शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यातील माणुसकीने सावरले कुटुंब

By admin | Updated: September 9, 2016 02:46 IST

शासनाने सोपविलेले काम प्रामाणिक करणे हे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असते.

प्रेरणादायी कार्य : वाघाच्या हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या शेतकऱ्याच्या मुलाला अधिकाऱ्याने घेतले दत्तक गजानन अक्कलवार कळंबशासनाने सोपविलेले काम प्रामाणिक करणे हे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असते. अनेक अधिकारी आपले कर्तव्य नीट बजावतातही. परंतु सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावात्मक कार्य म्हणून जबाबदारी पार पाडणारे अधिकारी बोटावर मोजण्या इतकेच उरले आहेत. त्यामध्ये कळंब येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत असणारे मनोहर शहारे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या शासनबाह्य कार्याला सामाजिक बांधिलकीची किनार ही असतेच. दोन दिवसांपूर्वी वाघाच्या हल्यात मृत्युमूखी पडलेल्या शेतकऱ्याच्या मुलांना दत्तक घेत त्यांनी पुन्हा एकदा त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी दाखवून दिली.राळेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील खैरगाव (कासार) येथील आदिवासी शेतकरी मारोती विठोबा नागोसे यांच्यावर वाघाने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्याचे संपूर्ण कुंटुब उघड्यावर पडले. एकीकडे कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर दुसरीकडे अशाप्रकारे होणारे आघात त्यामुळे देशाच्या पोशिंद्यावरच आलेल्या संकटाची धग कमी करण्यासाठी काही चांगुलपणा जिवंत असणाऱ्या लोकांना मनोहर शहारे यांनी एकत्रित केले. त्यांना सोबत घेऊन खैरगाव (कासार) गाव गाठले. दु:खी कुटुंबाला आधार देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आपल्या दु:खात आम्हीही सहभागी आहोत, आलेल्या संकटाचा जो धैर्याने सामना करतो तोच जीवनात यशस्वी होतो. त्यामुळे आता आपण या दु:खातून सावरले पाहीजे. यासाठी मनोहर शहारे यांनी स्वत: व मित्रमंडळीकडून जमा केलेली आर्थिक मदत ग्रामस्थांसमक्ष मृतक मारोती नागोसे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या स्वाधीन केली. त्यांना आपुलकीच्या भावनेतून धीर दिला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या दोन मुली, एक मुलगा व कुटुंबातील इतर सदस्य उघड्यावर पडले. दोन मुली व शिक्षणाची आवड असलेला मुलगा सुमित उर्फ झोल्या याचे कसे होईल याची काळजी कुटूंबाला होती. ही बाब ओळखत मनोहर शहारे यांनी तत्काळ झोल्याला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्याला नोकरी मिळेपर्यंत संपूर्ण शिक्षणाचा भार उचलण्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यांच्यात असलेल्या अधिकाऱ्यातील माणुसकीने दिलेला हा प्रत्यय कोणालाही अभिमान वाटावा असाच होता. ही त्यांची पहिलीच वेळ नाही. अनेकवेळा त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय कळंबवासियंना आला आहे. त्यांच्यासारख्या इतर अधिकारी व सक्षम नागरिकांनी दिनदुबळ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले पाहीजे. तेंव्हाच कुठे प्रत्येक नागरिकांमध्ये आपुलकी व बंधुभावाचे नाते दृढ होईल.