शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

माणुसकी अजूनही जिवंत आहे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 22:56 IST

माणसांच्या गर्दीने फुगलेल्या शहरांमध्ये माणुसकी कमी होत चालली आहे. ‘मेट्रो सिटी’ म्हणून मिरवणाऱ्या शहरात तर अपघातातील जखमीला हात लावयलाही कुणी तयार होत नाही.

ठळक मुद्देप्रतिसाद फाउंडेशन : चिमुकल्या माहीसाठी धावले यवतमाळकर

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : माणसांच्या गर्दीने फुगलेल्या शहरांमध्ये माणुसकी कमी होत चालली आहे. ‘मेट्रो सिटी’ म्हणून मिरवणाऱ्या शहरात तर अपघातातील जखमीला हात लावयलाही कुणी तयार होत नाही. पण आपल्या यवतमाळ शहरातील विशेषत: युवकांनी माणुसकी अजूनही जिवंत ठेवली आहे. शनिवारी बसस्थानक चौकात घडलेल्या अपघातानंतर ही माणुसकी ‘प्रतिसाद फाऊंडेशन’च्या रूपाने प्रकर्षाने पुढे आली.बसस्थानक चौकात दुचाकी-ट्रकचा अपघात झाला. दुचाकीवरील डॉ. वामन हेपट आणि त्यांची सून अंजली हेपट हे दोघेही दगावले. तर अडीच वर्षांची चिमुकली माही जखमी होऊन बचावली. जाणारे गेले. पण आता प्रश्न होता माहीचा. कारण तिचे जवळचे असे कुणी नातेवाईकच उरले नाही. दूरचे नातेवाईक गावात नव्हते. अशावेळी प्रतिसाद फाऊंडेशनचे युवक धावून आले.त्यांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळ गाठले. तोवर कुणीतरी माहीला घरी पोहोचविले होते. फाउंडेशनचे कार्यकर्ते पुष्पकुंज सोसायटीतील माहीच्या घरी पोहोचले, तेव्हा ती एकटीच रडत बसली होती. आजूबाजूचे शेजारी तिथे जमले होते. कार्यकर्त्यांनी लगेच डॉ. कसारे यांना बोलावले. तिचे चेकअप् करून घेतले. नंतर बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मानकर यांच्या रुग्णालयात तिला भरती केले. डॉ. जोशी यांनीही तपासणी केली. उपचारानंतर माही स्थिर झाली. मात्र, आईसाठी तिचा टाहो सुरूच होता. आता प्रश्न होता दोन मृतांच्या अंत्यसंस्काराचा. मृताचे नातेवाईक हजर नव्हते. कुणी पुण्यासारख्या दूरच्या अंतरावर होते. शेवटी प्रतिसाद फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनीच अंतसंस्काराचीही जबाबदारी उचलली. त्याआधी नातेवाईकांना फोन करून परवानगीही घेतली.नातेवाईक यवतमाळात पोहोचण्यापूर्वीच युवकांनी कामे वाटून घेतली. ज्याला जमेल तेवढे आर्थिक योगदान दिले. उत्तरीय तपासणीपासून, हेपट यांच्या घरापुढे शामियाना लावण्यापासून ते पाण्याच्या कॅन तयार ठेवण्यापर्यंत सर्व व्यवस्था करून ठेवली. दोन अंत्यसंस्कार असल्याने प्रत्येक साहित्य दोन-दोन आणले. नातेवाईक गोळा झाल्यावर त्यांच्या हस्ते अंत्यविधी आटोपला. दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कारानंतर पाण्याच्या कॅन, जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली. अंत्ययात्रेत आलेल्या कोणत्याही व्यक्तीची गैरसोय होऊ नये याची काळजी युवकांनी घेतली.या संपूर्ण सत्कार्यासाठी प्रतिसाद फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज गुल्हाने, सचिव प्रलय टिप्रमवार, उपाध्यक्ष बिपीन चौधरी, विनोद नगराळे, योगेश धानोरकर, देवेंद्र कळसकर, अजय बोरेले, अनिल तांबेकर, गजू राऊत, उमेश बोबडे, विनोद दोंदल, सचिन कावरे, चंदन फेंडर, राजेश पोहनकर, राजू केराम, रवी माहुरकर, राजेश इसाळकर, सौरभ इंगोले, श्याम बजाज, हर्षल राठोड, अर्पित शेरेकर, राहुल फाळके आदींनी परिश्रम घेतले.माहीच्या भविष्यासाठी आज बैठकआई-बाबा, आजी-आजोबा, मामा असे सर्व नातेवाईक गमावलेली अडीच वर्षांची माही आता एकटी आहे. तिचे भवितव्य काय, हाच प्रश्न अनेक सहृदांना सतावतोय. त्यावरही प्रतिसाद फाउंडेशनने पाउल उचलले आहे. माहीच्या दूरच्या नातेवाईकांची त्यांनी मंगळवारी बैठक ठेवली आहे. माहीच्या भविष्याची जबाबदारी कोण उचलणार, याबाबत चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती प्रतिसाद फाऊंडेशनचे सचिव प्रलय टिप्रमवार यांनी दिली.