शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शेतकऱ्यांची सोयाबीनवर आशा, कपाशी संकटातच

By admin | Updated: August 31, 2014 00:08 IST

दमदार पावसाच्या हजेरीमुळे वणी तालुक्यात सोयाबीनचे पीक बहरले आहे. मात्र पावसाअभावी वाढ खुंटल्याने कपाशीची स्थिती अद्याप चिंताजनकच आहे.

नांदेपेरा : दमदार पावसाच्या हजेरीमुळे वणी तालुक्यात सोयाबीनचे पीक बहरले आहे. मात्र पावसाअभावी वाढ खुंटल्याने कपाशीची स्थिती अद्याप चिंताजनकच आहे.यावर्षी पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली. परिणामी शेतकरी बांधव निराशेच्या गर्तेत कोरड्या दुष्काळात सापडले आहे. पिकांच्या उत्पन्नात घट येण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्व आशाच मावळली आहे़ दरवर्षी विजया दशमीच्या मुहूर्तावर शेतकरी कपाशीची सीतादही करीत होते. व्यापारीही याच मुहूर्तावर कापूस खरेदीला प्रारंभ करीत होते. मात्र यावर्षी विजया दशमीला कापूस निघणे अवघड झाले आहे.सुरूवातीला विलंबाने आलेल्या थोड्या पावसातच शेतकऱ्यांनी पेरणी केली. पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना दुबारच, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले. वणी तालुक्यातील शेतकऱ्यांना तब्बल ३0 हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी, २३५ हेक्टरवर सोयाबीन, दोन हजार २५५ हेक्टरवर तूर, तर ७३ हेक्टरवर ज्वारीची दुबार-तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतरही पुन्हा पावसाने दडी मारल्याने बळीराजा पुरता संकटात सापडला आहे. आता पोळ्यापासून पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावली आहे. मात्र तरीही कपाशीची वाढ खुंटल्याने कपाशीचे पीक अद्याप संकटातच आहे. परिणामी शेतकऱ्यांची सर्व आशा सोयाबिनवर टिकून आहे.दरवर्षी साधारणत: विजया दशमीपासून कापूस वेचणी सुरू होत होती. सीतादहीचा कापूस उच्च प्रतीचा असल्याने शेतकरी तो बाजारपेठेत विकण्यासाठी आणत होते. त्यातूनच दसरा, दिवाळी सण साजरे करीत होते. मात्र यावर्षी उशिरा पेरण्या झाल्याने आणि त्यातच पावसाने दडी मारल्यामुळे यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस खरेदी सुरू होईल अथवा नाही, याबाबत शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्येही शंका आहे़ पेरणी लांबल्याने कपाशीची बोंडे अद्याप परिपक्व होण्यास बराच कालावधी लागणार आहे़ त्यामुळे यावर्षी सीतादहीची कापूस वेचणी दिवाळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ या सप्ताहात पोळ्यापासून वणी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. पावसाच्या दडीने नापिकीचे संकट कायम होते़ मात्र मध्यंतरी योग्य वेळी पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन पिकाला संजीवनी मिळाली आहे. तथापि आता सोयाबिनवर उंट उळीने आक्रमण केले आहे. तसेच अवेळी पाऊस आल्याने सोयाबिनच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांमध्ये वर्तविली जात आहे़ (वार्ताहर)