शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

जिल्हा बँक नोकरभरतीत ‘कुणाला कोटा किती’ने वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 21:29 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत होऊ घातलेल्या नोकरभरतीच्या अनुषंगाने कुणाला किती ‘कोटा’ या मुद्यावरून संचालकांमध्ये वाद सुरू आहे. त्यातूनच अनेक गटही पडले आहेत. एक-दोन जागांचा मिळणारा कोटा मान्य न केल्यास थेट भरतीच रद्द करण्याची धमकी दिली जात असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देसंचालकात अनेक गट : मिळतो तो कोटा घ्या, अन्यथा भरती रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत होऊ घातलेल्या नोकरभरतीच्या अनुषंगाने कुणाला किती ‘कोटा’ या मुद्यावरून संचालकांमध्ये वाद सुरू आहे. त्यातूनच अनेक गटही पडले आहेत. एक-दोन जागांचा मिळणारा कोटा मान्य न केल्यास थेट भरतीच रद्द करण्याची धमकी दिली जात असल्याची माहिती आहे.जिल्हा बँकेत लिपिकाच्या १३३ व शिपायाच्या १४ अशा १४७ जागांसाठी लवकरच आॅनलाईन परीक्षेद्वारे नोकरभरती घेतली जाणार आहे. अमरावतीच्या एजंसीला याचे कंत्राट देण्यात आले आहे. या भरतीकडून बहुतांश संचालकांना मोठ्या आर्थिक आशा आहेत. काहींनी तर परस्परच व्यवहारही केले आहेत. टोकण म्हणून घेतलेली लाखो रुपयांची रक्कम खर्चीही घातली आहे. इकडे मात्र बँकेत भरतीत कुणाला किती वाटा द्यायचा यावरून संचालकांमध्ये एकमत झालेले नाही. संचालकांना एक-दोन जागांचा कोटा मान्य नाही. कारण काहींनी तर आठ-दहा व्यक्तींचे पैसे घेऊन त्याच्या व्याजाचा लाभ घेणेही सुरू केले आहे.जिल्हा बँकेवर एक-दोन सदस्यांच्या बळावर भाजपचे वर्चस्व आहे, असे मानले जाते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख भाजप नेत्याच्या इशाऱ्यावर बँकेचा कारभार सुरू असल्याचे सांगितले जाते. याच कारणावरून संचालकांमध्ये नाराजी पहायला मिळते. सर्व काही भाजप नेतेच ठरवित असल्याने बँकेच्या संचालक मंडळाला अर्थ काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ४७ जागा दोनच्या कोट्यानुसार संचालकांना वाटून उर्वरित शंभर जागांवर एकछत्री कोटा निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची माहिती आहे. त्यामुळेच संचालकांना मिळतो तो कोटा मान्य करा आणि गप्प बसा, नाही तर संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द करू, भाजप नेत्याची नाराजी झाल्यास संचालक मंडळाला मुदतवाढही मिळणार नाही, येथे प्रशासक बसेल अशा धमक्या संचालकांना दिल्या जात असल्याचे सांगितले जाते. याच मुद्यावरून बहुतांश संचालक एका बाजूने झाले आहेत. भाजपच्या संचालकाला केवळ वणी विभागातील एका संचालकाची तेवढी साथ असल्याचे बोलले जाते.एकूणच मुदतवाढीवरून गेली दहा-बारा वर्ष एकजूट असलेल्या बँकेच्या संचालक मंडळात भरतीमुळे मात्र वाद निर्माण केले आहे. हे वाद सामंजस्याने मिटतात की विकोपाला जातात याकडे नजरा लागल्या आहेत. संचालकांमधील हे ‘कोट्या’वरून निर्माण झालेले रुसवे-फुगवे बघता जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकरभरती आॅनलाईन असूनही पारदर्शक नसल्याचे स्पष्ट होते. भरती पारदर्शक असेल तर कोटा हवाच कशाला असा प्रश्न आहे. संचालकांमधील वादातच भरतीतील संभाव्य गैरप्रकाराचे पुरावे दडले आहेत, असे मानले जाते.‘टोकण’ घेणारे संचालक चिंताग्रस्तभरती रद्द करण्याच्या धमक्यांमुळे व्यवहार करून बसलेले व टोकण खर्ची घातलेले संचालक अस्वस्थ होताना दिसत आहे. कारण भरती रद्द झाली तर पैसा परत देण्याची वेळ काही संचालकांवर येऊ शकते. खर्च केलेला पैसा पुन्हा उभा करायचा कोठून अशी समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून काही संचालक भरती रद्द होऊ नये, किमान कोटा वाढावा यासाठी आग्रही आहेत. त्याच वेळी काही संचालकांनी एकदाची भरती रद्दच होऊ द्या, कुणालाच कशाचाच वाटा मिळणार नाही किंवा भरती शंभर टक्के पारदर्शकपणे पार पडू द्या, अशी टोकाची भूमिकाही या भाजपच्या गोटातून मिळणाºया सततच्या धमक्यांमुळे घेतल्याचे दिसते.जिल्हा बँकेची नोकरभरती राजकीय स्तरावरून रद्द होण्याचा प्रश्न नाही. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे सध्या नियुक्ती आदेश देण्यास मनाई आहे. ‘कोटा’ या प्रकाराचा संबंध नसून यावरून संचालकांमध्ये वाद अथवा भांडणे असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.- अमन गावंडेअध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, यवतमाळ.

टॅग्स :bankबँक