शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीचे वरातीमागून घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

कर्जमुक्तीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँक आयुक्तांमार्फत राज्य शासनाशी करार करीत आहे. यामुळे १८ हजार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र आरबीआयचे आदेश नसल्याने राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँका आणि ग्रामीण बँकेचे ८१ हजार शेतकरी अडचणीत सापडले आहे.

ठळक मुद्दे१८ हजार शेतकऱ्यांनाच लाभ : रिझर्व्ह बँकेच्याच सूचना मानणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आर्थिक विवंचनेतील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने कर्जमुक्ती योजना आणली. प्रत्यक्षात जिल्ह्यातील ५९ टक्के पेरण्या आटोपल्या आणि आता करार करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. या कराराला केवळ राज्य बँक पुढे आली आहे. राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँका आणि व्यापारी बँकांनी रिझर्व्ह बँकेच्याच सूचना पाळणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.कर्जमुक्तीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँक आयुक्तांमार्फत राज्य शासनाशी करार करीत आहे. यामुळे १८ हजार शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र आरबीआयचे आदेश नसल्याने राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँका आणि ग्रामीण बँकेचे ८१ हजार शेतकरी अडचणीत सापडले आहे.राज्य शासनाने कर्जदार शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात वळते करण्याचा आदेश काढला आहे. जिल्हा बँक वगळता इतर बँकांनी हा आदेशच धुडकावला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जमुक्तीसाठी आरबीआयच्याच सूचनांचेच पालन करणार असल्याचे म्हटले आहे. आरबीआयने एनपीएमध्ये गेलेल्या खात्यांबाबत कुठलाही निर्वाळा दिला नाही. यामुळे गाव दत्तक असणारे ८१ हजार शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत.महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील ९९ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांचे ७५० कोटींचे कर्ज माफ होणार होते. यामध्ये जिल्हा बँकेच्या १८ हजार शेतकऱ्यांकडे १३० कोटींचे कर्ज माफ होणार होते. त्याकरिता जिल्हा बँकेने आयुक्तालयाकडे करार पाठविला आहे.सहकार आयुक्त अनिल कवळे स्वाक्षरी करून हा करार जिल्हा बँकेकडे वळता करणार आहे. यानंतर कर्ज वितरणाला प्रारंभ होणार आहे.मात्र जिल्ह्यातील ८१ हजार शेतकरी राष्ट्रीयीकृत बँक, ग्रामीण बँक आणि व्यापारी बँकांचे सभासद आहे. या शेतकऱ्यांकडे ६२० कोटींचे कर्ज थकले आहे. या सर्व शेतकऱ्यांचे खाते एनपीएमध्ये गेले आहे. अशा शेतकऱ्यांना आरबीआयने कर्ज देण्याबाबत कुठलीही भूमिका जाहीर केली नाही. बँकिंग नियमाने एनपीए खात्याला नव्याने कर्ज देता येत नाही. यामुळे बँकांनी अशा खाते धारकांना कर्ज देण्यास नकार दिला आहे. आरबीआयच्या सूचनेनंतरच त्यावर विचार होणार असल्याचे बँका सांगत आहेत.२८ हजार शेतकऱ्यांचे थम्ब प्रमाणीकरणजिल्ह्यात २८ हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत थम्ब ऑथेंटीकेशन केले आहे. इतरही शेतकरी पुढे आले आहेत. मात्र यातील जिल्हा बँकेच्या शेतकºयांच्याच खात्यात कर्जमुक्तीचे पैसे वळते होणार आहे. इतर खात्यांना आरबीआयच्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे.करार मिळताच जिल्हा बँक कर्ज वितरण सुरू क रेल. मात्र राष्ट्रीयीकृत बँका आरबीआयच्या आदेशानंतरच कर्ज वितरण करणार आहे.- रमेश कटके,जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ

टॅग्स :bankबँक