शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थी येणार यवतमाळात

By admin | Updated: September 7, 2015 02:21 IST

धम्मचक्र प्रवर्तन ही जगाच्या इतिहासातील अविस्मरणीय घटना आहे. या ऐतिहासिक दिवसाला यंदा यवतमाळ जिल्हावासीयांच्या दृष्टीने आणखी महत्त्व प्राप्त होणार आहे.

१४ आॅक्टोबर : दी बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया जिल्हा शाखेचा पुढाकार यवतमाळ : धम्मचक्र प्रवर्तन ही जगाच्या इतिहासातील अविस्मरणीय घटना आहे. या ऐतिहासिक दिवसाला यंदा यवतमाळ जिल्हावासीयांच्या दृष्टीने आणखी महत्त्व प्राप्त होणार आहे. मानवाला खरे जीवनज्ञान देणाऱ्या भगवान बुद्धांच्या पवित्र अस्थी १४ आॅक्टोबर रोजी यवतमाळात येणार आहे. दी बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाच्या जिल्हा शाखेने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.हा पवित्र अस्थी श्रीलंकेतून मुंबईत येतील. त्यानंतर नागपूर मार्गे यवतमाळला आणाला जाईल. अस्थी रथासोबत श्रीलंकेतील महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष भदंत बानागल उपतिस्स नायकथेरो उपस्थित राहणार आहे. तसेच मुंबईतून आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले रथासोबत यवतमाळात येणार आहेत. त्यानंतर १६ आॅक्टोबर रोजी हा अस्थी रथ वर्धा-हिंगणघाट मार्गे चंद्रपुरात जाणार आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनी जिल्ह्यातील नागरिकांना भगवान बुद्धांच्या अस्थींचे दर्शन घेण्याची अविस्मरणीय संधी या निमित्ताने मिळणार आहे. जिल्ह्यातील संपूर्ण नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. श्रीलंका सरकारने भगवान बुद्धांच्या जीवनावर ‘सीरी सिद्धार्थ गौतम’ हा चित्रपट तयार केला आहे. त्यात भगवान बुद्धांची भूमिका करणारे अभिनेते गगनजी मलिक या अस्थी रथासोबत यवतमाळात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.पत्रकार परिषदेला विदर्भ अध्यक्ष पद्माकर गणवीर, उपाध्यक्ष मनोहर दुपारे, केंद्रीय सदस्य अ‍ॅड. भीमराव कांबळे, शहर महासचिव मिलिंद डांगे, सुखदेव जाधव, गोविंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष धर्मपाल माने, सचिव जयकृष्ण बोरकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका शाखांचे पदाधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)श्रीलंकेतील नीलगिरी सह्य स्तुपातील पवित्र अस्थीश्रीलंकेतील नीलगिरी सह्य स्तुपात या पवित्र अस्थी सापडलेल्या आहेत. श्रीलंका सरकारच्या पुरातत्त्व खात्याने त्या प्रमाणित केल्या आहेत. बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील यांनी श्रीलंकेकडे पाठपुरावा केल्यानंतर तेथील सरकारने भारतात अस्थी नेण्याची परवानगी दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने या अस्थींचे भारतात आगमन होत आहे. भारतात दर्शन झाल्यानंतर पुन्हा २४ आॅक्टोबरला अस्थी श्रीलंकेत परत जाणार आहेत. या अस्थी रथाला श्रीलंका सरकार तसेच महाराष्ट्र सरकारकडून विशेष सुरक्षा प्रदान केली जाणार आहे.