शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

जिल्हा परिषद पदांमध्ये असमतोल

By admin | Updated: April 5, 2017 00:15 IST

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवडणुकीत असमतोल निर्माण झाला आहे.

सहा तालुक्यांना एकही पद नाही : दहा सदस्य असूनही पुसद विभाग वंचित यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवडणुकीत असमतोल निर्माण झाला आहे. यवतमाळपासून पश्चिमेकडे असलेल्या अर्ध्या जिल्ह्यात एकही पद मिळाले नाही. विशेष असे सर्वाधिक दहा जागा पुसद विभागातून राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत. मात्र त्यांची एकजूट कमी पडल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आर्णी तालुक्याला तर उपाध्यक्ष पद यवतमाळ तालुक्याला गेले आहेत. सभापती निवडीत बाभूळगाव, कळंब, पांढरकवडा, मारेगाव या चार तालुक्यांना संधी मिळाली. परंतु यवतमाळपासून दारव्हा-पुसद विभागाला संधीच देण्यात आली नाही. नेर, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, महागाव हे तालुके पदांपासून वंचित राहिले. काँग्रेसने शिवसेनेची आॅफर स्वीकारली असती तर उमरखेड तालुक्याला निश्चितच सभापतीपद काँग्रेसच्या कोट्यातून मिळाले असते. शिवसेना-राष्ट्रवादी असे सुरुवातीचे समीकरण जुळले असते तरी पुसद विभागाला किमान एक-दोन सभापतीपदे मिळाली असती. परंतु भाजपा-राष्ट्रवादी-काँग्रेस या समीकरणात जणू अर्ध्या जिल्ह्यालाच पदांपासून दूर रहावे लागले. जिल्ह्याच्या राजकारणात पुसद विभागाचे वेगळे वजन आहे. या विभागाला वगळून काहीच होत नाही. परंतु जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच पुसद विभागाला सत्तेपासून दूर ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. त्यासाठी नेत्यांचे ‘बॅकफुट’वर येण्याचे धोरण कारणीभूत ठरल्याचा सूर ऐकायला मिळतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ जिल्हा परिषदेत ११ एवढे आहे. त्यातील तब्बल दहा जागा पुसद-उमरखेड-महागाव या तालुक्यांमधील आहेत. असे असताना या तालुक्यांनाच पदापासून वंचित रहावे लागल्याने पुसद-उमरखेड विभागाचे राजकीय वजन घटले काय? असा प्रश्न जिल्ह्याच्या राजकारणात उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपाच्या कोट्यातून पुसदला एक सभापतीपद आणण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न झाले. मात्र भाजपा पुसदला सभापतीपद देणार नाही, या प्रमुख अटीवरच राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत भाजपाला पाठिंबा दिल्याचे बोलले जाते. भाजपा-काँग्रेस-राष्ट्रवादी या अनैसर्गिक युतीने अनेकांचे राजकीय मनसुबे मात्र उधळले गेले, एवढे निश्चित. (जिल्हा प्रतिनिधी)