शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

तूर उत्पादकांचे आणखी किती हाल करणार हो!

By admin | Updated: March 19, 2017 01:28 IST

सुरूतीला बारदाना आणि आता जागेअभावी उघड्यावर पडलेली तूर गुरूवारी अवकाळी पावसाने घुगऱ्यात रूपांतरीत झाली.

जागा अन् बारदाना नाही : आता व्यवस्थापकही झाले गायब, वरिष्ठांकडे दाखविले जात आहे बोट यवतमाळ : सुरूतीला बारदाना आणि आता जागेअभावी उघड्यावर पडलेली तूर गुरूवारी अवकाळी पावसाने घुगऱ्यात रूपांतरीत झाली. तरीही तूर खरेदीसाठी शासन स्तरावरून ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. यामुळे तूर उत्पादकांचे आणखी किती होल होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. शासकीय तूर खरेदी सुरू होताच प्रथम बारदाना नसल्याचे कारण पुढे करून ती थांबविण्यात आली. त्याचवेळी शासकीय यंत्रणेला जागा उपलब्ध नसल्याचीही पुरेपूर माहिती होती. तथापि सुरूवातीला बारदान्याचे कारण समोर करून तब्बल १५ दिवस अधिकारी शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट बघत राहिले. बारदाना येईल किंवा नाही, याबाबतही यंत्रणा साशंक होती. यातून शासनासोबतच अधिकारीसुद्धा शेतकऱ्यांप्रती किती संवेदनशील आहे, हे दिसून आले. बारदाना आल्यानंतर जागेचा प्रश्न भेडसावणार, याची माहिती असूनही प्रशासनाने या समस्येकडे प्रथम कानाडोळा केला. परिणामी बारदाना पोहोचल्यानंतर यंत्रणा हडबडली. नाईलाजास्तव त्यांना केंद्रीय वखार महामंडळाकडे धाव घेत जागेची मागणी करावी लागली. केंद्रीय वखार महामंडळाच्या येथील कार्यालयाने कानावर हात ठेवत त्यातही पुन्हा खोडा घातला. वरिष्ठांना विचारावे लागेल, अशी भूमिका घेत त्यांनी वर बोट दाखविले. परिणामी अद्यापही जागेची समस्या कायम आहे. आठवडा लोटला तरी एफसीआयकडून कुठल्याही हालचाली झाल्या नाही. त्यामुळे आता जागेअभावी तूर खरेदी थांबली आहे. एवढ्यावरच शेतकऱ्यांचे ग्रहण सुटले नाही, तर सीडब्ल्यूसीचे व्यवस्थापक आता रजेवर गेले. ते ऐनवेळी रजेवर गेल्याने जागेचा प्रश्न पुन्हा लोंबकळत पडला आहे. ते परत आल्यानंतरच जागेचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. जागा उपलब्ध आहे किंवा नाही, याची माहितीही जिल्हा प्रशासनाला मिळणे दुरापास्त झाले आहे. (शहर प्रतिनिधी) अखेरच्या दाण्यापर्यंत खरेदी अशक्य पूर्वी हमी दरापेक्षा खुल्या बाजारातील दर अधिक असायचे. यामुळे शासकीय खरेदी केंद्र कधी सुरू झाले अन् कधी बंद झाले, कुणालाच कळत नव्हते. मात्र यावर्षी या केंद्रांचा खरा कस लागला. खुल्या बाजारात तुरीचे दर हमीदरापेक्षा खाली गेल्याने या केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या. यातून केंद्रात कुठलीच व्यवस्था नसल्याने सरकारी यंत्रणेचा ढोंगी चेहराही उघड झाला. अशा स्थितीत अखेरच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करण्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. त्यांचा हा दावा पोकळ ठरत असल्याचे आता दिसून येत आहे. १५ एप्रिलला ही केंद्रे बंद होणार आहेत. तोपर्यंत खरच सर्व प्रश्न सुटतील का, हा प्रश्न आहे.