शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील जवळा येथे बोअरवेलमधून येतेय गरम पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 12:05 IST

Yawatmal News महागाव तालुक्यातील अंबोडा येथील बोअरवेलमधून गरम पाणी येत असलेल्या प्रकाराची शाही वाळते न वाळते तोच आर्णी तालुक्यातील लोणी येथील बोअरवेलमधून गरम पाणी निघत असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देगावकऱ्यांमध्ये आश्चर्यासह भीती

आसिफ शेख

 लोकमत न्यूज नेटवर्क   यवतमाळ: महागाव तालुक्यातील अंबोडा येथील बोअरवेलमधून गरम पाणी येत असलेल्या प्रकाराची शाही वाळते न वाळते तोच आर्णी तालुक्यातील लोणी येथील बोअरवेलमधून गरम पाणी निघत असल्याचे दिसून आले. या अजब प्रकाराने गावकऱ्यांमध्ये आश्चर्यासह भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महागाव तालुक्यात रविवारी मुडाणानजीक भूकंपाचा केंद्रबिंदू होता. मराठवाड्यात त्याचे धक्के जाणवले. त्यानंतर त्याच तालुक्यातील अंबोडा येथे एका बोअरवेलमधून गरम पाणी निघत असल्याची वार्ता पसरली. भूकंपामुळे हा प्रकार चर्चेचा विषय ठरला. असाच प्रकार आता आर्णी तालुक्यातील लोणी येथे उघडकीस आला आहे.

लोणी येथील साहेबराव पानचोरे यांच्या घरी बोअरवेल आहे. त्या बोअरवेलमधूनही गरम पाणी निघत आहे. पानचोरे यांनी सहा वर्षांपूर्वी आपल्या अंगणात बोअरवेल खोदली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यातून गरम पाणी निघत आहे. सुरुवातीला अत्यंत कमी प्रमाणात गरम पाणी निघत होते. मात्र, गेल्या दोन-चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गरम पाणी निघत आहे. याबाबत नीलेश पानचोरे यांनी आर्णी तहसीलदार परशराम भोसले व तलाठी भाऊ उबाळे यांना माहिती दिली आहे. दरम्यान, या प्रकाराने गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. सोबतच त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बोअरवेलमधून निघणारे गरम पाणी बघण्यासाठी परिसरातील नागरिक पानचोरे यांच्या घरी गर्दी करीत आहे. भूकंपानंतर गरम पाण्याचे प्रमाण वाढल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. आता प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यामुळे प्रशासन नेमकी कोणती उपाययोजना करते याकडे लक्ष लागले आहे.

अंबोडा येथील पाणी वापर बंदचे आदेश

महागाव तालुक्यातील अंबोडा येथील महादेवराव भोयर यांच्या अंगणातील बोअरवेलमधूनही गरम पाणी निघत आहे. मात्र, या गरम पाण्याचा भूकंपाशी संबंध नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, बुधवारी जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्या चमूने या हातपंपाची पाहणी केली. त्यांनी पाण्याची तपासणी केली. हातपंपातून ४० डिग्री उष्ण पाणी येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे चमूने या पाण्याचा वापर बंद करण्यास सांगितले. भूकंपानंतर भूगर्भात बदल झाल्याचा हा परिणाम असावा, अशी आर्णी व महागाव तालुक्यांतील जनतेत चर्चा आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके