शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल मिळाले सुविधा मात्र नाही

By admin | Updated: August 19, 2015 02:43 IST

नगरपरिषदेच्या वतीने प्रभाग क्रमांक १ मधील रेल्वे स्टेशन परिसरात ९२ घरकुलांचे बांधकाम करण्यात आले.

मुकेश इंगोले दारव्हानगरपरिषदेच्या वतीने प्रभाग क्रमांक १ मधील रेल्वे स्टेशन परिसरात ९२ घरकुलांचे बांधकाम करण्यात आले. परंतु संबंधित लाभार्थ्यांना अधिकृतपणे घरांचे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे अनेक वर्षे कुडाच्या घरात राहुल वैतागलेल्या लोकांनी मिळेल ते घरकूल ताब्यात घेतले पण त्याठिकाणी सुविधा नसल्याने त्यांना मरणयातनाच भोगाव्या लागत आहेत. अनेक वर्षांनंतर या घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे वीज, पाणी यासह अत्यावश्यक सुविधा पुरविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कुडाच्या घरातून सिमेंटच्या घरात राहायला गेल्यानंतरही या रहिवाशांना हाल सोसावे लागत आहे. एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत दारव्हा शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, पेट्रोलपंपाजवळ आणि दत्त नगरमध्ये घरकुल योजना राबविण्याकरिता १० डिसेंबर २००८ मध्ये १० कोटी १५ लाख ३८ हजार रुपये मंजूर झाले होते. परंतु दोन भागात विरोध झाल्यामुळे त्याठिकाणचे काम रद्द करून काही निधी प्राप्त झाल्यानंतर रेल्वे स्टेशन परिसरात घरकूल बांधकामाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या ठिकाणी मंजूर १३६ घरकुलांपैकी ९२ घरकुलांचे काम सुरू झाल्यानंतर या योजनेचे मॉडेल तयार करून तेथील रहिवाशांना सुंदर व सर्व सुविधायुक्त घरांचे स्वप्न दाखविण्यात आले. त्यावेळी इच्छा नसतांनाही लोकांनी आपली घरे खाली करून दिली. त्यानंतर त्यांची व्यवस्था तात्पुरत्या टिनाच्या शेडमध्ये करण्यात आली तर काहींनी कुडाचे घर तयार केले. २०११ मध्ये सुरु झालेल्या या कामाला मधल्या काळात काही कारणांमुळे बराच विलंब लागला. त्यामुळे टिनाचे शेड व कुडाच्या घरात राहणाऱ्यांनी प्रचंड हाल सोसले. ऊन, पाऊस, वाऱ्याचा मारा झेलला. अनेकदा वादळामुळे घरांचे नुकसान झाले. परंतु त्याही परिस्थितीत या लोकांनी दिवस काढले. जवळपास वर्षभरापूर्वी घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु घरकुलाचे वाटप होत नव्हते, त्यामुळे आधीच कुडाच्या घरात राहून वैतागलेल्या लोकांनी मिळेल ते घरकुल ताब्यात घेऊन त्यात आपला संसार मांडला. परंतु हालअपेष्टांनी तिथेही त्यांचा पिच्छा सोडला नाही. घरकुलाचे बांधकाम जरी पूर्ण झाले तरी त्या ठिकाणी वीज कनेक्शन देण्यात आले नाही. पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्याचबरोबर इतर अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात न आल्याने गेल्या वर्षभरापासून घरकुलवासियांना अंधारात दिवस काढावे लागत आहे. पाण्याच्या टाक्या बऱ्याच दिवसांपासून नगरपरिषदेमध्ये पडून आहेत. परंतु त्या घरकुलावर बसविण्यात आल्या नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना पायपीट करावी लागते. झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचवावे त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या याकरिता शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. दारव्हा शहरातसुद्धा याच उद्देशाने हा प्रकल्प मंजूर झाला होता. परंतु नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे ही चांगली योजना बदनाम झाल्याचे बालले जात आहे.