शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

जिल्ह्यात होणार शेकडो विकासकामे

By admin | Updated: February 28, 2015 02:07 IST

जलयुक्त शिवार अभियान शासनाचा अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. जिल्ह्यात या अभियानांतर्गत पाणी टंचाईवर मात करण्यासोबतच ..

यवतमाळ : जलयुक्त शिवार अभियान शासनाचा अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. जिल्ह्यात या अभियानांतर्गत पाणी टंचाईवर मात करण्यासोबतच अभियानातील गावे विकासाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्यावर भर राहणार आहे. त्यामुळे या अभियानात विविध शासकीय विभागांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. अभियानातील कामगिरीवरून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन होणार आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने आपला चांगला सहभाग नोंदवावा, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे पालकमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियानांर्तगत करावयाच्या कामांचा आढावा शुक्रवारी घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.कृषी, पाणी पुरवठा, जलसंपदा, जलसंधारण या जलयुक्त शिवार अभियानातील यंत्रणांसह अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या गावांमध्ये विविध विकासाची कामे राबविणाऱ्या कार्यालयांचा अंतिम आराखडा पालकमंत्र्यांनी बैठकीत जाणून घेतला. तसेच अभियानातील गावे विकासाच्याबाबतीत परिपूर्ण करण्यासाठी जून अखेर अधिकाधिक कामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या. शासन लोकांना चांगली सेवा देण्याचे काम करीत असते. हे काम अधिक प्रभाविपणे होणे आवश्यक आहे. तळागाळातील सर्वसामान्य नागरिकाला दिलासा देण्यासाठी अभियानांतर्गत सामूहिकपणे प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले. अभियानांतर्गत एकूण २७ विभाग जिल्ह्यातील ४०० गावांमध्ये विकास कामे राबविणार असून या सर्व विभागांचे विकास आराखडे पूर्ण झाले आहे. सदर विभाग शेकडो कामे जून अखेरपर्यंत यातून करणार आहे. यामध्ये सबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करणे गरजेचे असून कुणाचाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा लोकांवर योग्य कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या अभियानात प्रामुख्याने पाणी टंचाई निवारणासोबतच वीज, पशुसंवर्धन, वनविभाग, महसूल, पोलीस अशा विविध विभागांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)आर्थिक मदतीचे आवाहनपाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरु केले आहे. जिल्ह्यात भविष्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माणच होवू नये यासाठी विविध कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अभियानांतर्गत पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी विविध कामे घेण्यात येणार आहे. अस्तित्वात असलेल्या व निकामी झालेल्या जलस्त्रोतांची पाणी साठवण क्षमता वाढविणे, लोकसहभागातून विविध जलस्त्रोतामधील गाळ काढणे, वृक्ष लागवडीस प्रोत्साहन, शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, पाणी अडविणे, पाणी जीरविणे यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे व जनजागृती तसेच माती नालाबांध, सिमेंट नालाबांध, सलग समतोल चर, गाळ काढणे इत्यादी कामे करण्यात येणार आहे. या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी व लोकसहभाग आवश्यक आहे. जिल्ह्यात विविध यंत्रणेमार्फत ही कामे होणार असून त्यासाठी नागरिकांची मदत लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक, सहकारी संस्था, अशासकीय संस्था तसेच वेगवेगळ्या संस्थांनी आर्थिक मदत, लोकसहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हा अधिकाऱ्यांनी केले आहे. आर्थिक मदत देवू इच्छिणाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले.