शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या महसुलासाठी दारूबंदीकडे डोळेझाक

By admin | Updated: October 10, 2016 01:59 IST

दारुविक्रीतून सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. त्यामुळेच दारुबंदीकडे डोळझाक केली जाते. बिहारसारखे

दारुविक्रीतून सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. त्यामुळेच दारुबंदीकडे डोळझाक केली जाते. बिहारसारखे राज्य दारुबंदीचा निर्णय घेऊ शकते, तर इतर राज्य का नाही? नशेच्या मार्गातून कोट्यवधी रुपये मिळत असले तरी लाखो भारतीयांची पिढी बरबाद होत आहे. पैसा महत्त्वाचा की जीव याचा निर्णय सरकारने घ्यावा. म्हणूनच सर्व राज्यांना आमचे आवाहन आहे, ‘शराब का व्यापार, छोड दे सरकार’, अशा सडेतोड शब्दात नर्मदा बचाव आंदोलनाच्या मुख्य संयोजक मेधा पाटकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नशामुक्त भारत यात्रेदरम्यान कळंब येथे आल्या असता रविवारी मेधा पाटकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत विविध विषयांवर रोखठोक भूमिका मांडली. भूमिअधिग्रहणाचा कायदा नियमबाह्यच नव्हेतर सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मारक होता. त्याविरुद्ध आम्ही एकजुटीने उभे राहिलो. त्यामुळेच मोदी सरकारला हा कायदा रद्द करावा लागला. याचा फायदा शेतकरी व शेतमजुरांना मिळणार आहे. पाणी नियोजन, ऊर्जा नियोजन, गृहनिर्माण, आरोग्य, शिक्षण, शेती आदी विषयांच्या विकासात्मक कामात नैसर्गिक तत्त्वे पाळली गेली पाहीजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पोलीस प्रशासन दारुवाल्यांशी मिळालेले आहे. राजकीय नेत्यांचेच दारुचे कारखाने आहे. अनेक ठिकाणी त्यांची भागीदारी आहे. त्यामुळे हे सर्व धंदे बंद करण्यासाठी जनरेटा महत्त्वाचा आहे. दारुचा सर्वात जास्त फटका महिलांनाच सहन करावा लागतो. त्यामुळे महिलाशक्तीने आता पुढे आले पाहिजे. गावा-गावातून महिला दारुबंदीसाठी पुढे येत असताना महाराष्ट्र सरकार दाद देत नाही. पारोमिता गोस्वामी, अभय बंग, राणी बंग, महेश पवार, भाई रजनिकांत, शुभदा देशमुख, सतीश गोगुलवार आदीसह अनेक जण दारुबंदीसाठी आंदोलन करीत आहे. परंतु, आता हे आंदोलन अधिक तीव्र केले पाहिजे. यासाठी गांधीवादी आणि मार्क्सवादी यांनी एकत्र आले पाहिजे. वर्ध्यात गांधीजींना स्मरून दारुबंदी झाली. परंतु, पवनार येथून विनोबांच्या आश्रमाजवळूनच दारुविक्री केली जाते. हे सरकारचे मोठे अपयश आहे. हा प्रकार बंद करण्यासाठी सरकारला आवाहन केले जाणार आहे. यापुढे आव्हान देण्याची तयारीही आम्ही करीत आहो. नर्मदेच्या लढ्याला आता ३१ वर्षे पूर्ण झाली. नर्मदेचा लढा हा विस्थापितांच्या हक्कासाठी आहे. सरदार सरोवराचे दररोज ३० लाख लिटर पाणी केंद्र सरकार कोकाकोला कंपनीला देते. हेच पाणी उद्योगाला देण्याचा घाट घातला जात आहे. तीन शहरांना भरपूर पाणी दिले. परंतु ८ हजार २०० गावे तहानलेली ठेवली. याविरोधात लढा उभारण्याची तयारी सुरु आहे. येत्या २१, २२ आॅक्टोबरला मुंबईमध्ये राष्ट्रीय परिषद होत आहे. परिषदेला अनेक मुख्यमंत्री व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, जनआंदोलनाचे नेते एकत्र येत आहे. तेथूनच औद्योगिकीकरण व जागतिकीकरणाच्या विरोधात देशापुढे एक नवा अजेंडा ठेवला जाईल, अशी माहिती मेधा पाटकर यांनी दिली. १६ राज्यांतील संघटना एकवटल्या दारूविक्रीतून महाराष्ट्र २३ हजार कोटी, आंध्र प्रदेश ५० हजार कोटी, तेलंगणा १४ हजार कोटी, तमीळनाडू २६ हजार कोटी रुपये कमविते. इतर राज्यही यात मागे नाहीत. चिंतेची बाब म्हणजे, राज्य सरकारे ही आकडेवारी गर्वाने सांगतात. या विरोधात आता १६ राज्यांतील सामाजिक संघटना एकत्र आल्यात. यासाठी १ जुलै रोजी दिल्ली येथे विचारमंथन करण्यात आले. त्या ठिकाणी नशामुक्त भारत आंदोलनाची स्थापना झाली. आता भारतभर जनजागृती केली जात आहे. ही यात्रा त्याचाच एक भाग असल्याचे मेधा पाटकर म्हणाल्या.