शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

अधिकाऱ्यातील माणुसकीने सावरले कुटुंब

By admin | Updated: September 9, 2016 02:46 IST

शासनाने सोपविलेले काम प्रामाणिक करणे हे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असते.

प्रेरणादायी कार्य : वाघाच्या हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या शेतकऱ्याच्या मुलाला अधिकाऱ्याने घेतले दत्तक गजानन अक्कलवार कळंबशासनाने सोपविलेले काम प्रामाणिक करणे हे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य असते. अनेक अधिकारी आपले कर्तव्य नीट बजावतातही. परंतु सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावात्मक कार्य म्हणून जबाबदारी पार पाडणारे अधिकारी बोटावर मोजण्या इतकेच उरले आहेत. त्यामध्ये कळंब येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागात उपअभियंता म्हणून कार्यरत असणारे मनोहर शहारे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांच्या शासनबाह्य कार्याला सामाजिक बांधिलकीची किनार ही असतेच. दोन दिवसांपूर्वी वाघाच्या हल्यात मृत्युमूखी पडलेल्या शेतकऱ्याच्या मुलांना दत्तक घेत त्यांनी पुन्हा एकदा त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी दाखवून दिली.राळेगाव तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील खैरगाव (कासार) येथील आदिवासी शेतकरी मारोती विठोबा नागोसे यांच्यावर वाघाने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्याचे संपूर्ण कुंटुब उघड्यावर पडले. एकीकडे कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर दुसरीकडे अशाप्रकारे होणारे आघात त्यामुळे देशाच्या पोशिंद्यावरच आलेल्या संकटाची धग कमी करण्यासाठी काही चांगुलपणा जिवंत असणाऱ्या लोकांना मनोहर शहारे यांनी एकत्रित केले. त्यांना सोबत घेऊन खैरगाव (कासार) गाव गाठले. दु:खी कुटुंबाला आधार देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आपल्या दु:खात आम्हीही सहभागी आहोत, आलेल्या संकटाचा जो धैर्याने सामना करतो तोच जीवनात यशस्वी होतो. त्यामुळे आता आपण या दु:खातून सावरले पाहीजे. यासाठी मनोहर शहारे यांनी स्वत: व मित्रमंडळीकडून जमा केलेली आर्थिक मदत ग्रामस्थांसमक्ष मृतक मारोती नागोसे यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या स्वाधीन केली. त्यांना आपुलकीच्या भावनेतून धीर दिला. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या दोन मुली, एक मुलगा व कुटुंबातील इतर सदस्य उघड्यावर पडले. दोन मुली व शिक्षणाची आवड असलेला मुलगा सुमित उर्फ झोल्या याचे कसे होईल याची काळजी कुटूंबाला होती. ही बाब ओळखत मनोहर शहारे यांनी तत्काळ झोल्याला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्याला नोकरी मिळेपर्यंत संपूर्ण शिक्षणाचा भार उचलण्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यांच्यात असलेल्या अधिकाऱ्यातील माणुसकीने दिलेला हा प्रत्यय कोणालाही अभिमान वाटावा असाच होता. ही त्यांची पहिलीच वेळ नाही. अनेकवेळा त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय कळंबवासियंना आला आहे. त्यांच्यासारख्या इतर अधिकारी व सक्षम नागरिकांनी दिनदुबळ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले पाहीजे. तेंव्हाच कुठे प्रत्येक नागरिकांमध्ये आपुलकी व बंधुभावाचे नाते दृढ होईल.