शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

रुपांतरित कर्जापासून शेकडो शेतकरी वंचित

By admin | Updated: September 3, 2014 23:45 IST

गतवर्षी अतिवृष्टीने तर यावर्षी कमी पावसाने शेतकरी देशोधडीला लागला आहे. अशातच ३० जून रोजी कर्जाचे हप्ते पाडून रुपांतरित कर्ज वाटप करण्याचे ठरविण्यात आले. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही.

महागाव : गतवर्षी अतिवृष्टीने तर यावर्षी कमी पावसाने शेतकरी देशोधडीला लागला आहे. अशातच ३० जून रोजी कर्जाचे हप्ते पाडून रुपांतरित कर्ज वाटप करण्याचे ठरविण्यात आले. मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झाली नाही. जिल्ह्यातील शेकडो शेतकरी या रुपांतरित कर्जापासून वंचित असल्याचे दिसत आहे.यंदा सुरुवातीपासून पावसाने दडी मारली. कसे बसे तग धरलेल्या पिकांवर किडींनी आक्रमण केले. सोयाबीन पिवळे पडत असून कापसाच्या उत्पादनातही मोठी घट येण्याची लक्षणे आहे. या संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणतेच पॅकेज शासनाने घोषित केले नाही. उलट जिल्हा बँक रुपांतरित कर्ज वाटपाचे आश्वासन देऊन बसली असताना आता कुठे नाबार्ड आणि महाराष्ट्र बँकेकडे बोट दाखवित आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने रुपांतरित कर्जाचे वाटप जिल्ह्यातील कोणत्याही शाखेत केले नाही. त्यामुळे अशा कर्जापासून जिल्हाभरातील ५० हजार शेतकरी वंचित राहिले आहे. जिल्हा बँकेत विचारणा केली तर नाबार्डकडून कर्ज पुरवठा झाला नसल्याने वाटप करता आले नाही, असे सांगितले जाते. नाबार्ड महाराष्ट्र बँकेला पत्रव्यवहार करण्यात आले असून अद्यापही सकारात्मक उत्तर आले नाही.जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कर्ज पुरवठा झाला नसल्याने एकट्या महागाव तालुक्यात २८ सोसायट्यातील २९ हजार ११० सभासदांपैकी तीन हजार ४४७ सभासद वंचित आहे. सरासरी तालुक्यातील सदस्यांची आकडेवारी पाहता विविध कार्यकारी सोसायट्यातील ४८ हजार शेतकरी कर्जापासून वंचित राहिले आहे. अशा सभासदांकरिता आता बँकेने पुढाकार घेऊन काही तरी उपाययोजना करावी, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नसल्याचे दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)