शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

घरे, फळबागांचे नुकसान

By admin | Updated: May 9, 2016 02:28 IST

तालुक्याला गेली दोन दिवस झालेल्या वादळाचा जबरदस्त तडाखा बसला. अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. केळी जमीनदोस्त झाली.

जनावरे ठार : नेर तालुक्यातील वादळग्रस्तांची तालुका प्रशासनाकडे भरपाईची मागणीनेर : तालुक्याला गेली दोन दिवस झालेल्या वादळाचा जबरदस्त तडाखा बसला. अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. केळी जमीनदोस्त झाली. काही जनावरे मृत्युमुखी पडली. अवकाळी पावसामुळे आणि वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्यात यावी, अशी नुकसानग्रस्तांची मागणी आहे. तालुक्यात शुक्रवारी वादळ आणि गारांसह पाऊस झाला. टाकळी (सलामी) येथील सारंग वसंत जाधव यांच्या शेतातील केळीची ५५० झाडे जमिनदोस्त झाली. नेर येथील छगन बबन माकोडे यांचे घर कोसळले. त्याखाली दबून बोकड ठार झाला. या घटनेत त्यांचे ५० हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज तहसील प्रशासनाने व्यक्त केला. खुशाल महादेव मिसाळ यांच्या गोठ्यावरील टीनपत्रे उडाली. पिंपळगाव (डुब्बा) येथे चार घरांचे, सावंगा येथे दोन घरे आणि लोनाडी येथे तीन घरांचे नुकसान झाले. सिंदखेड येथे एका घरावर झाड कोसळले. बाळेगाव येथील अनिल पुंडलिक इंगोले यांच्या गायीचे वासरू वादळाने ठार झाले. पिंपळगाव (काळे) येथील २५ घरांवरील टिनपत्रे उडाली. घर कोसळल्याने याच गावातील लक्ष्मण अमरसिंग चव्हाण (६५), सारिका राजू कुरखंडे (३५) जखमी असून त्यांच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. जीवन जुनघरे (३२), दिनेश मांडुळकर (२५), प्रवीण जाधव (२८) हेसुद्धा जखमी झाले आहेत. वटफळी येथे तीन घरे व फळबागा, मालखेड (बु) येथे प्रशांत उत्तम चव्हाण व बबिता उत्तम चव्हाण यांची फळबाग उद्ध्वस्त झाली. खरडगाव येथे सुखदेव श्यामराव गुल्हाने यांचा गोठा कोसळून एक बैल ठार झाला, तर याच गावातील सहा घरांवरील टिनपत्रे उडाली. वादळामुळे विद्युत खांब कोसळल्याने अनेक गावांमधील वीज पुरवठा खंडित झाला होता. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून भरपाई द्यावी, अशी मागणी आहे. नुकसानग्रस्तांमध्ये शेतकऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ते आर्थिक अडचणीत आहेत. अशावेळी त्यांना मदतीची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)