शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सन्मानित

By admin | Updated: April 26, 2017 00:12 IST

जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना नागरी सेवा दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे ...

सचिंद्र प्रताप सिंह : उत्कृष्ट कार्याची दखल यवतमाळ : जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांना नागरी सेवा दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने गौरविण्यात आले. गेली दोन वर्षात केलेल्या लोकाभिमुख कामांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय आदी उपस्थित होते. नागरी सेवा दिनी दरवर्षी राज्य शासनाच्यावतीने उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार देऊन गौरविले जाते. सचिंद्र प्रताप सिंह यांनी मे २०१५ मध्ये जिल्हाधिकारी पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रशासनात शिस्त आणण्यासोबतच जिल्हा यंत्रणा प्रचंड गतिमान केली. सामान्य नागरिकांची कामे कुठेही अडणार नाही, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात मागील दोन वर्षात आतापर्यंतचे सर्वाधिक पिककर्ज वाटप झाले. जिल्ह्याचे रबी क्षेत्र दुप्पट झाले. शेतकरी आत्महत्यामध्ये जवळजवळ चाळीस टक्के घट झाली. ई-डिस्ट्रीक्ट योजनेंतर्गत जिल्हा राज्यात सर्वाधिक आॅनलाईन प्रमाणपत्र वितरण करणारा जिल्हा ठरला. जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविले. रेल्वे भूसंपादनाची कार्यवाही गतिमान झाली. बोरी-तुळजापूर महामार्ग बांधकामाच्या निविदाही जिल्हा प्रशासनाच्या जलद भूसंपादनाने प्रसिध्द झाल्या. या विविध कामांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. (वार्ताहर)