शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

शेतकऱ्यांच्या भोवती समस्यांचा विळखा

By admin | Updated: November 29, 2015 03:12 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे घाटंजी तालुका सतत चर्चेत आहे. परंतु शेतमाल मेहनतीने पिकविल्यानंतरही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाही.

घाटंजी : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे घाटंजी तालुका सतत चर्चेत आहे. परंतु शेतमाल मेहनतीने पिकविल्यानंतरही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाही. कापूस खरेदीमध्ये व्यापाऱ्यांकडून लूट होत असल्याने ‘मालामाल’ शेतकरीही कंगाल झाले आहेत.गेल्या तीन वर्षांपासून सतत नापिकीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. विजेच्या भारनियमनामुळे कापसासह सोयाबीन उत्पादनात प्रचंड घट झालेली आहे. आता रबीचा पेरा करतानाही शेतकऱ्यांना भारनियमनाच्या अनिश्चिततेमुळे धोका वाटत आहे. याच धसक्यापायी अनेक शेतकऱ्यांनी रबीची पेरणी करणेही टाळले आहे. अशा विविध प्रकारच्या समस्यांनी शेतकरी खचून गेला आहे. हा तालुका कापूस उत्पादनात पूर्वीपासून अग्रेसर राहिला आहे. परंतु हमी भाव अत्यंत कमी मिळत आहे. व्यापारी तर हमी भावापेक्षाही कमी दराने शेतमाल घेण्याची संधी शोधत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी सोयाबीनच्या लागवडीकडे वळले होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनचा उतारा अपेक्षेपेक्षाही खूपच कमी येत असल्याने यापुढे कापसाला कोणता पर्याय शोधावा, या पेचात शेतकरी सापडले आहे. तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहो, अशी वक्तव्ये जाहीर कार्यक्रमातून वारंवार करतात. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांसाठी कोणताही लोकप्रतिनिधी शासन दरबारी जोरकसपणे बाजू मांडताना दिसत नाही. (प्रतिनिधी)