शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

लाभार्थ्यांवर उपासमारीची पाळी

By admin | Updated: August 16, 2014 23:44 IST

जिल्ह्यातील अन्नपूर्णा योजनेचे चार हजार ६९२ लाभार्थी गेल्या चार महिन्यांपासून वंचित आहे. काही तहसील कार्यालयातील लाभार्थ्यांना फेब्रुवारी तर काहींना एप्रिल महिन्यापासून

अन्नपूर्णा योजना : गेल्या सहा महिन्यांपासून योजनेत धान्याचा तुटवडामहागाव : जिल्ह्यातील अन्नपूर्णा योजनेचे चार हजार ६९२ लाभार्थी गेल्या चार महिन्यांपासून वंचित आहे. काही तहसील कार्यालयातील लाभार्थ्यांना फेब्रुवारी तर काहींना एप्रिल महिन्यापासून धान्यच मिळाले नाही. काही तालुक्यांचा अपवाद वगळता सर्वत्र धान्याचा काळा बाजार होत असून शासनाने नेमून दिलेल्या अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थ्यांचे मात्र धान्याच्या प्रतीक्षेत अवसान गळून गेले आहे. अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थी वृद्ध असून निराधार म्हणून गणले जातात. अशा निराधारांना चार ते सहा महिन्यांपासून धान्यच मिळाले नसल्याने त्यांची स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. एकट्या महागाव तहसील कार्यालयात २६१ लाभार्थी फेब्रुवारी २०१४ पासून या योजनेंतर्गत धान्याच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत स्थानिक प्रशासनाकडे विचारणा केली असता जिल्हास्तरावरून अन्नपूर्णा योजनेंतर्गत कोणत्याच प्रकारचे धान्य मिळाले नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे सांगण्यात आले. जिल्हा पुरवठा विभागात यासंदर्भात विचारणा केली असता जिल्ह्याला चार हजार ६९२ एवढ्या लाभार्थ्यांचे या योजनेंतर्गत उद्दिष्ट देण्यात आले असून यातील काही लाभार्थी मरण पावले आहेत तर काही लाभार्थी अंत्योदय योजनेत वर्ग करण्यात आले आहेत. डाटा एन्ट्रीचे काम सुरू असल्याने नेमका यातील मयत आणि अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी किती हे आताच सांगता येणार नाही. सदर काम पूर्ण झाल्यानंतर यासंदर्भातील आकडेवारी सांगण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये म्हणून दर महिन्याच्या पाच तारखेला किंवा मागे-पुढे होणाऱ्या जिल्हा पुरवठा विभागाच्या बैठकीत इतर योजनेतील धान्य अन्नपूर्णा योजनेत वर्ग करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे, अशी माहिती पुरवठा विभागात कार्यरत चांदोरे यांनी दिली. त्यामुळे अशा योजनेतील लाभार्थ्याला धान्यापासून वंचित ठेवता येणार नाही. सध्या अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थ्याला पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ मोफत दिले जाते. कमीअधिक प्रमाणात जिल्ह्यातील तहसील कार्यालयातील लाभार्थी संख्या पाहता प्रत्येक महिन्याला १०० क्विंटल गहू आणि तेवढाच तांदूळ गेल्या सहा महिन्यांपासून वाटप होणे बाकी आहे. याबाबत वारंवार नागरिकांकडून संबंधित विभागाकडे विचारणा होत आहे. परंतु त्यांना मात्र समाधानकारक असे उत्तर मिळत नाही.प्रत्येक महिन्याला अन्नपूर्णा योजनेतील लाभार्थ्याला लागणाऱ्या धान्याची मागणी प्रत्येक तहसील कार्यालयाने जिल्हा पुरवठा विभागाला पाठविणे अपेक्षित असते. त्यांच्याकडून ही मागणी केली जात असून प्रत्यक्ष धान्यच उपलब्ध नाही, अशी ओरड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाची आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावरील प्रशासनाच्या पाठशिवणीच्या खेळात अन्नपूर्णा योजनेतील निराधार वृद्ध मात्र शेवटच्या घटका मोजत असून त्यांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून निराधार वृद्धांना वेळेवर धान्य मिळावे, यासाठी जिल्हा पुरवठा विभागाला सूचना कराव्यात, अशी मागणी जिल्हाभरातील अन्नपूर्णाच्या लाभार्थ्यांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)