शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच मे हिटचा तडाखा

By admin | Updated: April 5, 2016 04:45 IST

जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमानाने ४२ पार केली. साधारणत: मे महिन्याच्या

रुपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमानाने ४२ पार केली. साधारणत: मे महिन्याच्या सुरुवातीला पारा ४२ ते ४४ अंशावर असतो. परंतु यंदा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच नागरिकांना मे हिटचा सामना करावा लागत आहे.अंगाची लाहीलाही करणारे उन्ह तापत असल्याने दुपारी शहरातील रस्ते निर्मुष्य झालेले दिसतात. रात्रीही उशिरापर्यंत उन्हाच्या झळा बसतात. यवतमाळ जिल्ह्यातील गत काही वर्षातील एप्रिल आणि मे महिन्याच्या तापमानावर नजर टाकल्यास यंदाचा उन्हाळा अतिशय कठीण जाईल, अशी अवस्था आहे. २००८ साली एप्रिल महिन्याच्या १५ तारखेनंतर तापमान ४० अंशावर पोहोचले होते. मे महिन्याच्या अखेरीस पारा ४२ अंशापर्यंत गेला होता. २००९ मध्ये चित्र बदलले. १२ ते १५ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट आली होती. परंतु पारा ४० अंशापर्यंतच स्थिर झाला होता. २०१० मध्ये एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तापमानाने उच्चांक गाठला होता. पारा ४३ अंशापर्यंत पोहोचला होता. तर २०११ आणि २०१२ मध्ये एप्रिल महिन्यात दुसऱ्या आठवड्यात तापमान ४१ अंशावर पोहोचले होते. २०१३ मध्ये तर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाने ४० शी पार केली होती. २०१४ मध्येही अशीच अवस्था होती. २०१५ मध्ये एप्रिलच्या अखेरीस पारा ४२ अंशावर गेला होता. गत काही वर्षातील तापमानाची आकडेवारी आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापणारे उन्ह पाहता मे महिन्यात पारा ४६ अंशापर्यंत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उष्णतेच्या लोटेने सर्वत्र तापमानात वाढ होत आहे. सोमवार ४ एप्रिल २०१६ रोजी यवतमाळात ४२.५ अंश तापमानाची नोंद घेण्यात आली. ही लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचे मत हवामान खात्याने व्यक्त केले आहे. सूर्याचा उत्तरायणात प्रवेश झाल्याने तो पृथ्वीच्या जवळ आला आहे. तसेच ग्लोबल वॉर्मिंगने कार्बनडाय आॅक्साईडचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उष्णतेची लाट आली आहे. या लाटेने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. विशेष म्हणजे शहरी भागात तापमान अधिक जाणवत आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात तापमान २ अंशाने अधिक असल्याचे सांगण्यात आले. उन्हाची ही दाहकता आणखी किती वाढणार याचा अंदाज कुणालाही येत नसून उन्हापासून बचाव करण्यासाठी सर्वच जण धडपड करताना दिसत आहे. घरोघरी लागलेले कुलरही तापमानापुढे थिटे पडत आहे. तर उन्हाच्या वाढत्या पाऱ्याचा आरोग्यावरही परिणाम होत आहे.