शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

यवतमाळपासून हाकेच्या अंतरावर असलेले इचोरी तहानलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 12:31 IST

Yawatmal News water यवतमाळ जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले इचोरी गाव आजही प्राथमिक सोयीसुविधांपासून वंचित आहे. दीड हजार लोकसंख्येच्या या गावात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागते.

ठळक मुद्दे गावात नळ याेजनाच नाहीहातपंपावरून भरावे लागते पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले इचोरी गाव आजही प्राथमिक सोयीसुविधांपासून वंचित आहे. दीड हजार लोकसंख्येच्या या गावात पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागते. पाण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी म्हणून नागरिकांनी आमदार, खासदार, जिल्हा प्रशासन यांच्याकडे शेकडो चकरा मारल्या. प्रस्ताव मंजूर झाला. सरकार बदलले आणि पाण्याची योजना थांबली. आजही या गावात नळ योजना नाही. हातपंप आणि एक सार्वजनिक विहीर त्यावरच पिण्याचे पाणी अवलंबून आहे. जानेवारीपासून पाण्याची पातळी कमी होते आणि गावात टँकर सुरू करावा लागतो. यावर्षीही अशीच परिस्थिती कायम राहिली आहे. यामुळे नागरिकांमध्ये निराशेचा सूर आहे.

राजकीय इच्छाशक्ती नसल्याने याेजनेस विलंब

गावासाठी मागच्या सरकारमध्ये पाईपलाईन मंजूर झाली होती.  आता या योजनेसाठी पैसाच नाही. यामुळे गावाचे नळ योजनेचे स्वप्न धुसर झाले आहे. विद्यमान लोकप्रतिनिधींकडे हा विषय   मांडण्यात आला. मात्र आजपर्यंत त्यावर कुठलाही तोडगा निघाला   नाही.

आमच्या गावाला पाण्याचे सुख मिळालेच नाही. पावसाळ्यात किमान हातपंपावर पाणी भरता येते. मात्र जानेवारीपासून पाण्यासाठी पायपीट होते. रोजमजुरी करताना पाणी आणण्यासाठी जास्त वेळ काम करावे लागते. यानंतरही पुरेसे पाणी प्रत्येकाच्या घरी पोहोचत नाही. लहाण्यापासून मोठ्यापर्यंत सारेजण पाणीच आणत असतात. - रंजना ठोंबरे, गृहिणी

खनिज विकास निधी, राष्ट्रीय पेयजल योजना या माध्यमातून ग्रामपंचायतीने नळ योजनेसाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले. या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली. मात्र सरकार बदलले आणि मंजूर झालेली योजनाही थांबली. त्यावेळी ५४ लाख रुपयांचे बजेट होते. आता हे बजेट ७७ लाखांवर पोहोचले आहे. मात्र कुठल्याही हालचाली नाही.- नीळकंठ बोरकर, सरपंच

टॅग्स :water shortageपाणीकपात