शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

रक्तफुलांनी सजल्या रानवाटा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 22:16 IST

वसंत ऋतूची चाहूल लागली की, पानगळतीने अवघे जंगल गलबलून जाते. एरव्ही निरव शांत आणि स्थितप्रज्ञ राहणारे शिवार, उन्हाळ्यातील चकाकणाऱ्या तप्त सूर्यप्रकाशात वाऱ्याच्या हलक्या झुळूकीने हळूवार डोलायला लागते. पानांच्या गळतीने झाडांच्या ओळीत सळसळ वाढते.

ठळक मुद्देवसंतातला बहर : केशरी रंगछटांनी उजळले शिवार, दऱ्याखोऱ्यात फुलण्याचा उत्सव

संतोष कुंडकर।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वसंत ऋतूची चाहूल लागली की, पानगळतीने अवघे जंगल गलबलून जाते. एरव्ही निरव शांत आणि स्थितप्रज्ञ राहणारे शिवार, उन्हाळ्यातील चकाकणाऱ्या तप्त सूर्यप्रकाशात वाऱ्याच्या हलक्या झुळूकीने हळूवार डोलायला लागते. पानांच्या गळतीने झाडांच्या ओळीत सळसळ वाढते. ईकडे पळस वृक्षे वसंतोत्सवासाठी फुलारून येतात. बहर वेगाने वाढतो अन् अवघ्या वनराईतील रानवाटा रक्तफुलांच्या केशरी रंगछटांनी उजळून निघतात.गुजरातीत खाकेरा, संस्कृतमध्ये पलाश, त्रिपत्रक, रक्तपुष्पक तर इंग्रजी भाषेत फ्लेम आॅफ द फॉरेस्ट अशा विविध नावांनी ओळखला जाणारा मराठी भाषेतील पळस सध्या रानावनात सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पिवळ्या आणि केशरी अशा दोन रंगात उमलणारी पळसाची फुलं तशी सर्वांच्याच जिव्हाळ्याची. रंगपंचमी आली की, जुन्या पिढीला पळसफुलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. पूर्वी रंगपंचमीला पळसफुलांचाच रंग उधळला जात असे. उन्हाळ्याच्या सुरूवातीला म्हणजेच वसंत ऋतूच्या सुरूवातीला पळसवृक्ष पानांचे नवे आवरण पांघरतो, तर वसंत पंचमीला तो फुलांनी सजतो. मिश्र मोसमी जंगलात अस्तित्व दाखविणारा पळस राज्यभर दृष्टीपथास पडतो. दूर डोंगरदऱ्यावर नजर फिरविली की, पेटणारी ज्योत जशी हवेमुळे लहानमोठी होताना दिसते, तशीच ही पळसफुलं दिसायला लागतात. म्हणूनच ब्रिटीश राजवटीतील गोऱ्या साहेबांनी या फुलांना ‘फ्लेम आॅफ द फॉरेस्ट’ असे नाव दिले असावे. रानात असा उमलण्याचा उत्सव सुरू असताना पळसफुलांपाठोपाठ पांगारा, आंबा, काटसावरीची झाडंही फुलांवर येतात.हिवाळा संपला की, जंगलातील पानवठे आटायला सुरूवात होते. उन्हाचा तडाखा वाढतो. ही रानफुलं मग जंगलातील व्याकूळ पाखरांना तहानभूक भागविण्यासाठी स्वत:तील द्रव पुरवितात आणि म्हणूनच तापत्या उन्हात या फुलारलेल्या झाडांवर मैना, पोपट, बुलबुल, नाचरा, कोतवाल, दयाळ असे अनेक पक्षी आणि मधमाश्या, मुंग्या यांची जत्राच भरते. एक जीव (पळसफुलं) दुसऱ्या जीवाला जीवनरस वाटत आहे, असे मनोहारी दृष्य रानावनात पहायला मिळते.बहुउपयोगी पळसाची होतेय निर्दयपणे कत्तलपळसाची आंतरसाल महिलांच्या विविध आजारावर रामबाण समजली जाते. पळसफुलांचा काढा किंवा रस तापशमक आहे. उन्हाळीच्या विकारावर तो उपयुक्त ठरतो. पळसाच्या बिया (पळसपापडी) कृमीनाशक व विरेचक म्हणून वापरल्या जातात. मात्र जलतन व होळीच्या नावावर पळसाची कत्तल होते.