचालन आरिज बेग यांनी तर आभार अनिल आडे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)