शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

भूसंपादन अपिलाची शेकडो प्रकरणे एकाच वकिलाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:00 IST

नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन केले गेले. नियमानुसार त्यात जमीन मालकांना मोबदला दिला गेला. परंतु त्यावर समाधान न झाल्याने जमीन मालकांनी जादा मोबदल्यासाठी या प्रकरणातील आर्बिट्रेटर (लवाद) तथा अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रकर यांच्याकडे अपिल दाखल केले. परंतु यातील बहुतांश अपिल हे खान्देशातील एकाच वकिलामार्फत सादर झाले आहेत.

ठळक मुद्देखान्देश कनेक्शन : कळंबमध्ये बैठक, बँकेचा कारभारही सोईने

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सत्र न्यायालयांची संख्या वाढल्याने येथील वकील मंडळी नव्या कामाच्या शोधात आहेत. तर दुसरीकडे खान्देशातील एकाच वकिलाकडे भूसंपादनाच्या अपिलाची शेकडो प्रकरणे एकवटल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन केले गेले. नियमानुसार त्यात जमीन मालकांना मोबदला दिला गेला. परंतु त्यावर समाधान न झाल्याने जमीन मालकांनी जादा मोबदल्यासाठी या प्रकरणातील आर्बिट्रेटर (लवाद) तथा अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रकर यांच्याकडे अपिल दाखल केले. परंतु यातील बहुतांश अपिल हे खान्देशातील एकाच वकिलामार्फत सादर झाले आहेत. स्थानिक वकिलांकडे अवघी ९०-१०० प्रकरणे असतील. एकाच वकिलाला एवढ्या मोठ्या प्रमाणात अपिलाची प्रकरणे मिळण्यामागील ‘रहस्य’ मात्र अद्याप कुणालाही उलगडलेले नाही.खान्देशातील या वकिलाचा वाढीव मोबदल्याच्या अपिल प्रकरणाचा दर १५ टक्के असल्याचे सांगितले जाते. या वकिलाने येथील एका कमर्शियल बँकेशी जणू टायअप केले आहे. वकील म्हणेल त्या सोईने बँकेचा कारभार चालविला जातो. जमीन मालकांच्या घरी जावून बँकेची यंत्रणा खाते उघडते, लगेच चेकबुक देते. हे चेक वकिलाला दिले जातात. वकिलाने ग्रीन सिग्नल दिल्याशिवाय बँक चेक क्लिअर करीत नाहीत. सिग्नल यायचा असेल तर आधार कार्ड, पॅन कार्ड अशा वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी करून जमीन मालकांची अप्रत्यक्ष अडवणूक केली जाते. सदर वकील विशिष्ट पद्धतीने व्यवहार करीत असल्याने त्यांचे १५ टक्क्याचे गणित आजपर्यंत रेकॉर्डवर आले नसल्याचे बोलले जाते.मंगळवारी खान्देशातील या वकिलाच्या दलालांनी कळंब येथे मोबदल्याच्या अपिलासाठी प्रयत्नात असलेल्या जमीन मालकांची बैठक घेतली. त्यात १५ ते २० जण उपस्थित होते. लगेच कमर्शियल बँकेच्या यंत्रणेला तेथेच बोलावून या जमीन मालकांचे खातेही उघडले गेले व त्यांना चेकबुकही जारी करण्यात आले. एकाच वकिलाला जादा दर असूनही भूसंपादन मोबदल्याची शेकडो प्रकरणे मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.प्रकरणे शोधण्यासाठी नेमले दलालखान्देशातील या वकिलाने स्थानिक पातळीवर चार ते पाच दलाल सोडले आहेत. त्यातील एकाला कायद्याचा चांगला अभ्यास आहे. हे दलाल वाढीव मोबदल्याच्या प्रकरणासाठी जमीन मालकांना गाठतात व त्यांच्याकडून प्रकरणे मिळवितात. त्यासाठी या जमीन मालकांना तुम्हाला ‘दोनचे गुणांक मिळवून देतो’ असे दाव्याने सांगितले जाते. वास्तविक वाढीव मोबदल्याच्या प्रकरणात दोनचा गुणांक हा जमीन मालकाचा शासनाच्या आदेशानुसार हक्कच आहे. ही प्रकरणे अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली जातात. तेथे सुनावणीनंतर निर्णय दिला जातो. एकाच वेळी अनेक प्रकरणे कशी मंजूर केली जातील या दृष्टीने वकिलाचा प्रयत्न असतो.महामार्ग भूसंपादन वाढीव मोबदल्याची दीड हजार प्रकरणे निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. दररोज दोन-तीन प्रकरणे दाखल होतात. या जमिनींचा निवाडा एक गुणांकाने झाला आहे. मात्र शासनाने नगरपंचायत व क वर्ग नगरपालिका क्षेत्रात दोनचा गुणांक विभागीय आयुक्तांच्या परवानगीने मंजूर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार निर्णय घेतले जात आहे.- सुनील महिंद्रकर (आर्बिट्रेटर)अपर जिल्हाधिकारी, यवतमाळ.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग