शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

९३ हजार तक्रारींची सुनावणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:01 IST

बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातील ९३ हजार शेतकऱ्यांच्या तक्रारींची सुनावणी लालफितीत अडकली. राज्यातील ११ लाख तक्रारींपुढे जिल्ह्यातील तक्रारींचा क्रमांकच लागला नाही.

ठळक मुद्देबोंडअळीची मदत : राज्यातील ११ लाख तक्रारींपुढे जिल्ह्याचा नंबरच लागला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातील ९३ हजार शेतकऱ्यांच्या तक्रारींची सुनावणी लालफितीत अडकली. राज्यातील ११ लाख तक्रारींपुढे जिल्ह्यातील तक्रारींचा क्रमांकच लागला नाही. त्यामुळे सुनावणी केव्हा होणार आणि मदत केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामात बोंडअळीने कपाशीचे प्रचंड नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाकडे तक्रारी करून मदतीची मागणी केली. जिल्ह्यातील १६ तालुक्यातील तब्बल ९३ हजार शेतकऱ्यांनी अधिकृत तक्रारी कृषी विभागाकडे नोंदविल्या आहे. या तक्रारींचा निवाडा करण्यासाठी कृषी गुणनियंत्रक संचालकांकडे पुणे येथे सुनावणी सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्याचा क्रमांक लागल्यानंतर सुनावणी केली जाते. राज्यातील ११ लाख शेतकऱ्यांनी बोंडअळी नुकसानीच्या तक्रारी केल्या आहे. त्यामुळे अद्यापही यवतमाळ जिल्ह्याचा क्रमांक लागला नाही. परिणामी यवतमाळ जिल्ह्याची सुनावणी अद्यापही झाली नाही. ही सुनावणी केव्हा होणार आणि मदत केव्हा मिळणार, हे सध्या तरी सांगणे अवघड झाले आहे. आतापर्यंत झालेल्या सुनावणीत सात जिल्ह्यातील नावे आली आहे. परंतु यवतमाळचा मात्र अद्यापही क्रमांक आला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.कृषी विभाग अनभिज्ञजिल्ह्यातील शेतकºयांनी केलेल्या तक्रारींवर कधी सुनावणी होणार याबाबत कृषी विभागाला कृषी आयुक्तालयांकडून कुठलीही सूचना दिली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुनावणीच्या प्रतीक्षेत आहे. पुणे येथे होत असलेल्या सुनावणीत दरदिवशी १०० तक्रारींचा निपटारा केला जात आहे. त्यामुळे ९३ हजार शेतकºयांच्या सुनावणीला विलंब लागणार आहे. स्पॉट तपासणी व इतर बाबींमुळे शेतकºयांना मदत मिळण्यास विलंब होणार आहे.

टॅग्स :cottonकापूस