शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

फळबागांचे झाले वाळवंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 22:41 IST

जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीचा सर्वाधिक फटका फळबागांना बसत आहे. हजारो हेक्टरवरील फळबागांचे वाळवंट झाले आहे. मात्र कृषी, महसूल व ग्रामीण विकास यंत्रणेला याची खबरबातच नाही. सर्वेक्षणाचा स्थायी आदेश असल्याची बतावणी करून जबाबदारी झटकण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेकडून होत आहे.

ठळक मुद्देदुष्काळी स्थिती : वाळलेल्या फळझाडांची आकडेवारीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीचा सर्वाधिक फटका फळबागांना बसत आहे. हजारो हेक्टरवरील फळबागांचे वाळवंट झाले आहे. मात्र कृषी, महसूल व ग्रामीण विकास यंत्रणेला याची खबरबातच नाही. सर्वेक्षणाचा स्थायी आदेश असल्याची बतावणी करून जबाबदारी झटकण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेकडून होत आहे.जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून १९९० पासून मार्च २०१८ अखेरपर्यंत ५० हजार २४५ हेक्टरवर फळबाग लागवड झाल्याची नोंद आहे. यापैकी प्रत्यक्ष किती क्षेत्रातील फळबागा आज जीवंत आहे, याची कुठलीही आकडेवारी कृषी विभागाकडे उपलब्ध नाही. रोहयोतून फळबाग लागवडीचा कार्यक्रम बंद झाल्याने त्याचे अपडेट घेणे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने बंद केले आहे. यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणे कठीण आहे. अशा भीषण संकट काळात शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने फुलविलेल्या फळबागांचे डोळ्यादेखत वाळवंट होत आहे. प्रामुख्याने संत्रा, मोसंबी, केळी, लिंबू, आवळा या फळबागांची लागवड करण्यात आली होती. आता संपूर्ण फळबागाच नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. काहींनी उपलब्ध पाण्यातून झाडे वाचविण्याची धडपड सुरू केली आहे. मात्र त्यालाही अपेक्षित मिळताना दिसत नाही. दुष्काळी स्थितीमुळे झालेल्या या नुकसानीची नोंद घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा तयार नाही. दुष्काळात गावातील तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांनी संयुक्तपणे काम करून त्याचा अहवाल प्रशासकीय स्तरावर पाठवावा, असे स्थायी आदेशच देण्यात आले आहे. प्रत्यक्ष मात्र शेतकऱ्याने सांगूनही वाळलेल्या फळबागांचे सर्वेक्षण होत नसल्याचे सांगण्यात येत आहे.मदतीची अपेक्षाशासनाने जिल्ह्यातील केवळ चार तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. या दुष्काळाची झळ संपूर्ण जिल्हा सोसत आहे. फळबाग लागवड करणारा शेतकरी पूर्णत: उद्ध्वस्त झाला आहे. त्याला मदतीची गरज आहे. मात्र शासकीय यंत्रणा सर्वेक्षणासाठी वाळलेल्या फळबागांकडे फिरकण्यास तयार नाही. यामुळे शेतकरी यंत्रणेच्या निगरगट्ट धोरणाचा बळी ठरत आहे.