शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

महामहिमांचा दौरा; प्रशासनाने अतिक्रमण हटावची केली धूळफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 05:00 IST

शहरातील प्रमुख चौकात दररोज बाजार भरल्यासारखी स्थिती आहे. यातही दारव्हा नाका चौफुलीची अवस्था अतिशय गंभीर आहे. येथे सकाळी व सायंकाळी प्रचंड वर्दळ असते. त्यातच रस्त्यावर भाजी बाजार लागतो, तर सायंकाळी विविध खाद्यपदार्थांच्या हातगाड्या दुकान थाटतात. त्या भोवताली घोळक्याने अनेक जण जमा होतात. दुचाकीही रस्त्यावरच उभी केली जाते. या सर्व अतिक्रमणातून उरलेला रस्ता वाहतुकीसाठी  मिळतो. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रशासकीय यंत्रणा सर्वसामान्यांच्या मागणीकडे कधीच गांभीर्याने बघत नाही. शहरातील दारव्हा नाका चौक हा समस्येचे माहेरघर बनला आहे. येथे तीनही बाजूने रस्त्यावर अतिक्रमण असते. यामुळे वारंवार अपघातही होतात. ते दूर व्हावे, ही मागणी अनेक वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित आहे. महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा दौरा येताच काही मिनिटांत हे अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्यात आले. ही उपाययोजना कायमस्वरूपी का नाही, असा प्रश्न  आता सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. शहरातील प्रमुख चौकात दररोज बाजार भरल्यासारखी स्थिती आहे. यातही दारव्हा नाका चौफुलीची अवस्था अतिशय गंभीर आहे. येथे सकाळी व सायंकाळी प्रचंड वर्दळ असते. त्यातच रस्त्यावर भाजी बाजार लागतो, तर सायंकाळी विविध खाद्यपदार्थांच्या हातगाड्या दुकान थाटतात. त्या भोवताली घोळक्याने अनेक जण जमा होतात. दुचाकीही रस्त्यावरच उभी केली जाते. या सर्व अतिक्रमणातून उरलेला रस्ता वाहतुकीसाठी  मिळतो. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. हा भाग शाळा-महाविद्यालय व निवासी परिसराचा असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींसह महिला, लहान मुलांची येथून ये-जा  अधिक असते. वाहतूककोंडीने या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. पूर्वीपेक्षा येथील व्यापारी संकुलांमध्येही जादा दुकाने लागली आहे. त्या ठिकाणीही पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यावरच असतात. फुटपाथही अतिक्रमणाच्याच विळख्यात आहे. यातून काही अपप्रवृत्तींनाही थारा मिळत आहे. सोनसाखळी चोरीच्या घटनासुद्धा या ठिकाणी घडल्या असून चाकूहल्ल्याचाही प्रयत्न झालेला आहे.  या सर्व धोकादायक घडामोडी होत असल्याने या ठिकाणी पूर्णवेळ पोलीस चौकी दिली जावी, अशी मागणी करण्यात आली. त्याचा प्रस्तावही देण्यात आला. मात्र, अनेक वर्षांपासून यावर कोणताच विचार झाला नाही. प्रशासकीय स्तरावर अजून कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. 

पालकमंत्री लक्ष घालणार का ? कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज - महामहीम राज्यपाल यवतमाळ दौऱ्यावर येत असल्याने बुधवारी सकाळीच प्रशासनाने तत्परता दाखवत दारव्हानाका चौकातील हातगाड्यांचे अतिक्रमण हटवून काही तासांसाठी परिसर मोकळा केला. खरोखरच इतका रस्ता आमरहदारीसाठी पूर्णवेळ मोकळा राहिला तर किती चांगले होईल, असा विचार येथून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात घोळत होता. रस्त्यावरच्या गर्दीचा, अतिक्रमणाचा केवळ व्हीआयपींनाच त्रास होतो का? असाही प्रश्न उपस्थित केला जात असून पालकमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण