शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

गृहरक्षकदलाच्या जवानाची न्यायासाठी भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 22:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशेंबाळपिंपरी : शासकीय कामासाठी हिंगोली येथे जात असताना झालेल्या अपघातानंतर गृहरक्षक दलाचा जवान दोन वर्षांपासून अंथरुणावर खिळून आहे. न्यायासाठी त्याने पोलीस विभागातील अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. परंतु अद्यापही त्याला कुणी मदतीचा हात दिला नाही. आता त्याच्याजवळ वैद्यकीय खर्चासाठी पैसे नसल्याने उपेक्षेचे जीणं जगत आहे.तुकाराम महादू हजारे (४८) रा. शेंबाळपिंपरी ...

ठळक मुद्देअंथरुणावर खिळून : अपघातानंतर पोलिसांकडून बेदखल

लोकमत न्यूज नेटवर्कशेंबाळपिंपरी : शासकीय कामासाठी हिंगोली येथे जात असताना झालेल्या अपघातानंतर गृहरक्षक दलाचा जवान दोन वर्षांपासून अंथरुणावर खिळून आहे. न्यायासाठी त्याने पोलीस विभागातील अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. परंतु अद्यापही त्याला कुणी मदतीचा हात दिला नाही. आता त्याच्याजवळ वैद्यकीय खर्चासाठी पैसे नसल्याने उपेक्षेचे जीणं जगत आहे.तुकाराम महादू हजारे (४८) रा. शेंबाळपिंपरी असे गृहरक्षक दलाच्या जवानाचे नाव आहे. तो शेंबाळपिंपरी येथील पोलीस चौकीत कार्यरत होता. तो ९ फेब्रुवारी २०१६ रोजी व्हिसेरा घेऊन हिंगोलीकडे जात होता. त्यावेळी अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी सुरुवातीला खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार केले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने नांदेड, पुणे व वर्धा येथे उपचार करण्यात आले. मात्र तो बरा झाला नाही. अशा अवस्थेतच घरी आणण्यात आले. या अपघाताने त्याला ५२ टक्के अपंगत्व आले आहे. प्लास्टिक सर्जरी केल्याशिवाय पर्याय नाही. परंतु पोलिसांनी हातवर केल्याने आता त्याच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. शासकीय मदतीसाठी त्याने विविध ठिकाणी अर्ज दिले. परंतु अद्यापही त्याला मदत मिळाली नाही.दरम्यान तुकाराम हजारे यांची हलाखीची परिस्थिती पाहून आमदार मनोहरराव नाईक यांनी वैद्यकीय खर्च भागविण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याचे निर्देश खंडाळा पोलिसांना दिले आहे. आता काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.