शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

मानवता हाच जैन धर्माचा एकमेव केंद्रबिंदू

By admin | Updated: October 16, 2014 23:30 IST

निसर्ग व परमेश्वराने सर्व मानवांना स्वतंत्र अस्तित्व प्रदान केले. स्त्री-पुरुष, उच्च-निच हा भेद जर मानवाला मानवापासून दूर नेत असेल तर ही जगातील कोणत्याही धर्माची शिकवण असूच शकत नाही.

कविता तातेड : व्याख्यानमालेत प्रतिपादनयवतमाळ : निसर्ग व परमेश्वराने सर्व मानवांना स्वतंत्र अस्तित्व प्रदान केले. स्त्री-पुरुष, उच्च-निच हा भेद जर मानवाला मानवापासून दूर नेत असेल तर ही जगातील कोणत्याही धर्माची शिकवण असूच शकत नाही. जगा आणि जगू द्या, ही मोलाची शिकवण जैन धर्माने समस्त मानव समाजाला दिली. मानवता हाच जैन धर्माचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ.कविता तातेड यांनी केले. तरुण क्रांतीमंचच्या सहकार्याने निवृत्त अभियंता मित्रमंडळद्वारा आयोजित प्रबोधन व्याख्यानमालेचे त्या चौथे पुष्प गुंफत होत्या. यावेळी अमिता पापळकर यांनी त्यांचे स्वागत केले. मंचावर मंडळाचे अध्यक्ष गोपाळराव भास्करवार, सुभाष काळे आदी उपस्थित होते. संचालनाची जबाबदारी वसंत पांडे यांनी पार पाडली. वर्तमान काळ आणि भूतकाळातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास. जैनाचार्यांनी बहुभाषिक साहित्य, ३२ आगम, पुराणे याची निर्मिती करून ते समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य कथेच्या माध्यमातून केले. यातून नीतीमत्ता जोपासण्याची शिकवण दिली. इतकेच नव्हेतर आलेख, अभिलेख मंदिरच्या बाहेरील दगडावर कोरून भारतीय संस्कृती चिरंतन स्मरणात राहील, याचीसुद्धा व्यवस्था केली. १८० अभिलेखात तत्कालिन स्त्रियांची महती विषद करणारे लेख आढळून येतात, असे डॉ.तातेड म्हणाल्या. जैन स्थापत्य कला ही त्या काळातील भारतीय संस्कृतीचे वैभव स्पष्ट करते. संपूर्ण भारतात गुंफा, लेणी, मंदिरे, अद्वितीय हस्तलिखिते ही जैन संस्कृतीची देण होय. राजा घनानंद, चंद्रगुप्त मौर्य, नंद राजघराणे यांनी जैन धर्माचा पुरस्कार केल्याचा उल्लेख आढळतो. चंद्रगुप्त द्वितीय यांच्या कालखंडात जैन धर्माची भरभराट झाली. इतकेच नव्हेतर मुस्लिम व मोगल राजवटीतसुद्धा अल्लाउद्दीन खिलजी यांनी माधवसेन या जैनाचार्याचा सन्मान केल्याचा उल्लेख आहे. हुमायू यांनी वाद-विवादात ३६३ पंडितामध्ये विजेता ठरलेले विजयसिंह सुरी यांचासुद्धा सन्मान केला, अशी नोंद इतिहासात आहे, असे डॉ.तातडे यांनी सांगितले. (वार्ताहर)