शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दाक्षिणात्य फायनान्स कंपन्यांकडून ‘शिकार’

By admin | Updated: August 30, 2014 02:07 IST

बँकांनी आधीच कर्ज दिले आणि शेतात पीक नसल्याने अधिकृत सावकार शेतकऱ्यांना कर्ज देत नाही ही बाब हेरुन दक्षिणेतील ..

राजेश निस्ताने यवतमाळ बँकांनी आधीच कर्ज दिले आणि शेतात पीक नसल्याने अधिकृत सावकार शेतकऱ्यांना कर्ज देत नाही ही बाब हेरुन दक्षिणेतील दोन डझनावर फायनान्स कंपन्या शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात सक्रिय झाल्या आहेत. शेतकरी हे एकमेव टार्गेट या कंपन्यांचे असून तब्बल २२.५ टक्के दराने सहज कर्ज दिले जात आहे.गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी कधी ओला दुष्काळ तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करीत आहे. अनेकदा अतिवृष्टीने शेतातील पीक वाहून गेले. तर यावर्षी वेळेवर पाऊसच न झाल्याने कपाशी, तूर, सोयाबीन ही सर्व पिके बुडाली आहेत. जिल्ह्यातील १६ पैकी १४ तालुक्यांमध्ये शासनाने टंचाईसदृश स्थिती जाहीर केली आहे. गेल्या वर्षीसुद्धा संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याची पीक आणेवारी केवळ ४६ टक्के एवढी होती. यावरून जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या एकूणच आर्थिक स्थितीचा अंदाज येतो. शेतकरी आधीच कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी बँकांकडून पीक-पाण्यासाठी कर्ज घेतले. परंतु पीक बुडाले. तडजोड करून कित्येक शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी केली. परंतु पाऊस लांबल्याने या तीनही पेरण्या उलटल्या. पुन्हा नवीन हंगामाची पेरणी करायची झाल्यास बँका कर्जासाठी उभे करीत नाही. तर शेतात पीकच होणार नसल्याने कर्ज कशाच्या भरोश्यावर फेडणार म्हणून अधिकृत सावकारांनी शेतकऱ्यांना कर्ज देणे बंद केले आहे. त्यामुळे संसाराचा गाडा चालवायचा कसा अशा विवंचनेत शेतकरी वर्ग सापडला आहे. पिके बुडाली, घर चालवायचे आहे, रितीरिवाज पाळायचे आहेत, सण-उत्सव काटकसरीने का होईना साजरे करायचे आहे. मात्र त्यासाठी पैसा नाही. शेतकऱ्यांच्या याच विवंचनेचा फायदा उठविण्याचा सपाटा दक्षिणेतील काही फायनान्स कंपन्यांनी सुरू केला आहे. शेतकरी आणि त्याच्या जमिनीचा सातबारा एवढेच टार्गेट या कंपन्यांचे आहेत. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात दोन डझनापेक्षा अधिक फायनान्स कंपन्या आणि त्यांचे शंभरावर एजंट सक्रिय आहे. या एजंटांनी आतापर्यंत शेकडो शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ‘शिकार’ बनविले आहे. दक्षिणेतील या फायनान्स कंपन्यांच्या कर्जाचा व्याज दर अनधिकृत सावकारापेक्षाही कितीतरी अधिक आहे. आधीच कर्जाने पिचलेला आणि कंगाल झालेला शेतकरी आपण नेमकी कोणत्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करतो याची फारशी शहानिशा करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. सर्व काही लुटले गेले असल्याने आता आणखी काय लुटणार म्हणून सहज मिळणाऱ्या या कर्जासाठी शेतकरी कशावरही डोळे लावून स्वाक्षरी करण्यास तयार दिसत असल्याचे चित्र आहे. नाममात्र कर्ज देऊन व पुढे त्याच कर्जाआड शेतकऱ्याला व्याज चक्रात अडकवून त्याची जमीन हडपण्याचा दक्षिणेतील फायनान्स कंपन्यांचा मनसुबा दिसतो. दक्षिणेतील या फायनान्स कंपन्यांनी आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील नेर व दारव्हा या दोन तालुक्यात मोठ्या प्रमाणात कर्ज वितरित केले आहे. याशिवाय अन्य तालुक्यांमध्येही या कंपन्यांचे एजंट फिरत आहेत.