शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

बारावीचा टक्का वाढला

By admin | Updated: May 28, 2015 01:51 IST

जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच बारावीच्या निकालाची टक्केवारी ९२.७७ इतकी राहिली आहे.

९२.७७ टक्के : उमरखेड, पांढरकवडा, झरी, दिग्रस, महागाव टॉप फाईव्हमध्ये यवतमाळ : जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच बारावीच्या निकालाची टक्केवारी ९२.७७ इतकी राहिली आहे. जिल्ह्यातून सर्वाधिक ९५.८४ टक्के गुण घेत अँग्लो हिंदी हायस्कूलच्या विज्ञान शाखेतील सागर संजय नखाते या विद्यार्थ्याने बाजी मारली आहे. तर मुलींमधून जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या वाणिज्य शाखेतील हेमांगी अशोक कोठारी ही ९३.६९ टक्के गुण घेत अव्वल राहिली. मागील वर्षीच्या ९०.८८ टक्के निकालाचा रेकॉर्ड यावर्षी ब्रेक झाला. जिल्ह्यातील २४ हजार ४५० विद्यार्थ्यांपैकी २२ हजार ६७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या निकालाने जिल्हाच निकालाच्या गुणवत्ता यादीत आला आहे. मागास तालुक्यातही भरघोस निकाल लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या तालुक्यांच्या निकालात वाढ झाली असून जिल्ह्याचा टक्का वाढला आहे.बारावीच्या परीक्षेमध्ये जिल्ह्याच्या निकालाचा टक्का वाढला आहे. मागील वर्षी ९०.८८ टक्के निकाल लागला होता. यावर्षी यात तब्बल तीन टक्क्यांनी वाढ झाली असून ९२.७७ टक्के निकाल लागला आहे. शिवाय उमरखेड, पांढरकवडा, झरीजामणी, दिग्रस, महागाव या तालुक्यांनी टक्केवारीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले आहे. यावर्षीसुद्धा उत्तीर्ण होण्यात मुलीच वरचढ असून त्यांचे प्रमाण ९४.८४ टक्के इतके आहे. तर मुलांची टक्केवारी ९०.९० टक्के इतकी आहे. जिल्ह्यातील तालुक्यांच्या शाळांमध्ये निकालाची टक्केवारी भरघोस राहिली आहे. १०० टक्के निकालाच्या येथे ४४ शाळा तर १८१ शाळांचा निकाल ९० टक्क्यांच्यावर आहे. जिल्ह्यातून २४ हजार ४५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २२ हजार ६७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेच्या निकालाची टक्केवारी सर्वाधिक असून ८ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. वाणिज्य शाखेतील दोन हजार १६० विद्यार्थ्यांपैकी २ हजार ४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. कला शाखेतील १२ हजार ८६० विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ६४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. होकेशनल अभ्यासक्रमाच्या एक हजार ७४ विद्यार्थ्यांपैकी ९०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या निकालाचा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळत होता. शाळा, महाविद्यालयात मात्र शुकशुकाट होता. मोबाईल अ‍ॅप्समुळे सायबर कॅफेमधीलही गर्दी यावर्षी कमी झालेली दिसून आली. बोर्डाची वेबसाईट नेहमीप्रमाणे हँग झाली होती. (कार्यालय प्रतिनिधी)दिग्रसचा यश, यवतमाळची श्रेया ठरले विदर्भाचे टॉपरदिग्रस येथील यश चांडक हा विद्यार्थी ९८ टक्के गुण मिळवून विदर्भातून पहिला तर महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. यश याने नागपुरातून बारावीची परीक्षा दिली. मूळ यवतमाळची मात्र सध्या नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रेया साबू ही ९७.२३ गुणांसह विदर्भातून मुलींमध्ये टॉपर राहिली आहे. ती येथील डॉ.रवी आणि डॉ.जयश्री साबू यांची मुलगी आहे.