शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

घाटंजीत अवैध वाहतूक जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 22:10 IST

गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस नेमके करतात तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध वाहतूक जोमात असताना पोलीस मात्र कोमात गेल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देपोलीस प्रशासन कोमात : वाहतुकीची ऐसीतैसी, तपासणीच्या नावाखाली लूट

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस नेमके करतात तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवैध वाहतूक जोमात असताना पोलीस मात्र कोमात गेल्याचे दिसत आहे.येथील पोलीस ठाण्यात वाहतूक पोलीस म्हणून दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. मात्र अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर त्यांचा वचक राहिला नाही. त्यामुळे वाहतूकदार दिवसभरात चार ते पाचदा येणे-जाणे करतात. घोटी, कुर्ली, पाटापंगरा, अकोलाबाजार, पारवा, येळाबारा, रूंझा येथे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. वाहनधारक जादा पैसा मिळविण्याच्या हेतूने वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवितात. यामुळे प्रवाशांची सुरक्षा टांगणीला लागली आहे.जादा प्रवासी वाहतुकीमुळे वाहनांचा मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. हे अवैध प्रवासी वाहतूक करणारे एस.टी.बस येण्याच्या काही मिनिटांपूर्वीच आपली वाहने प्रवाशांनी खचाखच भरुन आपापल्या दिशेने रवाना होतात. यामुळे एस.टी.प्रशासनाला चुना तर लागतोच, शिवाय नागरिकांनाही जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो. वाहतूक पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतुकीस वेळीच आळा घालून वाहनधारकांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने पोलीस ठाण्यासमोरून धावतात. तरीही कागदपत्रांची तपासणी केली जात नाही. चालक परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, वाहन फिटींग प्रमाणपत्रांची तपासणीच होत नाही. वाहनाचे छत व बोनटवर प्रवासी वाहून नेत असतानाही पोलीस दुर्लक्ष करतात. त्यांना हात दाखविण्याची हिम्मतही पोलीस करीत नाही. यामुळे अशा वाहनांचा अपघात होऊन नागरिकांचा बळी जाण्याची शक्यता बळावली आहे. अपघातांत नागरिकांचा बळी गेल्यास वाहतूक पोलिसांवर गुन्हे दाखल करायचे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहे. दुसरीकडे तपासणीच्या नावाखाली दुचाकी चालकांना त्रास दिला जातो.‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे पोलिसांचे दुर्लक्षअवैध प्रवासी वाहतुकीकडे ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे वाहतूक पोलीस दुर्लक्ष करतात. वाहनधारकांकडून दरमहा ठरावीक रक्कम उकळतात. यातूनच एका वाहतूक शिपायाने मोठी माया गोळा केली. विशेष म्हणजे संबंधित कर्मचारी गेल्या आठ वर्षांपासून येथे ठाण मांडून आहे. एवढ्या वर्षात त्यांची बदली का झाली नाही, असा प्रश्न जनतेला पडला आहे. संबंधित कर्मचारी ‘लाभाचे पाट’ वरिष्ठांपर्यंत तर पोहोचवीत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. येथे नव्यानेच रुजू झालेल्या ठाणेदार व वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन जनतेच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवावा, अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस