शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सन्मानित

By admin | Updated: April 26, 2017 00:12 IST

जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना नागरी सेवा दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे ...

सचिंद्र प्रताप सिंह : उत्कृष्ट कार्याची दखल यवतमाळ : जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना नागरी सेवा दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने गौरविण्यात आले. गेली दोन वर्षात केलेल्या लोकाभिमुख कामांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय आदी उपस्थित होते. नागरी सेवा दिनी दरवर्षी राज्य शासनाच्यावतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार देऊन गौरविले जाते. सचिंद्र प्रताप सिंह यांनी मे २०१५ मध्ये जिल्हाधिकारी पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रशासनात शिस्त आणण्यासोबतच जिल्हा यंत्रणा प्रचंड गतिमान केली. सामान्य नागरिकांची कामे कुठेही अडणार नाही, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात मागील दोन वर्षात आतापर्यंतचे सर्वाधिक पिककर्ज वाटप झाले. जिल्ह्याचे रबी क्षेत्र दुप्पट झाले. शेतकरी आत्महत्यामध्ये जवळजवळ चाळीस टक्के घट झाली. ई-डिस्ट्रीक्ट योजनेंतर्गत जिल्हा राज्यात सर्वाधिक आॅनलाईन प्रमाणपत्र वितरण करणारा जिल्हा ठरला. जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविले. रेल्वे भूसंपादनाची कार्यवाही गतिमान झाली. बोरी-तुळजापूर महामार्ग बांधकामाच्या निविदाही जिल्हा प्रशासनाच्या जलद भूसंपादनाने प्रसिध्द झाल्या. या विविध कामांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. (वार्ताहर)