शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

रुपांतरित कर्जापासून शेकडो शेतकरी वंचित

By admin | Updated: September 3, 2014 23:45 IST

गतवर्षी अतिवृष्टीने तर यावर्षी कमी पावसाने शेतकरी देशोधडीला लागला आहे. अशातच ३० जून रोजी कर्जाचे हप्ते पाडून रुपांतरित कर्ज वाटप करण्याचे ठरविण्यात आले. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही.

महागाव : गतवर्षी अतिवृष्टीने तर यावर्षी कमी पावसाने शेतकरी देशोधडीला लागला आहे. अशातच ३० जून रोजी कर्जाचे हप्ते पाडून रुपांतरित कर्ज वाटप करण्याचे ठरविण्यात आले. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. जिल्ह्यातील शेकडो शेतकरी या रुपांतरित कर्जापासून वंचित असल्याचे दिसत आहे.यंदा सुरुवातीपासून पावसाने दडी मारली. कसे बसे तग धरलेल्या पिकांवर किडींनी आक्रमण केले. सोयाबीन पिवळे पडत असून कापसाच्या उत्पादनातही मोठी घट येण्याची लक्षणे आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणतेच पॅकेज शासनाने घोषित केले नाही. उलट जिल्हा बँक रुपांतरित कर्ज वाटपाचे आश्वासन देऊन बसली असताना आता कुठे नाबार्ड आणि महाराष्ट्र बँकेकडे बोट दाखवित आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने रुपांतरित कर्जाचे वाटप जिल्ह्यातील कोणत्याही शाखेत केले नाही. त्यामुळे अशा कर्जापासून जिल्हाभरातील ५० हजार शेतकरी वंचित राहिले आहे. जिल्हा बँकेत विचारणा केली तर नाबार्डकडून कर्ज पुरवठा झाला नसल्याने वाटप करता आले नाही, असे सांगितले जाते. नाबार्ड महाराष्ट्र बँकेला पत्रव्यवहार करण्यात आले असून अद्यापही सकारात्मक उत्तर आले नाही.जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज पुरवठा झाला नसल्याने एकट्या महागाव तालुक्यात २८ सोसायट्यातील २९ हजार ११० सभासदांपैकी तीन हजार ४४७ सभासद वंचित आहे. सरासरी तालुक्यातील सदस्यांची आकडेवारी पाहता विविध कार्यकारी सोसायट्यातील ४८ हजार शेतकरी कर्जापासून वंचित राहिले आहे. अशा सभासदांकरिता आता बँकेने पुढाकार घेऊन काही तरी उपाययोजना करावी, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नसल्याचे दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)