शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

घराला लागली आग; वृद्धेचा संसार खाक

By admin | Updated: April 26, 2015 00:02 IST

तालुक्यातील नवरगाव येथे शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घरातील फ्रिजने पेट घेतल्याने आग लागली.

शॉटसर्किट : किराणा दुकान, आटा चक्की, रोख दीड लाख रूपये, धान्य झाले भस्मसातमारेगाव : तालुक्यातील नवरगाव येथे शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घरातील फ्रिजने पेट घेतल्याने आग लागली. या आगीत संपूर्ण घर जळून तानेबाई जगन्नाथ आवारी या ७२ वर्षीय वृद्ध महिलेचा संसार खाक झाला.या आगीत रोख दीड लाख रूपये, लगतच्या किराणा दुकानातील सर्व साहित्य, आटा चक्की, घरातील धान्य, जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. यासोबतच घरातील १२ तोळे सोने गायब असल्याची माहिती तानेबाई यांनी दिली. तानेबाई या ७२ वर्षीय वृद्ध महिलेचे नवरगाव येथे किराणा दुकान, आटा चक्की, थंड पेयाचे दुकान आहे. त्यांचा मुलगा गावातच दुसरीकडे राहतो. त्यांची शेती धरणात गेल्यामुळे उपजीविकेसाठी वृद्ध तानेबाईने हा व्यवसाय सुरू केला. त्यांचे घर जुन्या काळातील असून लाकडाच्या पाट्यांची लादणी आहे.शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या घरातील फ्रीज जळायला सुरूवात झाली. फ्रीज जळत असल्याचा वास आल्याने आणि बघता-बघता घराला आग लागल्याने म्हातारी ओरडत घराच्या बाहेर पडली. शेजाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीने उग्ररूप धारण केले होते. आग आटोक्यात येत नसल्याने तत्काळ पोलीस व महसूल विभागाला माहिती देण्यात आली. मारेगाव पोलिसांनी तत्काळ वणी व पांढरकवडा येथील अग्नीशमन दलाला माहिती देऊन बंब पाठविण्याची मागणी केली व घटनास्थळ गाठले. ग्रामस्थांच्या मदतीने आग गावात पसरणार नाही, यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. वणी येथील अग्नीशमन दलाचे वाहन आल्यानंतर आग आटोक्यात आली. तानेबाई यांच्या घराला लाकडाचा वापर जादा असल्याने तोपर्यंत संपूर्ण घर जळून खाक झाले. घरातील एकही वस्तू बाहेर काढता आली नाही. या आगीत किराणा दुकानातील संपूर्ण साहित्य, धान्य, संसारोपयोगी वस्तू, आटा चक्की जळून खाक झाली.विहिरीचे बांधकाम करण्यासाठी बँकेतून काढून आणलेले दीड लाख रूपये आणि १२ तोळे सोनेही आगीत भस्मसात झाल्याची माहिती तानेबाईचा मुलगा रामकिसन आवारी यांनी दिली. संपूर्ण आयुष्याची कमाई बेचिराख झाल्याचे बघून वृद्ध तानेबाई धाय मोकलून रडत होती. घटनास्थळी तहसीलदार डॉ.संतोष येवलीकर, ठाणेदार उमेश पाटील, महसूल व पोलीस विभागाची चमू तळ ठोकून होते. वृत्तलिहिस्तोवर पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असल्याने नेमका नुकसानीचा आकडा कळू शकला नाही. (शहर प्रतिनिधी)रस्त्यांची दुरवस्थापांढरकवडा : तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहे. अनेक मार्गांवर खड्डे असल्याने दररोज किरकोळ अपघातही घडत आहेत. पांढरकवडा अग्निशमन दलाची असमर्थताआगीचे वृत्त कळताच ठाणेदार उमेश पाटील यांनी पांढरकवडा येथील अग्निशमन दलाला गाडी पाठविण्याची विनंती केली. मात्र तेथील अग्निशमन विभागाने गाडी पाठविण्यास असमर्थता दाखविली. आमच्याकडे गाडी आहे, पाणीही आहे, मात्र चालकच नसल्याचे त्यांनी सांगितले. आग लागल्यानंतर चालकाविना अग्निशमन दलाच्या गाड्या उभ्या राहात असेल, तर शासन जनतेच्या पैशातून लाखो रूपये खर्च करून कशाला गाड्या खरेदी करतात, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत होते. वरिष्ठांनी याची दखल घेऊन सखोल दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.ग्रामस्थांच्या एकोप्याने मोठा अनर्थ टळलावणीवरून अग्निशमन दलाची गाडी गावात पोहोचेपर्यंत आग गावात पसरणार नाही, यासाठी गावकऱ्यांनी मिळेल तेथून पाणी आणून एकोप्याने आगीवर नियंत्रण ठेवले होते. तानेबाई आवारी यांचे घर मध्यवस्तीत असल्याने आगीवर नियंत्रण ठेवले नसते, तर संपूर्ण गाव आगीच्या विळख्यात सापडण्याची शक्यता बळावली होती. मात्र ग्रामस्थांनी एकजुटीने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला शेवटी ‘गाव करी, ते राव न करी’, या सुभाषीताचा गावकऱ्यांनी प्रयत्य आणून दिला.