शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
4
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
5
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
6
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
7
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
8
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
9
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
10
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
11
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
12
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
13
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
14
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
15
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
16
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:52 IST

जिल्ह्यातील तब्बल ३५ मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे.

बीड : केवळ ढगाळ वातावरण आणि वादळी वाºयाने होरपळलेल्या पिकांना शनिवारी रात्री झालेल्या संततधार पावसाने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील तब्बल ३५ मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून शेतकºयांच्या चेहºयावर हसू फुलले आहे. ग्रामीण भागातील काही छोट्या पुलांवरून पाणी वाहिल्याने गावांचा काही तासांसाठी संपर्क तुटला होता. रविवारी दुपारपर्यंत बहुतांश ठिकाणी संततधार सुरूच होती. सायंकाळी पावसाने उघडीप दिली.यावर्षी जूनच्या सुरूवातीपासूनच पावसाने ओढ दिली आहे. सुरुवातीला झालेल्या छोट्या-मोठ्या पावसावर शेतकºयांनी खरिपाची पेरणी केली. तळहाताच्या फोडाप्रमाणे पिके जोपासली. परंतु केवळ पावसाने वेळेवर हजेरी न लावल्याने अनेक भागातील पिके सुकू लागली होती. काही ठिकाणी तर शेतकºयांनी दुबार पेरणी केली होती. पावसासाठी शेतकºयांच्या नजरा आकाशाकडे असायच्या. दिवसभर केवळ ढग यायचे आणि निघून जायचे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता.अशा परिस्थितीत सावकारासह बँकांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे? याची चिंता त्यांना होती. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर आज-उद्या पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकºयांना असायची. परंतु हा अंदाज आतापर्यंत कागदावरच राहिला. शनिवारीही मराठवाड्यात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला होता. यावेळेस मात्र हा अंदाज खरा ठरल्याने शेतकºयांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. परळी, बीड, गेवराई आदी तालुक्यात रिपरिप पाऊस झाला होता. कोठेही जोरदार पाऊस झाला नव्हता. परंतु सायंकाळी सात नंतर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने संततधार हजेरी लावली. हा पाऊस रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत सुरूच होता. कधी मध्यम तर कधी जोरदार अशा स्वरूपात हा पाऊस होता. दुपारनंतर पावसाने उघडीप दिली होती. ढगाळ वातावरण कायम राहिले.