शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

टॉवरच्या नावाखाली भरघोस आमिषे

By admin | Updated: October 26, 2015 02:25 IST

गावात मोबाईल सेवा सुरू करण्याकरिता टॉवर उभारणे सुरू असून त्याकरिता जागा भाड्याने घ्यायची आहे.

गावकऱ्यांनो सावधान : कंपनीकडून सरपंचांना आले पत्र, नोकरीचीही फसवी हमीअकोलाबाजार : गावात मोबाईल सेवा सुरू करण्याकरिता टॉवर उभारणे सुरू असून त्याकरिता जागा भाड्याने घ्यायची आहे. याकरिता मोबाईल टॉवरच्या कंपनीकडून भरघोस आमिषे देण्यात येत आहे. जागा मालकाला अर्जासोबत रजिस्ट्रेशन फी कंपनीच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगण्यात येत आहे. कंपनीने दाखविलेल्या भरघोस आमिषाला बळी पडून गावकऱ्यांची फसगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील एका मोबाईल टॉवर कंपनीकडून गावाच्या सरपंचाला एक पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रामध्ये भारत सरकारद्वारे एक मोबाईल टॉवर उभारणीकरिता गावात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. देशातील काही निवडक गावांमध्ये टॉवर उभारणीकरिता १०० गज जमीन आणि आॅफिसकरिता ५० गज जागेची आवश्यकता आहे. यामध्ये कंपनी जागामालकाला २० लाख रुपये अ‍ॅडव्हान्स व ४० हजार रुपये प्रतिमहिना भाडे देईल आणि कुटुंबातील एका व्यक्तीस टॉवर गार्डची नोकरी देण्यात येईल, त्याची सॅलरी १६ हजार राहील. इच्छूक अर्जदाराने जागेच्या इत्थंभूत माहितीसह कंपनीकडे अर्ज सादर करावा. अर्ज सादर केल्यानंतर १५ दिवसात कंपनी आपल्यासोबत करार करण्याकरिता आपल्याकडे येईल. अशा प्रकारचे मोठमोठे आमिष कंपनीने सरपंचाला पाठविलेल्या माहितीपत्रकामध्ये दाखविले आहे. अशा आमिषाला बळी पडणाऱ्या अर्जदारास रजिस्ट्रेशन फी म्हणून पाच हजार १०० रुपये रोख कंपनीद्वारे सांगण्यात आलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास आवर्जून पत्रामध्ये लिहण्यात आले आहे. माहितीपत्रकात दर्शविण्यात आलेल्या मोबाईल नंबरवरून खाते नंबर कंपनीकडून अर्जदारास सांगण्यात येईल, अशी सगळी संशयास्पद प्रक्रिया आहे.लहानशा जागेचे २० लाख रुपये अ‍ॅडव्हांस, ४० हजार रुपये मासिक भाडे व १६ हजार रुपये महिन्याची टॉवर गार्डची नोकरी या आमिषाला ग्रामीण भागातील व्यक्ती बळी पडून अर्जासोबत पाच हजार १०० रुपये कंपनीचे खात्यात जमा करेल आणि यामध्ये अनेकांची फसगत होण्याची शक्यता आहे. सदर प्रकारचे पत्र अकोलाबाजार ग्रामपंचायतला प्राप्त झाले असून या आमिषाला कुणीही बळी पडू नये, असे आवाहन सरपंच अर्चना मोगरे यांनी केले आहे. (वार्ताहर)मेहनतीला पर्याय नाहीमोबाईल टॉवर उभारणीचे निमित्त सांगून गावकऱ्यांना गंडा घालण्याची शक्यता आहे. जागेचे भाव बघता, संबंधित पत्रात दिलेली आमिषे फसवी असल्याचे उघडच आहे. इतक्या सहजा सहजी कुणीही भरघोस पैसा देऊ शकत नाही. पैसा मिळवायचा तर मेहनतीला पर्याय नाही, असे आवाहन सुज्ञ नागरिकांनी केले आहे.