शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

भक्तांसाठी अहोरात्र झटतात शेकडो हात

By admin | Updated: October 16, 2015 02:23 IST

यवतमाळचा दुर्गोत्सव हा वैभवी दुर्गोत्सव म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील खेड्यापाड्यांतून भाविक यवतमाळात दर्शनासाठी येतात.

यवतमाळ : यवतमाळचा दुर्गोत्सव हा वैभवी दुर्गोत्सव म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील खेड्यापाड्यांतून भाविक यवतमाळात दर्शनासाठी येतात. यातील बरेच भक्त अनवाणी असतात. तर अनेकांचा निरंकाळ उपवास असतो. काही भक्त देवीच्या दर्शनानंतरच उपवास सोडतात. बाहेरगावावरून येणाऱ्या भक्तांच्या विविध अडचणी दूर करण्यासाठी दुर्गोत्सव मंडळांनी पुढाकार घेतला आहे. यातूनच दररोज शेकडो हात अखंड झटताहेत. काही मंडळे अन्नदान करीत आहेत. काही भक्तगण उपवासाच्या साहित्याचे वितरण करीत आहे. अनेक भक्त मंडळांनी दुधाचे वितरण करण्याचे काम हाती घेतले आहे. यातून अन्नदानाचा अखंड यज्ञ सुरू आहे. यावर्षीच्या दुर्गोत्सवाचे विशेष वैशिष्ट आहे. प्रत्येक मंडळाने भक्तांसाठी अन्नदानाची व्यवस्था केली आहे. शहरातील कुठल्याही भागात पोहोचले तरी अहोरात्र अन्नदान करण्यात येत आहे. जिल्हाभरातच दुर्गोत्सवातील हे दानधर्म मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. कित्येक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पदरमोड करून त्यासाठी पुढाकार घेतला आहे. अन्नदान, दूधवाटप केले जात आहे. यानिमित्ताने गावखेड्यातील भाविकांना देवीचा महाप्रसाद मिळत आहे. भोळ््याभाबड्या भाविकांच्या चेहऱ्यावर त्याचे वेगळे समाधानही झळकत आहे. जिल्ह्याच्या १६ ही तालुक्यात यवतमाळ प्रमाणेच दुर्गोत्सवाचा प्रचंड उत्साह असतो. त्यातल्या दानधर्मालाही वेगळे महत्व आहे. यवतमाळच्या गांधी चौक दुर्गोत्सव मंडळाने भक्तांचा निरंकाळ उपवास लक्षात घेत दूध वितरणाची आपली अखंड परंपरा जपली आहे. यासाठी दररोज ५०० लिटर दूध वितरित करण्यात येत आहे. दुधाला तापविण्यासाठी सकाळपासूनच प्रक्रिया केली जाते. दूध वितरणासाठी १० हजार ग्लास बोलविण्यात आले आहेत.शहरातील माळीपुरा परिसरात असलेल्या नवशक्ती दुर्गोत्सव मंडळाचे ४४ वे वर्ष आहे. या मंडळाने गत १५ वर्षांपासून अन्नदानाचे कार्य हाती घेतले आहे. सर्वाधिक अन्नदान करणारे मंडळ म्हणून या मंडळाची ओळख आहे. या ठिकाणी दर्शनाकरिता येणाऱ्या भक्तांच्या भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते. यासाठी १६ तास काम चालते. भोजनाची व्यवस्था करण्यासाठी दोन शिफ्टमध्ये कारागीर अखंडपणे काम करीत असतात. या ठिकाणी दररोज १५ भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते. यासाठी दररोज सहा क्विंटल कणिक लागते. एक क्विंटलची जिलेबी, पाच क्विंटल तांदूळ, सात क्विंटल भाजी, ५०० लिटर दूध दररोज लागत आहे. यासाठी ५० स्वयंपाकी अहोरात्र झटत आहे. यासोबतच मंडळाचे कार्यकर्ते संपूर्ण प्रक्रिया राबविण्यासाठी काम करीत आहेत. बालाजी चौकातील बालाजी चौक दुर्गोेत्सव मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या मंडळाने अखंड अन्नदानाची परंपरा कायम ठेवली आहे. या ठिकाणी सरासरी पाच हजारांवर भाविकांसाठी अन्नदान करण्यात येते. दररोज चार क्विंटल गहू, १ क्विंटल तांदूळ, अडीच क्विंटलची भाजी आणि गोड पदार्थ रोज भोजनात असतात. या ठिकाणी अन्नदानासाठी सरासरी २५ सेवेकरी अहोरात्र झटत आहेत. आठवडी बाजारातील हिंदुस्थानी दुर्गोत्सव मंडळाचे ७७ वे वर्ष आहे. शहरातील भाविक महिला मध्यरात्रीपासून शितला मातेला जल अर्पण करतात. रात्रभर या भागात वर्दळ सुरू असते. दर्शनासाठी येणाऱ्या महिला भक्तांसाठी दूध आणि उपवासाचे साहित्य वितरित करण्यात येत आहे. साधारणत: ५०० लिटर दूध वितरित करण्यात येते. छोटी गुजरी चौकातील एकता दुर्गोत्सव मंडळाचे ४६ वे वर्ष आहे. या मंडळाने दर्शनासाठी येणाऱ्या भक्ताकरिता उपवास साहित्य वितरित करण्याचे काम हाती घेतले आहे. नऊ दिवस या ठिकाणी उपवासाचे साहित्य वितरित करण्यात येत आहे. आर्णी नाक्यावरील जय माता दी मित्र परिवार मंडळाने दर्शनासाठी येणाऱ्या मंडळासाठी दूध वितरणाचे काम हाती घेतले आहे. या ठिकाणी दररोज ५०० लिटर दूध वितरित करण्यात येत आहे. परिसरातील व्यापाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती राजू बंडेवार, सुनिल अग्रवाल, अतुल मुक्कावार आदींनी दिली. (शहर वार्ताहर)