शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

मजुरांवर उपासमारीची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:35 IST

जिल्ह्यातील अनेक भागात एमआरईजीएसची कामे बंद असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम नसल्याने अनेक मजुरांनी स्थानांतर केले आहे. हा प्रश्न शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मांडला आहे.

ठळक मुद्देदुष्काळी स्थिती : एमआरईजीएसच्या कामांसाठी निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील अनेक भागात एमआरईजीएसची कामे बंद असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम नसल्याने अनेक मजुरांनी स्थानांतर केले आहे. हा प्रश्न शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मांडला आहे. कामे तातडीने सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा खासदार भावना गवळी यांनी दिला आहे.जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती आहे. ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम नाही. एमआरईजीएसच्या कामांचा चांगला आधार त्यांना मिळू शकतो. मात्र अनेक भागातून ही कामे बंद झाली आहेत. बोटावर मोजण्याइतकी कामे सुरू आहे. ही कामे मोठ्या प्रमाणात सुरू केल्यास जिल्ह्यातील मजुरांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविला जाऊ शकतो. बाभूळगाव, कळंब, राळेगाव आदी तालुक्यातील मजूर परजिल्ह्यात जाण्याच्या तयारीत आहे. या परिस्थितीत त्यांच्या कुटुंबाची वाताहत होण्याची भीती आहे. या संदर्भात दाखल झालेल्या तक्रारीवरून खासदार भावना गवळी व शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांना निवेदन देण्यात आले.एमआरईजीएसच्या कामात प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची बाब खासदार गवळी यांनी यावेळी आरडीसींच्या निदर्शनास आणून दिली. दहा दिवसात कामे सुरू न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, किशोर इंगळे, अमोल धोपेकर, विनोद काकडे, दिगांबर मस्के, संजय रंगे, पिंटू बांगर, पंचायत समिती सभापती एकनाथ तुमकर, उपसभापती गजानन पाटील, पंचायत समिती सदस्य नंदाताई कडके, वसंत जाधव, राकेश राऊळकर, विजय पाटील, प्रदीप चिव्हाणे, अमित राडे, इंदल राठोड, गणेश वरडे, राजू धोटे, चंदन नित, रमेश धोटे, शशिकांत खोडके, दिनेश हसतबांधे, नीलेश मेत्रे, नाना धानफुले, संजय डफळे, दयानंद बिरके, राहुल खाडे, गणेश आगरे, प्रवीण लांजेवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळी