शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

येथे बेवारस मृतदेहांवर चढविले जाते मानवतेचे कफन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

प्रत्येकाचा मृत्यू एकदा ठरलेला आहे. निधनानंतर मृताला अखेरचा निरोप देण्यासाठी त्याच्या आप्तस्वकीयांची गर्दी होते. पण काहींच्या नशिबात ही गर्दी नसते. ही माणेस एकाकी मरतात. अखेरच्या क्षणी त्यांच्या नशिबी हक्काचे ‘कफन’देखील नसते. अशा बेवारस मृतांसाठी मग ‘तो’ स्वत:हून धाऊन जातो. स्वखर्चाने अंत्यसंस्काराचे सारे सोपस्कर तो स्वत: पुढे होऊन पार पाडतो. विजय शंकरराव कडुकर असे या भल्या माणसाचे नाव.

ठळक मुद्देशेकडो मृतदेहांवर अंत्यसंस्कार : वणीतील समाजसेवी व्यक्तीचा अनोखा उपक्रम

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : प्रत्येकाचा मृत्यू एकदा ठरलेला आहे. निधनानंतर मृताला अखेरचा निरोप देण्यासाठी त्याच्या आप्तस्वकीयांची गर्दी होते. पण काहींच्या नशिबात ही गर्दी नसते. ही माणेस एकाकी मरतात. अखेरच्या क्षणी त्यांच्या नशिबी हक्काचे ‘कफन’देखील नसते. अशा बेवारस मृतांसाठी मग ‘तो’ स्वत:हून धाऊन जातो. स्वखर्चाने अंत्यसंस्काराचे सारे सोपस्कर तो स्वत: पुढे होऊन पार पाडतो.विजय शंकरराव कडुकर असे या भल्या माणसाचे नाव. गेल्या सात वर्षांत वणी, मुकुटबन पाटण, मारेगाव, शिरपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी या भागातील १२५ पेक्षा अधिक मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याच सत्कार्य विजय कडुकर यांच्या हातून घडलं आहे. काही वर्षांपूर्वी भद्रावती येथील एक बेवारस मृतदेह वणी परिसरात आढळून आला होता. मृतदेह इतका छिन्नविछिन्न होता की, त्यावर अंतसंस्कारासाठीही कुणी पुढे येईना. कडुकर यांना त्याची माहिती मिळाली. त्यांनी लगेच पोलिसांशी संपर्क करून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयार दाखविली. येथूनच त्यांच्या या अनोख्या सेवा कार्याला प्रारंभ झाला. त्यांच्या या सत्कार्याची ख्याती पंचक्रोशीत आहे. त्यामुळे कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस मृतदेह आढळला की, विजय कडुकर यांना अंत्यसंस्कारासाठी बोलावणं येतं. कडुकरदेखील कुठलेही आढेवेढे न घेता, या सत्कार्यासाठी पुढे येतात. यासाठी नवकार योगा ग्रुपचे किरण दिकुंडवार, तारेंद्र बोर्डे तसेच समाजसेवक नारायण गोडे विशेष सहकार्य मिळते, असे कडुकर यांनी सांगितले.त्यांचं काम एवढ्यावरच थांबलेलं नाही, तर दरवर्षी ते वणी परिसरातील गरीब गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं स्वखर्चातून वितरण करतात. त्यांनी मरणोपरांत स्वत:चे डोळे, लिव्हर, हृदय आणि किडणीसुद्धा दान केली आहे. स्वत:च्या मिळकतीतील २० टक्के उत्पन्न ते दरवर्षी केवळ समाजासाठी खर्च करतात, हे विशेष. त्यांच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.