शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
8
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
9
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
10
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
11
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
12
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
13
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
14
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
15
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
16
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
17
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
18
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
19
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...

शेतकऱ्यांच्या भोवती समस्यांचा विळखा

By admin | Updated: November 29, 2015 03:12 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे घाटंजी तालुका सतत चर्चेत आहे. परंतु शेतमाल मेहनतीने पिकविल्यानंतरही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाही.

घाटंजी : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे घाटंजी तालुका सतत चर्चेत आहे. परंतु शेतमाल मेहनतीने पिकविल्यानंतरही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाही. कापूस खरेदीमध्ये व्यापाऱ्यांकडून लूट होत असल्याने ‘मालामाल’ शेतकरीही कंगाल झाले आहेत.गेल्या तीन वर्षांपासून सतत नापिकीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. विजेच्या भारनियमनामुळे कापसासह सोयाबीन उत्पादनात प्रचंड घट झालेली आहे. आता रबीचा पेरा करतानाही शेतकऱ्यांना भारनियमनाच्या अनिश्चिततेमुळे धोका वाटत आहे. याच धसक्यापायी अनेक शेतकऱ्यांनी रबीची पेरणी करणेही टाळले आहे. अशा विविध प्रकारच्या समस्यांनी शेतकरी खचून गेला आहे. हा तालुका कापूस उत्पादनात पूर्वीपासून अग्रेसर राहिला आहे. परंतु हमी भाव अत्यंत कमी मिळत आहे. व्यापारी तर हमी भावापेक्षाही कमी दराने शेतमाल घेण्याची संधी शोधत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी सोयाबीनच्या लागवडीकडे वळले होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनचा उतारा अपेक्षेपेक्षाही खूपच कमी येत असल्याने यापुढे कापसाला कोणता पर्याय शोधावा, या पेचात शेतकरी सापडले आहे. तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहो, अशी वक्तव्ये जाहीर कार्यक्रमातून वारंवार करतात. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांसाठी कोणताही लोकप्रतिनिधी शासन दरबारी जोरकसपणे बाजू मांडताना दिसत नाही. (प्रतिनिधी)