शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्ह्यातील जवळा येथे बोअरवेलमधून येतेय गरम पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 12:05 IST

Yawatmal News महागाव तालुक्यातील अंबोडा येथील बोअरवेलमधून गरम पाणी येत असलेल्या प्रकाराची शाही वाळते न वाळते तोच आर्णी तालुक्यातील लोणी येथील बोअरवेलमधून गरम पाणी निघत असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देगावकऱ्यांमध्ये आश्चर्यासह भीती

आसिफ शेख

 लोकमत न्यूज नेटवर्क   यवतमाळ: महागाव तालुक्यातील अंबोडा येथील बोअरवेलमधून गरम पाणी येत असलेल्या प्रकाराची शाही वाळते न वाळते तोच आर्णी तालुक्यातील लोणी येथील बोअरवेलमधून गरम पाणी निघत असल्याचे दिसून आले. या अजब प्रकाराने गावकऱ्यांमध्ये आश्चर्यासह भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महागाव तालुक्यात रविवारी मुडाणानजीक भूकंपाचा केंद्रबिंदू होता. मराठवाड्यात त्याचे धक्के जाणवले. त्यानंतर त्याच तालुक्यातील अंबोडा येथे एका बोअरवेलमधून गरम पाणी निघत असल्याची वार्ता पसरली. भूकंपामुळे हा प्रकार चर्चेचा विषय ठरला. असाच प्रकार आता आर्णी तालुक्यातील लोणी येथे उघडकीस आला आहे.

लोणी येथील साहेबराव पानचोरे यांच्या घरी बोअरवेल आहे. त्या बोअरवेलमधूनही गरम पाणी निघत आहे. पानचोरे यांनी सहा वर्षांपूर्वी आपल्या अंगणात बोअरवेल खोदली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यातून गरम पाणी निघत आहे. सुरुवातीला अत्यंत कमी प्रमाणात गरम पाणी निघत होते. मात्र, गेल्या दोन-चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गरम पाणी निघत आहे. याबाबत नीलेश पानचोरे यांनी आर्णी तहसीलदार परशराम भोसले व तलाठी भाऊ उबाळे यांना माहिती दिली आहे. दरम्यान, या प्रकाराने गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. सोबतच त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बोअरवेलमधून निघणारे गरम पाणी बघण्यासाठी परिसरातील नागरिक पानचोरे यांच्या घरी गर्दी करीत आहे. भूकंपानंतर गरम पाण्याचे प्रमाण वाढल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. आता प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यामुळे प्रशासन नेमकी कोणती उपाययोजना करते याकडे लक्ष लागले आहे.

अंबोडा येथील पाणी वापर बंदचे आदेश

महागाव तालुक्यातील अंबोडा येथील महादेवराव भोयर यांच्या अंगणातील बोअरवेलमधूनही गरम पाणी निघत आहे. मात्र, या गरम पाण्याचा भूकंपाशी संबंध नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान, बुधवारी जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्या चमूने या हातपंपाची पाहणी केली. त्यांनी पाण्याची तपासणी केली. हातपंपातून ४० डिग्री उष्ण पाणी येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे चमूने या पाण्याचा वापर बंद करण्यास सांगितले. भूकंपानंतर भूगर्भात बदल झाल्याचा हा परिणाम असावा, अशी आर्णी व महागाव तालुक्यांतील जनतेत चर्चा आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके