शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

घाटंजी बीडीओंसह कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची ॲलर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:51 IST

सध्या ग्रामीण भागात पाण्यासह अनेक समस्या आहे. गटविकास अधिकारी जनतेच्या समस्या सोडविण्याऐवजी मुख्यालयाला दांडी मारत आहेत. आपल्यासोबतच कर्मचारी व ...

सध्या ग्रामीण भागात पाण्यासह अनेक समस्या आहे. गटविकास अधिकारी जनतेच्या समस्या सोडविण्याऐवजी मुख्यालयाला दांडी मारत आहेत. आपल्यासोबतच कर्मचारी व ग्रामसेवकांनाही त्यांनी पूर्णत: मुभा दिल्याचे चित्र दिसत आहे. कार्यालयात उपस्थित असल्यास जनतेत जनजागृती करण्याऐवजी केवळ स्वतःच्या सुरक्षेसाठी पंचायत समितीचे सर्व दरवाजे बंद करून कुणाशीही संपर्क न साधता जनतेला पंचायत समितीमध्ये प्रवेश नाकारला जात आहे.

कोरोनामुळे गावागावांत आपत्ती असतानासुद्धा आपत्ती व्यवस्थापन समितीमधील ग्रामसेवक, तलाठी, कृषी साहाय्यक हे सर्व दिसेनासे झाले आहे. ग्रामस्थ त्यांची व्यथा मांडण्यासाठी त्यांचा शोध घेत आहे. गटविकास अधिकाऱ्यांकडे गेल्यास पंचायत समितीचे सर्व बाजूंनी दरवाजे बंद केले जातात. मग जनतेने भेटायचे कोणाला?, हा मोठा प्रश्न उभा आहे. पंचायत समितीमध्ये प्रवेश करण्याआधी कोरोना चाचणी करा, असे फलक लावण्यात आले आहे. मात्र, तेथे कोरोना चाचणीची कोणतीही व्यवस्था केली नाही. बाहेरून चाचणी करून प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यालाही प्रवेश नाकारला जातो. त्यामुळे प्रवेशद्वार बंद ठेवण्याचे कारण काय?, असा प्रश्न आहे.

याबाबत काहींनी लोकप्रतिनिधींना विचारले असता तेही मूग गिळून बसले आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा शिरजोरपणा चांगलाच वाढला आहे. उलट लोकप्रतिनिधी आम्हालाही काम करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्याचे सांगून जनतेची बोळवण करीत आहे.

बॉक्स

घरकुल, राेहयोची कामे रखडली

गटविकास अधिकारी रुजू झाल्यापासून अपवादात्मक ग्रामपंचायतींना भेटी दिल्या आहेत. त्यांना ग्रामीण जनतेच्या कोणत्याही समस्येची अथवा कोरोना महामारीवर प्रतिबंध घालण्याशी काहीच देणे-घेणे नसल्याचे यावरून दिसून येते. शिवाय गावस्तरावर रोजगार हमी याेजनेची कामे रखडली आहे. ग्रामीण जनतेला रोजगार नाही. घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते अडकून पडले आहे. बीडीओ यवतमाळ येथे वास्तव्यास राहत असून शासकीय वाहनाने ये-जा करतात. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याची मागणी होत आहे.