शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकऱ्यांच्या भोवती समस्यांचा विळखा

By admin | Updated: November 29, 2015 03:12 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे घाटंजी तालुका सतत चर्चेत आहे. परंतु शेतमाल मेहनतीने पिकविल्यानंतरही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाही.

घाटंजी : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे घाटंजी तालुका सतत चर्चेत आहे. परंतु शेतमाल मेहनतीने पिकविल्यानंतरही शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाही. कापूस खरेदीमध्ये व्यापाऱ्यांकडून लूट होत असल्याने ‘मालामाल’ शेतकरीही कंगाल झाले आहेत.गेल्या तीन वर्षांपासून सतत नापिकीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. विजेच्या भारनियमनामुळे कापसासह सोयाबीन उत्पादनात प्रचंड घट झालेली आहे. आता रबीचा पेरा करतानाही शेतकऱ्यांना भारनियमनाच्या अनिश्चिततेमुळे धोका वाटत आहे. याच धसक्यापायी अनेक शेतकऱ्यांनी रबीची पेरणी करणेही टाळले आहे. अशा विविध प्रकारच्या समस्यांनी शेतकरी खचून गेला आहे. हा तालुका कापूस उत्पादनात पूर्वीपासून अग्रेसर राहिला आहे. परंतु हमी भाव अत्यंत कमी मिळत आहे. व्यापारी तर हमी भावापेक्षाही कमी दराने शेतमाल घेण्याची संधी शोधत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी सोयाबीनच्या लागवडीकडे वळले होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनचा उतारा अपेक्षेपेक्षाही खूपच कमी येत असल्याने यापुढे कापसाला कोणता पर्याय शोधावा, या पेचात शेतकरी सापडले आहे. तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहो, अशी वक्तव्ये जाहीर कार्यक्रमातून वारंवार करतात. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांसाठी कोणताही लोकप्रतिनिधी शासन दरबारी जोरकसपणे बाजू मांडताना दिसत नाही. (प्रतिनिधी)