शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
5
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
6
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
7
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
8
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
9
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
10
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
11
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
12
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
13
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
14
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
15
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
16
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
17
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
18
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
19
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या

घरकूल मिळाले सुविधा मात्र नाही

By admin | Updated: August 19, 2015 02:43 IST

नगरपरिषदेच्या वतीने प्रभाग क्रमांक १ मधील रेल्वे स्टेशन परिसरात ९२ घरकुलांचे बांधकाम करण्यात आले.

मुकेश इंगोले दारव्हानगरपरिषदेच्या वतीने प्रभाग क्रमांक १ मधील रेल्वे स्टेशन परिसरात ९२ घरकुलांचे बांधकाम करण्यात आले. परंतु संबंधित लाभार्थ्यांना अधिकृतपणे घरांचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे अनेक वर्षे कुडाच्या घरात राहुल वैतागलेल्या लोकांनी मिळेल ते घरकूल ताब्यात घेतले पण त्याठिकाणी सुविधा नसल्याने त्यांना मरणयातनाच भोगाव्या लागत आहेत. अनेक वर्षांनंतर या घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे वीज, पाणी यासह अत्यावश्यक सुविधा पुरविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कुडाच्या घरातून सिमेंटच्या घरात राहायला गेल्यानंतरही या रहिवाशांना हाल सोसावे लागत आहे. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत दारव्हा शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, पेट्रोलपंपाजवळ आणि दत्त नगरमध्ये घरकुल योजना राबविण्याकरिता १० डिसेंबर २००८ मध्ये १० कोटी १५ लाख ३८ हजार रुपये मंजूर झाले होते. परंतु दोन भागात विरोध झाल्यामुळे त्याठिकाणचे काम रद्द करून काही निधी प्राप्त झाल्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात घरकूल बांधकामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या ठिकाणी मंजूर १३६ घरकुलांपैकी ९२ घरकुलांचे काम सुरू झाल्यानंतर या योजनेचे मॉडेल तयार करून तेथील रहिवाशांना सुंदर व सर्व सुविधायुक्त घरांचे स्वप्न दाखविण्यात आले. त्यावेळी इच्छा नसतांनाही लोकांनी आपली घरे खाली करून दिली. त्यानंतर त्यांची व्यवस्था तात्पुरत्या टिनाच्या शेडमध्ये करण्यात आली तर काहींनी कुडाचे घर तयार केले. २०११ मध्ये सुरु झालेल्या या कामाला मधल्या काळात काही कारणांमुळे बराच विलंब लागला. त्यामुळे टिनाचे शेड व कुडाच्या घरात राहणाऱ्यांनी प्रचंड हाल सोसले. ऊन, पाऊस, वाऱ्याचा मारा झेलला. अनेकदा वादळामुळे घरांचे नुकसान झाले. परंतु त्याही परिस्थितीत या लोकांनी दिवस काढले. जवळपास वर्षभरापूर्वी घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु घरकुलाचे वाटप होत नव्हते, त्यामुळे आधीच कुडाच्या घरात राहून वैतागलेल्या लोकांनी मिळेल ते घरकुल ताब्यात घेऊन त्यात आपला संसार मांडला. परंतु हालअपेष्टांनी तिथेही त्यांचा पिच्छा सोडला नाही. घरकुलाचे बांधकाम जरी पूर्ण झाले तरी त्या ठिकाणी वीज कनेक्शन देण्यात आले नाही. पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्याचबरोबर इतर अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात न आल्याने गेल्या वर्षभरापासून घरकुलवासियांना अंधारात दिवस काढावे लागत आहे. पाण्याच्या टाक्या बऱ्याच दिवसांपासून नगरपरिषदेमध्ये पडून आहेत. परंतु त्या घरकुलावर बसविण्यात आल्या नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागते. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचवावे त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या याकरिता शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. दारव्हा शहरातसुद्धा याच उद्देशाने हा प्रकल्प मंजूर झाला होता. परंतु नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे ही चांगली योजना बदनाम झाल्याचे बालले जात आहे.