शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कसा करायचा प्रवास ? केवळ ७१ बसेस मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 05:00 IST

बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी तर यवतमाळ विभागातून अमरावती वगळता कुठेही बसेस सुरू नाहीत. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसद्वारे वर्धा, नागपूर, नांदेड, चंद्रपूर आदी ठिकाणी प्रवास करावा लागतो. महामंडळाचे अधिकारी संबंधित कर्मचाऱ्याचे गाव गाठून त्यांच्या कुुटुंबाची, गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीची, लोकप्रतिनिधीची भेट घेवून एसटी कर्मचाऱ्याला कामावर पाठवा, अशी विनंती करत आहे. यानंतरही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे यवतमाळ विभागातून ४८५ पैकी केवळ ७१ बस फेऱ्या मार्गावर धावत आहे. महामंडळाकडून बसफेऱ्या वाढविण्यासाठी विविध प्रयोग केले जात असतानाही अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी तर यवतमाळ विभागातून अमरावती वगळता कुठेही बसेस सुरू नाहीत. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या बसेसद्वारे वर्धा, नागपूर, नांदेड, चंद्रपूर आदी ठिकाणी प्रवास करावा लागतो. महामंडळाचे अधिकारी संबंधित कर्मचाऱ्याचे गाव गाठून त्यांच्या कुुटुंबाची, गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीची, लोकप्रतिनिधीची भेट घेवून एसटी कर्मचाऱ्याला कामावर पाठवा, अशी विनंती करत आहे. यानंतरही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. परिणामी एसटीच्या फेऱ्या वाढण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. 

संपकरी संपावर ठाम - एसटीचे शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. - कितीही आर्थिक अडचणी निर्माण झाल्यातरी विलीनीकरणाचा लढा सुरूच राहील, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाही.  

 पुसद, उमरखेड आगारातून केवळ चार बसेस      - पुसद आणि उमरखेड आगारातून प्रत्येकी केवळ दोन बसेस मार्गावर धावत आहे. या आगारात अनुक्रमे ६५ आणि ५५ बसेस आहेत.  - सर्वाधिक २८ बसेस यवतमाळ आगारातून सोडल्या जात आहे. या आगारामध्ये ८३ बसेस आहे. मुख्यालयांच्या ठिकाणचे बसस्थानक असतानाही कर्मचाऱ्यांचा थंड प्रतिसाद आहे.  

ग्रामीणची मदार खासगीवरच - सध्या सुरू असलेल्या बसफेऱ्या केवळ तालुक्याच्या गावापर्यंत जात आहे. ग्रामीण भागात अपवादानेच बसफेरी आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांंना खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही. 

बसफेऱ्या वाढविण्यासाठी विभाग पातळीवर प्रयत्न केेले जात आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात येत आहे. याशिवाय एसटी कार्यशाळेतील यांत्रिक कर्मचारी, वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक यांची सेवा चालक-वाहक म्हणून घेतली जात आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आरोग्य चाचणी आदी बाबी तपासून त्यांना कामावर घेण्यात येत आहे. कर्मचारी कामावर यावे यासाठी अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहे. यामुळे फेऱ्या वाढतील. - श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक

टॅग्स :ST Strikeएसटी संप