शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

भक्तांसाठी अहोरात्र झटतात शेकडो हात

By admin | Updated: October 16, 2015 02:23 IST

यवतमाळचा दुर्गोत्सव हा वैभवी दुर्गोत्सव म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील खेड्यापाड्यांतून भाविक यवतमाळात दर्शनासाठी येतात.

यवतमाळ : यवतमाळचा दुर्गोत्सव हा वैभवी दुर्गोत्सव म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील खेड्यापाड्यांतून भाविक यवतमाळात दर्शनासाठी येतात. यातील बरेच भक्त अनवाणी असतात. तर अनेकांचा निरंकाळ उपवास असतो. काही भक्त देवीच्या दर्शनानंतरच उपवास सोडतात. बाहेरगावावरून येणाऱ्या भक्तांच्या विविध अडचणी दूर करण्यासाठी दुर्गोत्सव मंडळांनी पुढाकार घेतला आहे. यातूनच दररोज शेकडो हात अखंड झटताहेत. काही मंडळे अन्नदान करीत आहेत. काही भक्तगण उपवासाच्या साहित्याचे वितरण करीत आहे. अनेक भक्त मंडळांनी दुधाचे वितरण करण्याचे काम हाती घेतले आहे. यातून अन्नदानाचा अखंड यज्ञ सुरू आहे. यावर्षीच्या दुर्गोत्सवाचे विशेष वैशिष्ट आहे. प्रत्येक मंडळाने भक्तांसाठी अन्नदानाची व्यवस्था केली आहे. शहरातील कुठल्याही भागात पोहोचले तरी अहोरात्र अन्नदान करण्यात येत आहे. जिल्हाभरातच दुर्गोत्सवातील हे दानधर्म मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. कित्येक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पदरमोड करून त्यासाठी पुढाकार घेतला आहे. अन्नदान, दूधवाटप केले जात आहे. यानिमित्ताने गावखेड्यातील भाविकांना देवीचा महाप्रसाद मिळत आहे. भोळ््याभाबड्या भाविकांच्या चेहऱ्यावर त्याचे वेगळे समाधानही झळकत आहे. जिल्ह्याच्या १६ ही तालुक्यात यवतमाळ प्रमाणेच दुर्गोत्सवाचा प्रचंड उत्साह असतो. त्यातल्या दानधर्मालाही वेगळे महत्व आहे. यवतमाळच्या गांधी चौक दुर्गोत्सव मंडळाने भक्तांचा निरंकाळ उपवास लक्षात घेत दूध वितरणाची आपली अखंड परंपरा जपली आहे. यासाठी दररोज ५०० लिटर दूध वितरित करण्यात येत आहे. दुधाला तापविण्यासाठी सकाळपासूनच प्रक्रिया केली जाते. दूध वितरणासाठी १० हजार ग्लास बोलविण्यात आले आहेत.शहरातील माळीपुरा परिसरात असलेल्या नवशक्ती दुर्गोत्सव मंडळाचे ४४ वे वर्ष आहे. या मंडळाने गत १५ वर्षांपासून अन्नदानाचे कार्य हाती घेतले आहे. सर्वाधिक अन्नदान करणारे मंडळ म्हणून या मंडळाची ओळख आहे. या ठिकाणी दर्शनाकरिता येणाऱ्या भक्तांच्या भोजनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते. यासाठी १६ तास काम चालते. भोजनाची व्यवस्था करण्यासाठी दोन शिफ्टमध्ये कारागीर अखंडपणे काम करीत असतात. या ठिकाणी दररोज १५ भाविकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येते. यासाठी दररोज सहा क्विंटल कणिक लागते. एक क्विंटलची जिलेबी, पाच क्विंटल तांदूळ, सात क्विंटल भाजी, ५०० लिटर दूध दररोज लागत आहे. यासाठी ५० स्वयंपाकी अहोरात्र झटत आहे. यासोबतच मंडळाचे कार्यकर्ते संपूर्ण प्रक्रिया राबविण्यासाठी काम करीत आहेत. बालाजी चौकातील बालाजी चौक दुर्गोेत्सव मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या मंडळाने अखंड अन्नदानाची परंपरा कायम ठेवली आहे. या ठिकाणी सरासरी पाच हजारांवर भाविकांसाठी अन्नदान करण्यात येते. दररोज चार क्विंटल गहू, १ क्विंटल तांदूळ, अडीच क्विंटलची भाजी आणि गोड पदार्थ रोज भोजनात असतात. या ठिकाणी अन्नदानासाठी सरासरी २५ सेवेकरी अहोरात्र झटत आहेत. आठवडी बाजारातील हिंदुस्थानी दुर्गोत्सव मंडळाचे ७७ वे वर्ष आहे. शहरातील भाविक महिला मध्यरात्रीपासून शितला मातेला जल अर्पण करतात. रात्रभर या भागात वर्दळ सुरू असते. दर्शनासाठी येणाऱ्या महिला भक्तांसाठी दूध आणि उपवासाचे साहित्य वितरित करण्यात येत आहे. साधारणत: ५०० लिटर दूध वितरित करण्यात येते. छोटी गुजरी चौकातील एकता दुर्गोत्सव मंडळाचे ४६ वे वर्ष आहे. या मंडळाने दर्शनासाठी येणाऱ्या भक्ताकरिता उपवास साहित्य वितरित करण्याचे काम हाती घेतले आहे. नऊ दिवस या ठिकाणी उपवासाचे साहित्य वितरित करण्यात येत आहे. आर्णी नाक्यावरील जय माता दी मित्र परिवार मंडळाने दर्शनासाठी येणाऱ्या मंडळासाठी दूध वितरणाचे काम हाती घेतले आहे. या ठिकाणी दररोज ५०० लिटर दूध वितरित करण्यात येत आहे. परिसरातील व्यापाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती राजू बंडेवार, सुनिल अग्रवाल, अतुल मुक्कावार आदींनी दिली. (शहर वार्ताहर)