शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

येथे बेवारस मृतदेहांवर चढविले जाते मानवतेचे कफन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

प्रत्येकाचा मृत्यू एकदा ठरलेला आहे. निधनानंतर मृताला अखेरचा निरोप देण्यासाठी त्याच्या आप्तस्वकीयांची गर्दी होते. पण काहींच्या नशिबात ही गर्दी नसते. ही माणेस एकाकी मरतात. अखेरच्या क्षणी त्यांच्या नशिबी हक्काचे ‘कफन’देखील नसते. अशा बेवारस मृतांसाठी मग ‘तो’ स्वत:हून धाऊन जातो. स्वखर्चाने अंत्यसंस्काराचे सारे सोपस्कर तो स्वत: पुढे होऊन पार पाडतो. विजय शंकरराव कडुकर असे या भल्या माणसाचे नाव.

ठळक मुद्देशेकडो मृतदेहांवर अंत्यसंस्कार : वणीतील समाजसेवी व्यक्तीचा अनोखा उपक्रम

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : प्रत्येकाचा मृत्यू एकदा ठरलेला आहे. निधनानंतर मृताला अखेरचा निरोप देण्यासाठी त्याच्या आप्तस्वकीयांची गर्दी होते. पण काहींच्या नशिबात ही गर्दी नसते. ही माणेस एकाकी मरतात. अखेरच्या क्षणी त्यांच्या नशिबी हक्काचे ‘कफन’देखील नसते. अशा बेवारस मृतांसाठी मग ‘तो’ स्वत:हून धाऊन जातो. स्वखर्चाने अंत्यसंस्काराचे सारे सोपस्कर तो स्वत: पुढे होऊन पार पाडतो.विजय शंकरराव कडुकर असे या भल्या माणसाचे नाव. गेल्या सात वर्षांत वणी, मुकुटबन पाटण, मारेगाव, शिरपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी या भागातील १२५ पेक्षा अधिक मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच सत्कार्य विजय कडुकर यांच्या हातून घडलं आहे. काही वर्षांपूर्वी भद्रावती येथील एक बेवारस मृतदेह वणी परिसरात आढळून आला होता. मृतदेह इतका छिन्नविछिन्न होता की, त्यावर अंतसंस्कारासाठीही कुणी पुढे येईना. कडुकर यांना त्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच पोलिसांशी संपर्क करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयार दाखविली. येथूनच त्यांच्या या अनोख्या सेवा कार्याला प्रारंभ झाला. त्यांच्या या सत्कार्याची ख्याती पंचक्रोशीत आहे. त्यामुळे कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस मृतदेह आढळला की, विजय कडुकर यांना अंत्यसंस्कारासाठी बोलावणं येतं. कडुकरदेखील कुठलेही आढेवेढे न घेता, या सत्कार्यासाठी पुढे येतात. यासाठी नवकार योगा ग्रुपचे किरण दिकुंडवार, तारेंद्र बोर्डे तसेच समाजसेवक नारायण गोडे विशेष सहकार्य मिळते, असे कडुकर यांनी सांगितले.त्यांचं काम एवढ्यावरच थांबलेलं नाही, तर दरवर्षी ते वणी परिसरातील गरीब गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं स्वखर्चातून वितरण करतात. त्यांनी मरणोपरांत स्वत:चे डोळे, लिव्हर, हृदय आणि किडणीसुद्धा दान केली आहे. स्वत:च्या मिळकतीतील २० टक्के उत्पन्न ते दरवर्षी केवळ समाजासाठी खर्च करतात, हे विशेष. त्यांच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.