शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

लवादाच्या निर्देशांकडे डोळेझाक

By admin | Updated: August 5, 2014 23:36 IST

पर्यावरणविषयक जनहित याचिकेवर निर्णय देताना पुणे येथील हरीत लवादाने तीन महिन्यांपूर्वी संबंधितांना प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना आखण्याचे निर्देश दिले होते. मात्र शासन

वणी : पर्यावरणविषयक जनहित याचिकेवर निर्णय देताना पुणे येथील हरीत लवादाने तीन महिन्यांपूर्वी संबंधितांना प्रदूषण नियंत्रणासाठी विविध उपाययोजना आखण्याचे निर्देश दिले होते. मात्र शासन दरबारी अद्याप कोणत्याच हालचाली दिसून येत नसल्याने लवादाच्या निर्देशांचे उल्लंघन होत असल्याचा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास, शहरालगत असलेली रेल्वेची कोल साईडिंग, मारेगाव मार्गावरील लालपुलियात बेकायदेशीर सुरू असलेले कोल डेपो हटविणे व कोळसा वाहतुकीच्या मार्गालगतच्या शेतीच्या नुकसानीसंदर्भात तसेच कोळसा वाहतुकीने केलेल्या रस्ता उद्ध्वस्तप्रकरणी सन २०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत केंद्र सरकारचे मुख्य रेल्वे सचिव, महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाचे मुख्य सचिव, वेकोलि नागपूरचे सीएमडी, रेल्वेचे विभागीय अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूरचे अधिकारी, बी़एस़ इस्पात लिमिटेड, विरांगणा स्टील लिमिटेड, उपप्रादेशिक परिवहन अीधकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी वणी, पोलीस उपविभागीय अधिकारी वणी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा, अशा जणांना प्रतिवादी करण्यात आले होते़ ही याचिका पर्यावरणसंदर्भात असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून ती पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाकडे वळती करण्यात आली होती़ त्यावर तीन महिन्यांपूर्वी लवादाने निर्णय दिला. त्या निर्णयानुसार प्रदूषण नियंत्रणासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाला सहा आठवड्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून आयआयटी, निरी या संस्थेकडून ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्या ‘अ‍ॅक्शन प्लॅन’वर उपविभागीय अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाला नियंत्रण ठेवण्याचे निर्देश होते. हा अ‍ॅक्शन प्लॅन प्रदूषण नियंत्रण मंडळाने चार आठवड्यात तयार करवून घ्यावयचा होता. तसेच वणी परिसरात पुढील १२ आठवड्यात वायू तपासणी केंद्र उभारण्याचे निर्देश हरीत लवादाने दिले होते. या वायू तपासणी केंद्राकडून तीन वर्षे परिसरातील वायू तपासायची आहे़ तो कालावधी वाढविण्याची तरतूददेखील लवादाच्या निर्णयात आहे़ हे केंद्र उभारणीसाठी लागणारा ५० टक्के खर्च प्रदूषण नियंत्रण विभाग व ५० टक्के खर्च कोळसा व्यावसायिकांकडून घ्यावयाचा आहे. त्यानंतर दर महिन्याला प्रदूषण नियंत्रण मंडळ व उपप्रादेशिक परिवहन विभागाने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश होते. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांना दर तीन महिन्यांनी कृषी विभाग व आरोग्य विभाग अहवाल देणार होता. या दोन विभागांनी दिलेल्या अहवालानुसार वायू प्रदूषण क्रमश: कमी होत आहे की नाही, हे ठरवण्यात येणार होते. (कार्यालय प्रतिनिधी)