शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

महामहिमांचा दौरा; प्रशासनाने अतिक्रमण हटावची केली धूळफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 05:00 IST

शहरातील प्रमुख चौकात दररोज बाजार भरल्यासारखी स्थिती आहे. यातही दारव्हा नाका चौफुलीची अवस्था अतिशय गंभीर आहे. येथे सकाळी व सायंकाळी प्रचंड वर्दळ असते. त्यातच रस्त्यावर भाजी बाजार लागतो, तर सायंकाळी विविध खाद्यपदार्थांच्या हातगाड्या दुकान थाटतात. त्या भोवताली घोळक्याने अनेक जण जमा होतात. दुचाकीही रस्त्यावरच उभी केली जाते. या सर्व अतिक्रमणातून उरलेला रस्ता वाहतुकीसाठी  मिळतो. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रशासकीय यंत्रणा सर्वसामान्यांच्या मागणीकडे कधीच गांभीर्याने बघत नाही. शहरातील दारव्हा नाका चौक हा समस्येचे माहेरघर बनला आहे. येथे तीनही बाजूने रस्त्यावर अतिक्रमण असते. यामुळे वारंवार अपघातही होतात. ते दूर व्हावे, ही मागणी अनेक वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित आहे. महामहीम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा दौरा येताच काही मिनिटांत हे अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्यात आले. ही उपाययोजना कायमस्वरूपी का नाही, असा प्रश्न  आता सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. शहरातील प्रमुख चौकात दररोज बाजार भरल्यासारखी स्थिती आहे. यातही दारव्हा नाका चौफुलीची अवस्था अतिशय गंभीर आहे. येथे सकाळी व सायंकाळी प्रचंड वर्दळ असते. त्यातच रस्त्यावर भाजी बाजार लागतो, तर सायंकाळी विविध खाद्यपदार्थांच्या हातगाड्या दुकान थाटतात. त्या भोवताली घोळक्याने अनेक जण जमा होतात. दुचाकीही रस्त्यावरच उभी केली जाते. या सर्व अतिक्रमणातून उरलेला रस्ता वाहतुकीसाठी  मिळतो. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. हा भाग शाळा-महाविद्यालय व निवासी परिसराचा असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींसह महिला, लहान मुलांची येथून ये-जा  अधिक असते. वाहतूककोंडीने या ठिकाणी अपघात होण्याचे प्रमाणही वाढले आहे. पूर्वीपेक्षा येथील व्यापारी संकुलांमध्येही जादा दुकाने लागली आहे. त्या ठिकाणीही पार्किंग नसल्याने वाहने रस्त्यावरच असतात. फुटपाथही अतिक्रमणाच्याच विळख्यात आहे. यातून काही अपप्रवृत्तींनाही थारा मिळत आहे. सोनसाखळी चोरीच्या घटनासुद्धा या ठिकाणी घडल्या असून चाकूहल्ल्याचाही प्रयत्न झालेला आहे.  या सर्व धोकादायक घडामोडी होत असल्याने या ठिकाणी पूर्णवेळ पोलीस चौकी दिली जावी, अशी मागणी करण्यात आली. त्याचा प्रस्तावही देण्यात आला. मात्र, अनेक वर्षांपासून यावर कोणताच विचार झाला नाही. प्रशासकीय स्तरावर अजून कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. 

पालकमंत्री लक्ष घालणार का ? कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज - महामहीम राज्यपाल यवतमाळ दौऱ्यावर येत असल्याने बुधवारी सकाळीच प्रशासनाने तत्परता दाखवत दारव्हानाका चौकातील हातगाड्यांचे अतिक्रमण हटवून काही तासांसाठी परिसर मोकळा केला. खरोखरच इतका रस्ता आमरहदारीसाठी पूर्णवेळ मोकळा राहिला तर किती चांगले होईल, असा विचार येथून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात घोळत होता. रस्त्यावरच्या गर्दीचा, अतिक्रमणाचा केवळ व्हीआयपींनाच त्रास होतो का? असाही प्रश्न उपस्थित केला जात असून पालकमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण