शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

जिल्ह्यात होणार शेकडो विकासकामे

By admin | Updated: February 28, 2015 02:07 IST

जलयुक्त शिवार अभियान शासनाचा अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. जिल्ह्यात या अभियानांतर्गत पाणी टंचाईवर मात करण्यासोबतच ..

यवतमाळ : जलयुक्त शिवार अभियान शासनाचा अतिशय महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. जिल्ह्यात या अभियानांतर्गत पाणी टंचाईवर मात करण्यासोबतच अभियानातील गावे विकासाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्यावर भर राहणार आहे. त्यामुळे या अभियानात विविध शासकीय विभागांचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. अभियानातील कामगिरीवरून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन होणार आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने आपला चांगला सहभाग नोंदवावा, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे पालकमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियानांर्तगत करावयाच्या कामांचा आढावा शुक्रवारी घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.कृषी, पाणी पुरवठा, जलसंपदा, जलसंधारण या जलयुक्त शिवार अभियानातील यंत्रणांसह अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या गावांमध्ये विविध विकासाची कामे राबविणाऱ्या कार्यालयांचा अंतिम आराखडा पालकमंत्र्यांनी बैठकीत जाणून घेतला. तसेच अभियानातील गावे विकासाच्याबाबतीत परिपूर्ण करण्यासाठी जून अखेर अधिकाधिक कामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या. शासन लोकांना चांगली सेवा देण्याचे काम करीत असते. हे काम अधिक प्रभाविपणे होणे आवश्यक आहे. तळागाळातील सर्वसामान्य नागरिकाला दिलासा देण्यासाठी अभियानांतर्गत सामूहिकपणे प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री म्हणाले. अभियानांतर्गत एकूण २७ विभाग जिल्ह्यातील ४०० गावांमध्ये विकास कामे राबविणार असून या सर्व विभागांचे विकास आराखडे पूर्ण झाले आहे. सदर विभाग शेकडो कामे जून अखेरपर्यंत यातून करणार आहे. यामध्ये सबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करणे गरजेचे असून कुणाचाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा लोकांवर योग्य कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या अभियानात प्रामुख्याने पाणी टंचाई निवारणासोबतच वीज, पशुसंवर्धन, वनविभाग, महसूल, पोलीस अशा विविध विभागांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)आर्थिक मदतीचे आवाहनपाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरु केले आहे. जिल्ह्यात भविष्यात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माणच होवू नये यासाठी विविध कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अभियानांतर्गत पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी विविध कामे घेण्यात येणार आहे. अस्तित्वात असलेल्या व निकामी झालेल्या जलस्त्रोतांची पाणी साठवण क्षमता वाढविणे, लोकसहभागातून विविध जलस्त्रोतामधील गाळ काढणे, वृक्ष लागवडीस प्रोत्साहन, शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, पाणी अडविणे, पाणी जीरविणे यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे व जनजागृती तसेच माती नालाबांध, सिमेंट नालाबांध, सलग समतोल चर, गाळ काढणे इत्यादी कामे करण्यात येणार आहे. या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी व लोकसहभाग आवश्यक आहे. जिल्ह्यात विविध यंत्रणेमार्फत ही कामे होणार असून त्यासाठी नागरिकांची मदत लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक, सहकारी संस्था, अशासकीय संस्था तसेच वेगवेगळ्या संस्थांनी आर्थिक मदत, लोकसहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हा अधिकाऱ्यांनी केले आहे. आर्थिक मदत देवू इच्छिणाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले.