शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

घरे, फळबागांचे नुकसान

By admin | Updated: May 9, 2016 02:28 IST

तालुक्याला गेली दोन दिवस झालेल्या वादळाचा जबरदस्त तडाखा बसला. अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. केळी जमीनदोस्त झाली.

जनावरे ठार : नेर तालुक्यातील वादळग्रस्तांची तालुका प्रशासनाकडे भरपाईची मागणीनेर : तालुक्याला गेली दोन दिवस झालेल्या वादळाचा जबरदस्त तडाखा बसला. अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. केळी जमीनदोस्त झाली. काही जनावरे मृत्युमुखी पडली. अवकाळी पावसामुळे आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्यात यावी, अशी नुकसानग्रस्तांची मागणी आहे. तालुक्यात शुक्रवारी वादळ आणि गारांसह पाऊस झाला. टाकळी (सलामी) येथील सारंग वसंत जाधव यांच्या शेतातील केळीची ५५० झाडे जमिनदोस्त झाली. नेर येथील छगन बबन माकोडे यांचे घर कोसळले. त्याखाली दबून बोकड ठार झाला. या घटनेत त्यांचे ५० हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज तहसील प्रशासनाने व्यक्त केला. खुशाल महादेव मिसाळ यांच्या गोठ्यावरील टीनपत्रे उडाली. पिंपळगाव (डुब्बा) येथे चार घरांचे, सावंगा येथे दोन घरे आणि लोनाडी येथे तीन घरांचे नुकसान झाले. सिंदखेड येथे एका घरावर झाड कोसळले. बाळेगाव येथील अनिल पुंडलिक इंगोले यांच्या गायीचे वासरू वादळाने ठार झाले. पिंपळगाव (काळे) येथील २५ घरांवरील टिनपत्रे उडाली. घर कोसळल्याने याच गावातील लक्ष्मण अमरसिंग चव्हाण (६५), सारिका राजू कुरखंडे (३५) जखमी असून त्यांच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. जीवन जुनघरे (३२), दिनेश मांडुळकर (२५), प्रवीण जाधव (२८) हेसुद्धा जखमी झाले आहेत. वटफळी येथे तीन घरे व फळबागा, मालखेड (बु) येथे प्रशांत उत्तम चव्हाण व बबिता उत्तम चव्हाण यांची फळबाग उद्ध्वस्त झाली. खरडगाव येथे सुखदेव श्यामराव गुल्हाने यांचा गोठा कोसळून एक बैल ठार झाला, तर याच गावातील सहा घरांवरील टिनपत्रे उडाली. वादळामुळे विद्युत खांब कोसळल्याने अनेक गावांमधील वीज पुरवठा खंडित झाला होता. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून भरपाई द्यावी, अशी मागणी आहे. नुकसानग्रस्तांमध्ये शेतकऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ते आर्थिक अडचणीत आहेत. अशावेळी त्यांना मदतीची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)