शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
8
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
9
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
10
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
11
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
12
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
13
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
14
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
15
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
16
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
18
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
19
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
20
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

शांततेला सुरूंग लावणारे गुंड निशाण्यावर

By admin | Updated: April 14, 2017 02:42 IST

जगात पैसाच सर्व नाही, तर प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. त्यासाठी गुण्यागोविंदाने राहून गोरगरिबांची सेवा करणे गरजेचे आहे.

विठ्ठलराव जाधव : पोलीस महानिरीक्षकांची पुसदला भेट, उमरखेडला एसडीपीओ कार्यालयप्रकाश लामणे   पुसदजगात पैसाच सर्व नाही, तर प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. त्यासाठी गुण्यागोविंदाने राहून गोरगरिबांची सेवा करणे गरजेचे आहे. समाजात अशांतता व समाजविघातक कृत्य करणाऱ्या गुंड व गुन्हेगारांची यापुढे गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.विठ्ठलराव जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर पुसद विभागातील सर्व पोलीस अधिकारी व शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांची विशेष सभा गुरुवारी येथे आयोजित होती. त्यासाठी ते येथे आले असता ‘लोकमत’शी बोलत होते. उमरखेड येथील स्वतंत्र एसडीपीओ कार्यालयाबाबत विचारले असता ते म्हणाले, पुसद विभाग खूप मोठा आहे. त्यामध्ये नऊ पोलीस ठाणे समाविष्ट आहे. त्यामुळेच उमरखेड येथे स्वतंत्र उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. तो मंजूरही झाला आहे. लवकरच याबाबत घोषणा होवून उमरखेड येथे स्वतंत्र एसडीपीओ कार्यालय निर्माण होईल. त्यामुळे गुन्हेगारांवर वचक बसविणे सोपे जाईल, असे त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत डॉ.जाधव म्हणाले, बुधवारी अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्हा पोलीस अधीक्षकांशी याबाबत चर्चा केली. आपल्या जिल्ह्यात कोणते गुन्हे वाढले आहे, राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर वाटमारीचा आढावा घेतला आहे. पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.पुसद शहरात अलिकडे घालेल्या दगडफेकीच्या घटनाबाबत डॉ.जाधव म्हणाले, शहरातील दगडफेकीच्या प्रकारानंतर तब्बल १७ व त्यापेक्षा अधिक गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शहरात फिक्स पॉर्इंट देण्यात आले आहे. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. एमपीडीए व मोक्का कायद्यांतर्गत बोलताना याबाबत संबंधितांकडे गुन्हेगारांचे प्रस्ताव पाठविले असून कारवाईला सुरुवात झाली आहे. कोणताही धर्म किंवा महापुरुष दुसऱ्याचा द्वेष करण्याचे सांगत नाही. त्यामुळे धर्माचरण करताना नागरिकांनी इतरांचाही आदर करावा, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.विठ्ठल जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.