शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

घराला लागली आग; वृद्धेचा संसार खाक

By admin | Updated: April 26, 2015 00:02 IST

तालुक्यातील नवरगाव येथे शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घरातील फ्रिजने पेट घेतल्याने आग लागली.

शॉटसर्किट : किराणा दुकान, आटा चक्की, रोख दीड लाख रूपये, धान्य झाले भस्मसातमारेगाव : तालुक्यातील नवरगाव येथे शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घरातील फ्रिजने पेट घेतल्याने आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून तानेबाई जगन्नाथ आवारी या ७२ वर्षीय वृद्ध महिलेचा संसार खाक झाला.या आगीत रोख दीड लाख रूपये, लगतच्या किराणा दुकानातील सर्व साहित्य, आटा चक्की, घरातील धान्य, जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. यासोबतच घरातील १२ तोळे सोने गायब असल्याची माहिती तानेबाई यांनी दिली. तानेबाई या ७२ वर्षीय वृद्ध महिलेचे नवरगाव येथे किराणा दुकान, आटा चक्की, थंड पेयाचे दुकान आहे. त्यांचा मुलगा गावातच दुसरीकडे राहतो. त्यांची शेती धरणात गेल्यामुळे उपजीविकेसाठी वृद्ध तानेबाईने हा व्यवसाय सुरू केला. त्यांचे घर जुन्या काळातील असून लाकडाच्या पाट्यांची लादणी आहे.शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या घरातील फ्रीज जळायला सुरूवात झाली. फ्रीज जळत असल्याचा वास आल्याने आणि बघता-बघता घराला आग लागल्याने म्हातारी ओरडत घराच्या बाहेर पडली. शेजाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीने उग्ररूप धारण केले होते. आग आटोक्यात येत नसल्याने तत्काळ पोलीस व महसूल विभागाला माहिती देण्यात आली. मारेगाव पोलिसांनी तत्काळ वणी व पांढरकवडा येथील अग्नीशमन दलाला माहिती देऊन बंब पाठविण्याची मागणी केली व घटनास्थळ गाठले. ग्रामस्थांच्या मदतीने आग गावात पसरणार नाही, यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. वणी येथील अग्नीशमन दलाचे वाहन आल्यानंतर आग आटोक्यात आली. तानेबाई यांच्या घराला लाकडाचा वापर जादा असल्याने तोपर्यंत संपूर्ण घर जळून खाक झाले. घरातील एकही वस्तू बाहेर काढता आली नाही. या आगीत किराणा दुकानातील संपूर्ण साहित्य, धान्य, संसारोपयोगी वस्तू, आटा चक्की जळून खाक झाली.विहिरीचे बांधकाम करण्यासाठी बँकेतून काढून आणलेले दीड लाख रूपये आणि १२ तोळे सोनेही आगीत भस्मसात झाल्याची माहिती तानेबाईचा मुलगा रामकिसन आवारी यांनी दिली. संपूर्ण आयुष्याची कमाई बेचिराख झाल्याचे बघून वृद्ध तानेबाई धाय मोकलून रडत होती. घटनास्थळी तहसीलदार डॉ.संतोष येवलीकर, ठाणेदार उमेश पाटील, महसूल व पोलीस विभागाची चमू तळ ठोकून होते. वृत्तलिहिस्तोवर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असल्याने नेमका नुकसानीचा आकडा कळू शकला नाही. (शहर प्रतिनिधी)रस्त्यांची दुरवस्थापांढरकवडा : तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहे. अनेक मार्गांवर खड्डे असल्याने दररोज किरकोळ अपघातही घडत आहेत. पांढरकवडा अग्निशमन दलाची असमर्थताआगीचे वृत्त कळताच ठाणेदार उमेश पाटील यांनी पांढरकवडा येथील अग्निशमन दलाला गाडी पाठविण्याची विनंती केली. मात्र तेथील अग्निशमन विभागाने गाडी पाठविण्यास असमर्थता दाखविली. आमच्याकडे गाडी आहे, पाणीही आहे, मात्र चालकच नसल्याचे त्यांनी सांगितले. आग लागल्यानंतर चालकाविना अग्निशमन दलाच्या गाड्या उभ्या राहात असेल, तर शासन जनतेच्या पैशातून लाखो रूपये खर्च करून कशाला गाड्या खरेदी करतात, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत होते. वरिष्ठांनी याची दखल घेऊन सखोल दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.ग्रामस्थांच्या एकोप्याने मोठा अनर्थ टळलावणीवरून अग्निशमन दलाची गाडी गावात पोहोचेपर्यंत आग गावात पसरणार नाही, यासाठी गावकऱ्यांनी मिळेल तेथून पाणी आणून एकोप्याने आगीवर नियंत्रण ठेवले होते. तानेबाई आवारी यांचे घर मध्यवस्तीत असल्याने आगीवर नियंत्रण ठेवले नसते, तर संपूर्ण गाव आगीच्या विळख्यात सापडण्याची शक्यता बळावली होती. मात्र ग्रामस्थांनी एकजुटीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला शेवटी ‘गाव करी, ते राव न करी’, या सुभाषीताचा गावकऱ्यांनी प्रयत्य आणून दिला.