शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
3
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
4
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
5
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
6
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
7
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
8
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
9
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
10
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
11
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
12
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
13
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
14
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
15
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
16
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
17
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
18
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
19
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
20
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल

घरकूल मिळाले सुविधा मात्र नाही

By admin | Updated: August 19, 2015 02:43 IST

नगरपरिषदेच्या वतीने प्रभाग क्रमांक १ मधील रेल्वे स्टेशन परिसरात ९२ घरकुलांचे बांधकाम करण्यात आले.

मुकेश इंगोले दारव्हानगरपरिषदेच्या वतीने प्रभाग क्रमांक १ मधील रेल्वे स्टेशन परिसरात ९२ घरकुलांचे बांधकाम करण्यात आले. परंतु संबंधित लाभार्थ्यांना अधिकृतपणे घरांचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे अनेक वर्षे कुडाच्या घरात राहुल वैतागलेल्या लोकांनी मिळेल ते घरकूल ताब्यात घेतले पण त्याठिकाणी सुविधा नसल्याने त्यांना मरणयातनाच भोगाव्या लागत आहेत. अनेक वर्षांनंतर या घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे वीज, पाणी यासह अत्यावश्यक सुविधा पुरविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कुडाच्या घरातून सिमेंटच्या घरात राहायला गेल्यानंतरही या रहिवाशांना हाल सोसावे लागत आहे. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत दारव्हा शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, पेट्रोलपंपाजवळ आणि दत्त नगरमध्ये घरकुल योजना राबविण्याकरिता १० डिसेंबर २००८ मध्ये १० कोटी १५ लाख ३८ हजार रुपये मंजूर झाले होते. परंतु दोन भागात विरोध झाल्यामुळे त्याठिकाणचे काम रद्द करून काही निधी प्राप्त झाल्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात घरकूल बांधकामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या ठिकाणी मंजूर १३६ घरकुलांपैकी ९२ घरकुलांचे काम सुरू झाल्यानंतर या योजनेचे मॉडेल तयार करून तेथील रहिवाशांना सुंदर व सर्व सुविधायुक्त घरांचे स्वप्न दाखविण्यात आले. त्यावेळी इच्छा नसतांनाही लोकांनी आपली घरे खाली करून दिली. त्यानंतर त्यांची व्यवस्था तात्पुरत्या टिनाच्या शेडमध्ये करण्यात आली तर काहींनी कुडाचे घर तयार केले. २०११ मध्ये सुरु झालेल्या या कामाला मधल्या काळात काही कारणांमुळे बराच विलंब लागला. त्यामुळे टिनाचे शेड व कुडाच्या घरात राहणाऱ्यांनी प्रचंड हाल सोसले. ऊन, पाऊस, वाऱ्याचा मारा झेलला. अनेकदा वादळामुळे घरांचे नुकसान झाले. परंतु त्याही परिस्थितीत या लोकांनी दिवस काढले. जवळपास वर्षभरापूर्वी घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु घरकुलाचे वाटप होत नव्हते, त्यामुळे आधीच कुडाच्या घरात राहून वैतागलेल्या लोकांनी मिळेल ते घरकुल ताब्यात घेऊन त्यात आपला संसार मांडला. परंतु हालअपेष्टांनी तिथेही त्यांचा पिच्छा सोडला नाही. घरकुलाचे बांधकाम जरी पूर्ण झाले तरी त्या ठिकाणी वीज कनेक्शन देण्यात आले नाही. पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्याचबरोबर इतर अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात न आल्याने गेल्या वर्षभरापासून घरकुलवासियांना अंधारात दिवस काढावे लागत आहे. पाण्याच्या टाक्या बऱ्याच दिवसांपासून नगरपरिषदेमध्ये पडून आहेत. परंतु त्या घरकुलावर बसविण्यात आल्या नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागते. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचवावे त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या याकरिता शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. दारव्हा शहरातसुद्धा याच उद्देशाने हा प्रकल्प मंजूर झाला होता. परंतु नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे ही चांगली योजना बदनाम झाल्याचे बालले जात आहे.