शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

इस्लाममध्येही अहिंसेलाच महत्त्व

By admin | Updated: December 28, 2015 03:00 IST

इस्लाम धर्मामध्ये अहिंसेलाच अनन्यसाधारण महत्व आहे. कोठेही हिंसेचे समर्थन केले जात नाही.

पत्रपरिषद : स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाचा उपक्रमयवतमाळ : इस्लाम धर्मामध्ये अहिंसेलाच अनन्यसाधारण महत्व आहे. कोठेही हिंसेचे समर्थन केले जात नाही. जिहादच्या नावाखाली होत असलेला रक्तपात हा इस्लाममध्ये निषिद्ध आहे, असे स्वामी लक्ष्मी शंकराचार्य यांनी पत्रपरिषदेत सांगितले. स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडिया (एसआयओ) या संघटनेकडून मोहंमद पैगंबर यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. हेच औचित्य साधून एसआयओने २१ ते ३० डिसेंबरदरम्यान ‘मोहंमद पैगंबर (स.) शांतीदूत’ या शीर्षकाखाली दहा दिवसीय अभियान राबविले. इसीसच्या माध्यमातून चुकीचा इस्लाम सांगितल्या जात आहे. त्यामुळेच काही मुस्लीम तरुण खऱ्या इस्लामपासून भरकटले आहे. गैरमुस्लीमांमध्येही इस्लामबाबत गैरसमज आहेत. हे दूर करण्यासाठी हे जाणीव जागृती अभियान हाती घेतले आहे. मशिदीमध्ये इमामांच्या माध्यमातून शांती कायम करण्याचा संदेश दिला जातो, असे एसआयओचे विभागीय अध्यक्ष रेहान फजल यांनी पत्रपरिषदेत सांगितले. काही संधिसाधूंनी इस्लामची चुकीची प्रतिमा जगासमोर आणली आहे. भारतातील २३ कोटी मुसलमानांमपैकी केवळ बोटावर मोजण्याइतकेच इसीसच्या प्रभावात आले आहेत. यावरून शांतताप्रिय मुसलमानांची संख्या देशात अधिक असल्याचे दिसून येते. हिंदू-मुस्लीम जनएकता मंचच्या माध्यमातून हाच जागृतीचा उपक्रम राबविल्या जात आहे, असे स्वामी लक्ष्मी शंकराचार्य यांनी सांगितले. पत्रपरिषदेला एसआयओचे जिल्हा शाखाध्यक्ष जियाऊररहेमान, जमाते इस्लामी हिंदचे अजमत उल्ला खान, निझान काझी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)